शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

२०८ गावांची पीक पैसेवारी ५० पैशाच्या आत

By admin | Updated: January 10, 2015 01:50 IST

तालुक्यात २०१४ च्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने व गारपिटीने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला.

आर्वी : तालुक्यात २०१४ च्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने व गारपिटीने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. महसूल विभागाच्या सर्व्हेक्षणात तालुक्यातील २०८ गावांपैकी १७२ गावांचीच पैसेवारी ५० पैशाच्या आत दाखविली होती. त्यामुळे तालुक्यातील ३६ गावे शासन अनुदानापासून वंचित होती. याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे आता नव्या सर्वेक्षणात आर्वी तालुक्यातील उरलेल्या ३६ गावांची पैसेवारीही ५० च्या आत आली आहे. मागील हंगामात आर्वी तालुक्यातील सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेले. कपाशी व तुरीच्या पिकांनाही याचा फटका बसला होता. याबाबत शासकीय स्तरावरून सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील २०८ गावांपैकी १७२ गावांचीच पीक पैसेवारी ही ५० पैशाच्या आत दाखविण्यात आली. ३६ गावांची आणेवारी ही ५० पैशाच्या वर दाखविल्याने या गावांतील नागरिकांवर अन्याय झाला होता. याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा करून या संदर्भात प्रशासनास दखल घेण्यास भाग पाडले. त्यामुळे आता नव्याने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५० पैसे पैसेवारी खाली आर्वी तालुक्यातील उर्वरित ३६ गावांचाही समावेश करण्यात आल्याने तालुक्यातील सर्व १०८ गावेही दुष्काळग्रस्त ठरली आहे. याबाबत लोकमतने सातत्याने नापिकी संदर्भात बातमी लावून धरली होती. आर्वी तालुक्यातील ३६ गावे नव्याने ५० पैसेवारीच्या आत आल्याने या गावांतील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त सर्वेक्षणात ५० पैशाच्या आतील आणेवारीत ही गावे वगळण्यात आली होती. १७२ गावांचाच ५० च्या आत पैसेवारीत समावेश आधी करण्यात आला होता. ३६ गावातही दुष्काळी परिस्थिती होती. तरीही त्यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे आपल्यावर अन्याय केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होती. त्यामुळे या गावांचा समावेशही ५० पैसे आणेवारीच्या आत करण्याची मागणी वारंवार शेतकरी करीत होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने याची दखल घेत उर्वरीत तालुक्यातील ३६ गावांचाही ५० पैसेवारीच्या आत समावेश केल्याने तालुक्यातील सर्व २०८ गावे दुष्काळाच्या छायेत आली आहे.(तालुका प्रतिनिधी)