शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

बंधाऱ्याच्या ‘बॅक वॉटर’मुळे पीक जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

शेत परिसराला तलावाचे रूप आले होते. शेतात तीन फूटापयंंत पाणी साचल्याने कपाशीचे संपूर्ण पीक नष्ट झाले. यामध्ये संबंधीत शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे यशोदा नदी ते नांदोरा व ईसापूर परिसरातील भाग जलमय होवून पाण्याची पातळी वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देनियोजनशून्यतेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान : शासकीय अधिकाºयांचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्थानिक यशोदा नदीवर नव्यानेच बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील बॅकवॉटर शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतात तलाव सदृष परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे तब्बल साडेचार एकरातील कपाशीचे पीक पूर्णत: नष्ट झाल्याने शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. याची दखल घेत आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्याने खासदार रामदास तडस, तहसीलदार राजेश सरवदे यांना निवेदनातून केली आहे.स्थानिक यशोदा नदी व ईसापूर नदीच्या संगम पॉर्इंटवर देवळी येथील शेतकरी प्रकाश गोविंद फिसके यांचे साडेचार एकर शेत आहे. त्यांनी शेतात हंगामाच्या सुरूवातीलाच मोठ्या प्रमाणात खर्च करून कपाशी पिकाची लागवड केली. कपाशीचे पीक चांगले आले असताना तसेच डवरणी व खते देण्याची कामे पूर्णत्त्वात गेली असतानाच मंगळवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने नदीवरील बंधाऱ्याचे बॅकवॉटर शेतकऱ्याच्या शेतात शिरल्याने उभे पीक पाण्याखाली गेले. शेत परिसराला तलावाचे रूप आले होते. शेतात तीन फूटापयंंत पाणी साचल्याने कपाशीचे संपूर्ण पीक नष्ट झाले. यामध्ये संबंधीत शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे यशोदा नदी ते नांदोरा व ईसापूर परिसरातील भाग जलमय होवून पाण्याची पातळी वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, केंद्र शासनाच्या या कामात कोणतेही नियोजन नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना याचा फटका बसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यशोदा नदी व ईसापूर नदी पात्राचे खोलीकरण तसेच नदीच्या आजूबाजुला भरावा देण्याचे काम अजूनपर्यंत हाती घेण्यात न आल्यामुळे ही परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शासनस्तरीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.पाच कोटी खर्चून बंधारा निर्माणाधीनशासनाच्या केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत नाविन्यपूर्ण योजनेतून यशोदा नदीवरील बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. हा बंधारा सुमारे पाच कोटी रूपये खर्चून बांधण्यात येत असला तरी याकडे मात्र, शासनाचेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. देशस्तरावर बांधण्यात येत असलेल्या पाच बंधाऱ्यांपैकी हा एक बंधारा असल्याचे सांगितले जात आहे. पण, शासनाच्या नियोजनशुन्यतेचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे बंधाऱ्यातील बॅकवॉटर शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती