शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

धामच्या पाण्याची पळवा-पळवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:06 IST

जिल्ह्यातील नागरिकांना सध्या भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील सुमारे ३१ हजारांच्यावर कुटुंबियांना धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वर्धा नगर परिषद प्रशासन काही प्रमाणात दिलासा देत आहे.

ठळक मुद्देप्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याला मिळतोय खरांगणा (मो.) मध्ये थांबा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नागरिकांना सध्या भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील सुमारे ३१ हजारांच्यावर कुटुंबियांना धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वर्धा नगर परिषद प्रशासन काही प्रमाणात दिलासा देत आहे. असे असले तरी सध्या धामच्या पाण्याच्या विषयाला अनुसरून काही पुढारी बनवा-बनवी धोरण अवलंबत आहेत. याच संधीचे सोनकरून काही जण धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची पळवा-पळवी करीत असल्याचे बघावयास मिळते.प्राप्त माहितीनुसार, ३२८.६०० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा न.प. प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते. वर्धा नगरपालिका प्रशासन प्रत्येक दिवशी धाम नदीच्या पवनार व येळाकेळी येथील पात्रातून सुमारे ३२ एमएलडी पाण्याची उचल करून उचल केलेल्या पाण्यावर प्रक्रीया करून ते त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील १५ हजारांच्यावर कुटुंबियांना करते. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उचल केलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहराशेजारी असलेल्या सुमारे १३ गावांमधील १६ हजारांच्यावर कुटुंबियांना करते. यंदाच्या वर्षी पर्जन्यमान कमी राहिल्याने सध्या भीषण जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.विशेष म्हणजे जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील नागरिकांना धाम मधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने न.प. प्रशासनाकडून सहा दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. परंतु, दुसरी बाजू लक्षात घेतली असता सध्या वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने महिन्यातून एकदाच धाम प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. अशातच खरांगणा (मोरांगणा) परिसरात धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अडविल्या जात असल्याने सध्या वर्धा शहरानजीकच्या पवनार व येळाकेळीपर्यंत कमी पाणी पोहोचत आहे. पूर्वीच धाम प्रकल्पात नाममात्र उपयुक्त जलसाठा आहे. शिवाय इतर लघु प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी सुमारे १५ दिवस सुकळी प्रकल्पाने वर्धेकरांची तहाण भागविली. अशातच पाण्याची अडवणूक होत असल्याने संंबंधित प्रशासनाने तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणी