शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

धामच्या पाण्याची पळवा-पळवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:06 IST

जिल्ह्यातील नागरिकांना सध्या भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील सुमारे ३१ हजारांच्यावर कुटुंबियांना धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वर्धा नगर परिषद प्रशासन काही प्रमाणात दिलासा देत आहे.

ठळक मुद्देप्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याला मिळतोय खरांगणा (मो.) मध्ये थांबा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नागरिकांना सध्या भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील सुमारे ३१ हजारांच्यावर कुटुंबियांना धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वर्धा नगर परिषद प्रशासन काही प्रमाणात दिलासा देत आहे. असे असले तरी सध्या धामच्या पाण्याच्या विषयाला अनुसरून काही पुढारी बनवा-बनवी धोरण अवलंबत आहेत. याच संधीचे सोनकरून काही जण धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची पळवा-पळवी करीत असल्याचे बघावयास मिळते.प्राप्त माहितीनुसार, ३२८.६०० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा न.प. प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते. वर्धा नगरपालिका प्रशासन प्रत्येक दिवशी धाम नदीच्या पवनार व येळाकेळी येथील पात्रातून सुमारे ३२ एमएलडी पाण्याची उचल करून उचल केलेल्या पाण्यावर प्रक्रीया करून ते त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील १५ हजारांच्यावर कुटुंबियांना करते. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उचल केलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहराशेजारी असलेल्या सुमारे १३ गावांमधील १६ हजारांच्यावर कुटुंबियांना करते. यंदाच्या वर्षी पर्जन्यमान कमी राहिल्याने सध्या भीषण जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.विशेष म्हणजे जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील नागरिकांना धाम मधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने न.प. प्रशासनाकडून सहा दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. परंतु, दुसरी बाजू लक्षात घेतली असता सध्या वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने महिन्यातून एकदाच धाम प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. अशातच खरांगणा (मोरांगणा) परिसरात धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अडविल्या जात असल्याने सध्या वर्धा शहरानजीकच्या पवनार व येळाकेळीपर्यंत कमी पाणी पोहोचत आहे. पूर्वीच धाम प्रकल्पात नाममात्र उपयुक्त जलसाठा आहे. शिवाय इतर लघु प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी सुमारे १५ दिवस सुकळी प्रकल्पाने वर्धेकरांची तहाण भागविली. अशातच पाण्याची अडवणूक होत असल्याने संंबंधित प्रशासनाने तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणी