शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

वादळामुळे १० गावांत काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:14 IST

सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला. आकोली येथे वीज कोसळून तीन जनावरे ठार झाली. याच काळात भूगाव व देवळी येथील १३२ के.व्ही. वाहिनी बंद पडल्याने....

ठळक मुद्देसोसाट्याचा वारा येताच महावितरणचे पितळ उघडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला. आकोली येथे वीज कोसळून तीन जनावरे ठार झाली. याच काळात भूगाव व देवळी येथील १३२ के.व्ही. वाहिनी बंद पडल्याने तब्बल १० गावांतील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने येथे काळोखाची स्थिती असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.बंद पडलेला पुरवठा सुरळीत करण्याकरिता महावितरणची यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. यात त्यांना अपयश आल्यास या भागातील नागरिकांना रात्र अंधरात काढावी लागणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्याचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे. वर्धा शहरासह आसपासचा परिसर अंधारात गेला आहे. या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वर्धा शहर आणि परिसराला वीज पुरवठा करणारी महापारेषणची भूगाव- देवळी १३२ के व्ही. वाहिनी बंद पडली. परिणामी महावितरणच्या देवळी, भिडी, अडेगाव, सावंगी, मदनी, खरंगणा (गोड)े, म्हाडा कॉलनी, विद्युत भवन, वायफळ, वायगाव येथील वीज उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद झाला. याचा फटका या भागातील सुमारे ५० हजार वीज ग्राहकांना बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.महावितरणच्या वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तम उरकुडे यांनी हालचाल करून पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. वर्धा शहराला सेलू येथून तर मदनी, खरांगणा या उपकेंद्रावरील वीज ग्राहकांसाठी सेवाग्राम येथून वीज पुरवठा घेण्याचा महावितरणचा प्रयत्न असल्याचे कळविण्यात आले आहे.आकोली येथे वीज कोसळलीजिल्ह्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यात बऱ्याच ठिकाणी पावसासह सोसाट्याचा वारा आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आकोली परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. याच वेळी सुधाकर सायरे यांच्या शेतात वीज कोसळली. यात दोन गाई व एक गोऱ्हा ठार झाला. यासह चिकणी (जामणी ) परिसरात पावसासह असलेल्या वादळाने चांगलेच नुकसान केले.

टॅग्स :Rainपाऊस