शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

लिलाव न झाल्याने नगर पंचायतचे नुकसान

By admin | Updated: May 23, 2016 02:11 IST

नगर पंचायतच्या निवडणुका होऊन अध्यक्ष व पदाधिकारी स्थानापन्न झाले. यास १४ महिन्यांचा कालावधी लोटला;

आठवडी बाजाराचा प्रश्न : पदाधिकाऱ्यांची अनास्थासमुद्रपूर : नगर पंचायतच्या निवडणुका होऊन अध्यक्ष व पदाधिकारी स्थानापन्न झाले. यास १४ महिन्यांचा कालावधी लोटला; पण अद्यापही आठवडी बाजाराचा लिलाव करण्यात आला नाही. परिणामी, नगर पंचायतीला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. अद्याप बाजाराचा लिलाव का करण्यात आला नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगर पंचायतीला सर्वाधिक महसुली उत्पन्न देणारा आठवडी बाजार आहे. या बाजाराचा लिलाव का करण्यात आला नाही, हा प्रश्नच आहे. सदर बाजार आठ-दहा एकराच्या परिसरात भरतो. जिल्हा परिषदेच्या जुन्या बाजार ठेकेदाराकडून नाममात्र ५ हजार रुपये दराने वसुली केली जाते. प्रत्यक्षात, किमान २० हजार रुपयांवर प्रत्येक बाजाराची वसुली होते. वसुली करणारा कंत्राटदार व नगर पंचायतच्या विशिष्ट पदाधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याची चर्चा खासगी गावकट्टावर सुरू आहे. प्रत्येक बाजाराला नगर पंचायतचे १५ ते १८ हजार रुपयांचे नुकसान होते. विशेष म्हणजे जानेवारी ते मे पर्यंत बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. यानंतर पावसाळ्यात बाजार कमी प्रमाणात भरत असून वसुलीही कमी होते. यामुळेच जाणीवपूर्वक बाजाराच्या भरभराटीच्या काळात लिलाव केला जात नसल्याचे दिसून येते. यात नगर पंचायतीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध गुंतले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.एकाचवेळी स्थापन झालेली सेलू व समुद्रपूर नगर पंचायत आहे. सेलू नगर पंचायतीच्या बाजाराचा मोठ्या रकमेत एक महिन्यापूर्वी लिलाव झाला; पण समुद्रपूर नगर पंचायतच्या बाजाराचा लिलाव का होत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. समुद्रपूर नगर पंचायतीला नियमित मुख्याधिकारी नसल्याचा कांगावा केला जातो; पण सेलू नगर पंचायतीलाही नियमित मुख्याधिकारी नसताना लिलाव होतो तर समुद्रपूरला का नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.(तालुका प्रतिनिधी)