शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाही होतेय रेतीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 21:48 IST

घाटांचे लिलाव झाल्यानंतर रेतीचे कमी दर आकारावे, असे ठरले. यामुळे घाटधारकांनी प्रचंड मनमानी चालविली आहे. एका रॉयल्टीवर तब्बल चार ट्रिपा मारल्या जात आहेत. परिणामी, शासनाचा महसूल बुडत असून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

ठळक मुद्देएका रॉयल्टीवर चार ट्रिपा : संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : घाटांचे लिलाव झाल्यानंतर रेतीचे कमी दर आकारावे, असे ठरले. यामुळे घाटधारकांनी प्रचंड मनमानी चालविली आहे. एका रॉयल्टीवर तब्बल चार ट्रिपा मारल्या जात आहेत. परिणामी, शासनाचा महसूल बुडत असून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शिवाय टेकोडाचे उपसरपंच राजू कुरवाडे यांनी तक्रारही केली आहे.यंदा आष्टी तालुक्यात इस्माइलपूर या एकाच रेतीघाटाचा लिलाव झाला आहे. त्याला लागून अमरावती जिल्ह्यातील जावरा रेतीघाट लिलाव झाला असून घाट सुरूही झाला आहे. बांधकामे झपाट्याने सुरू असल्याने रेतीघाट धारकांनी एक रॉयल्टी देत त्यावर चार वेळा रेतीची वाहतूक करण्याची अट घालण्यात आली आहे. प्रती ट्रीप ३ हजार ५०० रुपये दर आकारण्यात आले आहेत. परिणामी, रेतीची तस्करी बिनदिक्कत दिवसरात्र सुरू आहे. तहसील कार्यालयाचे काही अधिकारी व कर्मचारी यात सहभागी असल्याचे बोलले जात आहे. रेतीची चोरी पकडण्यासाठी भारसवाडा येथील तलाठ्याने सक्तीची रॉयल्टी तपासणी सुरू केली होती; पण या कर्तव्यदक्ष कर्मचाºयाला वरिष्ठ अधिकाºयांनी रॉयल्टी तपासू नका, घाटधारकावर मेहरबानी करा, असा उपटसुंभ सल्ला दिला आहे. यामुळे प्रशासन एवढे मेहरबान कसे, हा प्रश्न तुर्तास अनुत्तरीत आहे.घाटातून रेती भरण्यासाठी सध्या मनुष्यबळाचा वापर होत आहे. दिवसभर १०० च्या वर ट्रॅक्टर, २५ डंपर यांच्या माध्यमातून रेतीची वाहतूक केली जात आहे. शासनाने लिलावाचे दर ठरवून देण्यासोबतच एक ब्रास रेती कितीला विकायची, याचीही अट घालून दिली आहे; पण नियम धाब्यावर बसवून सर्रास लूट केली जात आहे. अव्वाच्या सव्वा दर आकारून रातोरात अधिक लखपती बनण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. महसूल चोरी प्रकरणातील दंड आकारण्याचे प्रमाणही घटले आहे. रेतीचोरी पकडण्यासाठी पथक नेमण्याऐवजी त्याला अभय दिले जात असल्याचे दिसते. यामुळे गोदावरी, वाघोली, खडकी, टेकोडा येथील ग्रामस्थांनी आक्षेप घेतले आहेत. टेकोडा ग्रा.पं. चे उपसरपंच राजू कुरवाडे यांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे.महसूल विभागाचे धाडसत्र कुठेही कार्यरत नाही. यामुळे चार तलाठी, दोन नायब तहसीलदार यांचे नेमलेले पथक गेले कुठे, असा प्रश्नही कुरवाडे यांनी उपस्थित केला आहे. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. रेतीची दिवसाला होणारी सर्रास चोरी थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही उपसरपंच राजू कुरवाडे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती वरिष्ठांना देण्यात आल्या आहेत.अन्य घाटांमध्ये बोटींचा वापरघाटांतून रेतीचा उपसा करण्याकरिता यंत्रांचा वापर करू नये, असे नियम सांगतात; पण या नियमांना पदोपदी पायदळी तुडविण्याचे काम घाटधारक करीत असल्याचे दिसते. आष्टी तालुक्यात नसल्या तरी समुद्रपूर, हिंगणघाट व देवळी तालुक्यात सर्रास बोटींचा वापर करून रेतीचा उपसा केला जात असल्याचे समोर आले आहे. समुद्रपूर तालुक्यातील घाटातून तर मोठ्या प्रमाणात बोटींद्वारे रेतीचा उपसा केला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.