शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने बहरली कपाशीची शेती

By admin | Updated: December 11, 2015 02:51 IST

सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. पूर्णवेळ शेतात राबूनही अपेक्षित उत्पन्न होत नाही.

एकरी २५ क्विंटल कापूस : कृषी तज्ज्ञांसह प्रगतशील शेतकऱ्यांचेही मार्गदर्शनप्रफुल्ल लुंगे सेलूसर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. पूर्णवेळ शेतात राबूनही अपेक्षित उत्पन्न होत नाही. कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढत आहे; पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत तसेच शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत शेती केली तर अपेक्षितच नव्हे तर विक्रमी उत्पादन घेऊन भरघोस नफा मिळविता येतो. हे घोराड येथील गिरीधर वरटकर या युवा शेतकऱ्याने सिद्ध केले आहे.गिरीधर वरटकर हे शिक्षक आहे; पण त्यांना शेतीची मनापासून आवड आहे. ते आपल्या शेतात विविध प्रयोग करतात. शेजारच्या शेतकऱ्यांनाही हे प्रयोग पे्ररणादायी ठरावे, हा त्यांचा खराटोप असतो. त्यांनी यंदा दोन एकर शेतात कपाशीची लागवड केली. प्रायोगिक तत्वावर नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी केला. पट्टा पद्धतीने तीन बाय सहा, अशा पद्धतीने लागवड करून लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने खत दिले. आतापर्यंत खताच्या चार मात्रा झाल्या. किडीचा नायनाट करण्यासाठी कृषी तज्ञांचा सल्ला घेत चार वेळा फवारणी केली. गरजेनुसार पाणी दिले. झाडाची वाढ जोमदार झाल्याने दोन ओळीतील अंतर सहा फुटाचे असताना झाड वाकू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी बांबू लावून तार व दोरीच्या साह्याने झाडांची फांदी बांधली. यामुळे झाड सरळ उभे राहिले. आज या झाडांची उंची साडे पाच ते सहा फुट असून प्रत्येक झाडाला १५० ग्रॅम वजनाच्या वर बोंड आहे. आजपर्यंत साडे बारा क्विंटल प्रती एकर कापूस वेचून झाला आहे. त्यांना एकरी २५ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. दोन एकरात ५० क्विंटल कापूस होईल, असे शेतीला भेट देणाऱ्या कृषीतज्ज्ञांचे मत आहे.कृषी तज्ज्ञांसह वरटकर यांना अंबोडा (यवतमाळ) येथील प्रगतशील शेतकरी अमृत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांनीही पिकांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.