शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धामच्या पाण्याची पळवा-पळवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:06 IST

जिल्ह्यातील नागरिकांना सध्या भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील सुमारे ३१ हजारांच्यावर कुटुंबियांना धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वर्धा नगर परिषद प्रशासन काही प्रमाणात दिलासा देत आहे.

ठळक मुद्देप्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याला मिळतोय खरांगणा (मो.) मध्ये थांबा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नागरिकांना सध्या भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील सुमारे ३१ हजारांच्यावर कुटुंबियांना धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वर्धा नगर परिषद प्रशासन काही प्रमाणात दिलासा देत आहे. असे असले तरी सध्या धामच्या पाण्याच्या विषयाला अनुसरून काही पुढारी बनवा-बनवी धोरण अवलंबत आहेत. याच संधीचे सोनकरून काही जण धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची पळवा-पळवी करीत असल्याचे बघावयास मिळते.प्राप्त माहितीनुसार, ३२८.६०० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा न.प. प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते. वर्धा नगरपालिका प्रशासन प्रत्येक दिवशी धाम नदीच्या पवनार व येळाकेळी येथील पात्रातून सुमारे ३२ एमएलडी पाण्याची उचल करून उचल केलेल्या पाण्यावर प्रक्रीया करून ते त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील १५ हजारांच्यावर कुटुंबियांना करते. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उचल केलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहराशेजारी असलेल्या सुमारे १३ गावांमधील १६ हजारांच्यावर कुटुंबियांना करते. यंदाच्या वर्षी पर्जन्यमान कमी राहिल्याने सध्या भीषण जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.विशेष म्हणजे जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील नागरिकांना धाम मधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने न.प. प्रशासनाकडून सहा दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. परंतु, दुसरी बाजू लक्षात घेतली असता सध्या वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने महिन्यातून एकदाच धाम प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. अशातच खरांगणा (मोरांगणा) परिसरात धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अडविल्या जात असल्याने सध्या वर्धा शहरानजीकच्या पवनार व येळाकेळीपर्यंत कमी पाणी पोहोचत आहे. पूर्वीच धाम प्रकल्पात नाममात्र उपयुक्त जलसाठा आहे. शिवाय इतर लघु प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी सुमारे १५ दिवस सुकळी प्रकल्पाने वर्धेकरांची तहाण भागविली. अशातच पाण्याची अडवणूक होत असल्याने संंबंधित प्रशासनाने तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणी