शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

२०८ गावांची पीक पैसेवारी ५० पैशाच्या आत

By admin | Updated: January 10, 2015 01:50 IST

तालुक्यात २०१४ च्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने व गारपिटीने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला.

आर्वी : तालुक्यात २०१४ च्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने व गारपिटीने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. महसूल विभागाच्या सर्व्हेक्षणात तालुक्यातील २०८ गावांपैकी १७२ गावांचीच पैसेवारी ५० पैशाच्या आत दाखविली होती. त्यामुळे तालुक्यातील ३६ गावे शासन अनुदानापासून वंचित होती. याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे आता नव्या सर्वेक्षणात आर्वी तालुक्यातील उरलेल्या ३६ गावांची पैसेवारीही ५० च्या आत आली आहे. मागील हंगामात आर्वी तालुक्यातील सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेले. कपाशी व तुरीच्या पिकांनाही याचा फटका बसला होता. याबाबत शासकीय स्तरावरून सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील २०८ गावांपैकी १७२ गावांचीच पीक पैसेवारी ही ५० पैशाच्या आत दाखविण्यात आली. ३६ गावांची आणेवारी ही ५० पैशाच्या वर दाखविल्याने या गावांतील नागरिकांवर अन्याय झाला होता. याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा करून या संदर्भात प्रशासनास दखल घेण्यास भाग पाडले. त्यामुळे आता नव्याने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५० पैसे पैसेवारी खाली आर्वी तालुक्यातील उर्वरित ३६ गावांचाही समावेश करण्यात आल्याने तालुक्यातील सर्व १०८ गावेही दुष्काळग्रस्त ठरली आहे. याबाबत लोकमतने सातत्याने नापिकी संदर्भात बातमी लावून धरली होती. आर्वी तालुक्यातील ३६ गावे नव्याने ५० पैसेवारीच्या आत आल्याने या गावांतील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त सर्वेक्षणात ५० पैशाच्या आतील आणेवारीत ही गावे वगळण्यात आली होती. १७२ गावांचाच ५० च्या आत पैसेवारीत समावेश आधी करण्यात आला होता. ३६ गावातही दुष्काळी परिस्थिती होती. तरीही त्यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे आपल्यावर अन्याय केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होती. त्यामुळे या गावांचा समावेशही ५० पैसे आणेवारीच्या आत करण्याची मागणी वारंवार शेतकरी करीत होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने याची दखल घेत उर्वरीत तालुक्यातील ३६ गावांचाही ५० पैसेवारीच्या आत समावेश केल्याने तालुक्यातील सर्व २०८ गावे दुष्काळाच्या छायेत आली आहे.(तालुका प्रतिनिधी)