शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
3
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
4
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
5
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
6
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
7
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
8
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
9
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
10
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
11
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
12
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
13
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
14
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
15
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
16
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
17
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
18
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
19
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना

कृषी कार्यालयाला भुईमुगाच्या पिकाचे तोरण

By admin | Updated: May 26, 2016 00:25 IST

शेतकऱ्यांना कृषी विभागाने भुईमुगाचे बियाणे दिले. अन्य वाणाची मागणी होत असताना कृषी विभागाने भलतेच बियाणे दिले.

अंतोरा येथील शेतकऱ्यांचे आंदोलन : चार दिवसांचा अल्टीमेटमवर्धा : शेतकऱ्यांना कृषी विभागाने भुईमुगाचे बियाणे दिले. अन्य वाणाची मागणी होत असताना कृषी विभागाने भलतेच बियाणे दिले. या बियाण्यांची झाडे वाढली; पण चार महिने लोटूनही शेंगाच आल्या नाही. शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला. यामुळे एकरी ५० हजार रुपये भरपाई देण्याच्या मागणीसाठी बुधवारी अंतोरा येथील शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयाला भुईमुगाच्या झाडांचे तोरण लावले. शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून जानेवारी महिन्यात के ६ जातीचे भुईमूग बियाणे दिले. यात लोकवाटा १५०० रुपये भरून ३० किलो बियाणे दिले. पेरणीस १०० ते १२५ दिवसांचा कालावधी लोटूनही शेंगाच आल्या नाही. यामुळे चौकशी करून सात दिवसांत न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. अन्यथा आष्टी तालुका कृषी कार्यालयासमोर शेतकरी सामूहिक आत्मदहन करतील, असा इशाराही देण्यात आला. चनशेट्टी यांना निवेदन देताना भाजयुमोचे बाळा जगताप, नितीन कपले, प्रशांत केचे, गजानन आंबेकर, राजेश ठाकरे, विनोद देशमुख, आकाश चौधरी, प्रशांत केचे, प्रशांत पांडे, अजय व नरेंद्र कोहळे, प्रशांत देशमुख, ज्ञानेश्वर केचे, बालू केचे, ठाकरे, तडस यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)शेतकऱ्यांचा एकरी २५ हजारांचा खर्च गेला वायाकृषी विभागाकडून आष्टी तालुक्यातील १७० शेतकऱ्यांना भुईमूग बियाणे देण्यात आले. हे बियाणे उगवले; पण पिकाचा कालावधी लोटूनही शेंगाच लागल्या नाही. यामुळे शेतकऱ्यांचा एकरी २५ हजार रुपयांचा खर्च वाया गेला. शिवाय पिकांचा कालावधीही निघून गेला असून आता खरीप हंगामाची तयार करावी लागणार आहे. यामुळे भरपाई देण्याची मागणी होत आहे.रोजंदारी महिला कामगारांचे धरणे आंदोलनकृषी विभागाच्या फळरोपवाटिका, टीसीडी फार्म व बिजगुणन केंद्रावर कार्यरत कामगार महिलांना नियमित कामे दिली जात नाही. शिवाय वेतनही वेळेवर दिले जात नाही. यामुळे महिलांनी सिटूच्या नेतृत्वात बुधवारी कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.कृषी विभाग वर्धा अंतर्गत तालुका फळरोपवाटिका, टीसीडी फार्म तसेच बिजगुणन केंद्रावर १९८२ ते एप्रिल २०१६ पर्यंत सलग ३० ते ३४ वर्षांपासून रोजंदारी कामगार काही महिला कार्यरत होत्या. दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे जुन्या कामगारांना डावलून नवीन कामगारांना कामावर ठेवले जाते.संबंधित कामगार तालुका फळरोपवाटिका, टीसीडी फार्म व बिजगुणन केंद्र हे कार्यान्वित झाल्यापासून रोजंदारीवर कार्यरत होते. त्यांना प्रारंभी ४ रुपये प्रती दिवस रोज होता. आता १२० रुपयांप्रमाणे मजुरी दिली जात आहे. नवीन निर्णयानुसार ती वाढून १७० रुपये करण्यात आली. याबाबत कृषी विभागाशी चर्चा होऊनही अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही.या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.