शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने बहरली कपाशीची शेती

By admin | Updated: December 11, 2015 02:51 IST

सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. पूर्णवेळ शेतात राबूनही अपेक्षित उत्पन्न होत नाही.

एकरी २५ क्विंटल कापूस : कृषी तज्ज्ञांसह प्रगतशील शेतकऱ्यांचेही मार्गदर्शनप्रफुल्ल लुंगे सेलूसर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. पूर्णवेळ शेतात राबूनही अपेक्षित उत्पन्न होत नाही. कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढत आहे; पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत तसेच शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत शेती केली तर अपेक्षितच नव्हे तर विक्रमी उत्पादन घेऊन भरघोस नफा मिळविता येतो. हे घोराड येथील गिरीधर वरटकर या युवा शेतकऱ्याने सिद्ध केले आहे.गिरीधर वरटकर हे शिक्षक आहे; पण त्यांना शेतीची मनापासून आवड आहे. ते आपल्या शेतात विविध प्रयोग करतात. शेजारच्या शेतकऱ्यांनाही हे प्रयोग पे्ररणादायी ठरावे, हा त्यांचा खराटोप असतो. त्यांनी यंदा दोन एकर शेतात कपाशीची लागवड केली. प्रायोगिक तत्वावर नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी केला. पट्टा पद्धतीने तीन बाय सहा, अशा पद्धतीने लागवड करून लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने खत दिले. आतापर्यंत खताच्या चार मात्रा झाल्या. किडीचा नायनाट करण्यासाठी कृषी तज्ञांचा सल्ला घेत चार वेळा फवारणी केली. गरजेनुसार पाणी दिले. झाडाची वाढ जोमदार झाल्याने दोन ओळीतील अंतर सहा फुटाचे असताना झाड वाकू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी बांबू लावून तार व दोरीच्या साह्याने झाडांची फांदी बांधली. यामुळे झाड सरळ उभे राहिले. आज या झाडांची उंची साडे पाच ते सहा फुट असून प्रत्येक झाडाला १५० ग्रॅम वजनाच्या वर बोंड आहे. आजपर्यंत साडे बारा क्विंटल प्रती एकर कापूस वेचून झाला आहे. त्यांना एकरी २५ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. दोन एकरात ५० क्विंटल कापूस होईल, असे शेतीला भेट देणाऱ्या कृषीतज्ज्ञांचे मत आहे.कृषी तज्ज्ञांसह वरटकर यांना अंबोडा (यवतमाळ) येथील प्रगतशील शेतकरी अमृत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांनीही पिकांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.