शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
3
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
4
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
5
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
6
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
7
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
8
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
9
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
10
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
11
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
12
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
13
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
14
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
15
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
16
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
17
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
18
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
19
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
20
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा पाडण्यासाठी ‘तारीख पे तारीख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:48 IST

शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन आष्टीने जुनी धोकादायक इमारत पाडण्यासाठी २०१६ पासून वारंवार शिक्षण विभागाला प्रस्ताव दिला. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने पावसाळ्याच्या दिवसात अनुचित घटना घडण्याची शक्यता शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न : वरिष्ठांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन आष्टीने जुनी धोकादायक इमारत पाडण्यासाठी २०१६ पासून वारंवार शिक्षण विभागाला प्रस्ताव दिला. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने पावसाळ्याच्या दिवसात अनुचित घटना घडण्याची शक्यता शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन आष्टीची विद्यार्थीसंख्या यावर्षी १६ इतकी आहे. २० वर्षांपूर्वी येथे पुनर्वसनमधून प्राथमिक शाळेचे बांधकाम करण्यात आले होते. ही इमारत क्षतिग्रस्त झाल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तीन वर्षांपूर्वी नवीन शाळा बांधून दिली. त्याचवेळी जुनी शाळेची इमारत पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने व मुख्याध्यापकाने संयुक्त प्रस्ताव पंचायत समिती गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दिला. त्यांनी सदर प्रस्ताव शिक्षणाधिकारी प्राथमिकला पाठविला. मात्र, यावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.जुन्या इमारतीच्या शेजारीच पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. याठिकाणी चिमुकले विद्यार्थी पाणी पितात. अशावेळी पावसाच्या पाण्याने शाळेची भिंत पडली तर मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश परतेती, मुख्याध्यापक राजू चौरेवार यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, वरिष्ठांनी जुनी शाळा पाडण्यासाठी मंजुरीच दिली नाही. त्यामुळे प्रकरण थंडबस्त्यात पडून आहे.याप्रकरणी सोमवारी शिक्षण विस्तार अधिकारी आर.एच. खान यांनी वरिष्ठांशी संवाद साधला असता, जुन्या शाळेच्या साहित्याचा लिलाव करण्यासाठी व शाळा इमारत पाडण्यासाठी पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी बांधकाम विभाग या सर्वांकडून प्रक्रिया पूर्ण झाली की शाळा पाडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मागील दोन वर्षांपासून शिक्षण विभागाच्या डुलक्या सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची पालकांची मागणी आहे.शाळा जीर्ण झाली. पाडण्यासाठी दोन वर्षांपासून वारंवार प्रस्ताव दिले. उडवाउडवीची उत्तरे देऊन शिक्षण विभाग वेळ मारून नेत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी लवकर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.- सतीश परतेती, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, नवीन आष्टी.प्रस्ताव मंजूर झाल्यावर लिलावाची किंमत काढून अद्यापपर्यंत मिळाली नाही. त्यामुळे शाळा पाडण्याचा विषय प्रलंबित आहे. याविषयी पाठपुरावा सुरूच आहे.- प्रमोद देशपांडे, गटशिक्षणाधिकारी, आष्टी (शहीद)