शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मजुरांच्या मानसिकतेचे कापसावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:05 IST

यंदा कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती सप्टेंबर महिन्यापर्यंत होतीे; पण बोंडअळीने कापूस उत्पादनावर परिणाम झाला. कापूस चिकट व हलका आहे, अशी कारणे पूढे करीत मजूर दररोज वेचणीचे भाव वाढवित आहे.

ठळक मुद्देदररोज वाढविले जातात भाव : एक क्विंटल कापूस विकल्यानंतर मजुरी कापून मिळते अर्धीच रक्कम

फणिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : यंदा कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती सप्टेंबर महिन्यापर्यंत होतीे; पण बोंडअळीने कापूस उत्पादनावर परिणाम झाला. कापूस चिकट व हलका आहे, अशी कारणे पूढे करीत मजूर दररोज वेचणीचे भाव वाढवित आहे. यामुळे कापूस उत्पादक आर्थिक चिंतेत आहे.आर्थिक निकड भागविण्यासाठी आधीच कापूस विकलेले शेतकरी भाववाढीमुळे कपाळावर हात मारून घेत आहे. शेतकºयांच्या श्रमशक्तीवर गब्बर होण्याची संधी मिळाल्याने खासगी व्यापारी आनंदी आहे. यंदा भरपूर पाऊस येईल, हा हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. विदर्भात सरासरीच्या निम्मे पाऊस झाला. विशिष्ट दिवसांनी नियमित पाऊस आल्याने पिकाची चांगली वाढ झाली. यंदा कापसाचे उत्पन्न समाधानकारक होईल, अशी अपेक्षा होती; पण दिवाळीच्या पर्वावर विदर्भात ढगाळी वातावरण व हलक्या पावसामुळे कपाशीचे बुड, बोंडे सडून एकरी २-३ क्विंटलचा फटका बसला. बोंडे परिपक्व होऊन फुटण्याऐवजी दोन कळ्या चांगल्या तर दोन किडग्रस्त फुटत होत्या. शेतकºयांनी हिरवी बोंडे फोडून पाहिली असता प्रत्येक बोंडात शेंदरी बोंडअळी दिसून आली. बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही, हा कंपनीचा दावा खोटा ठरवित विदर्भातील कापूस बोंडअळीने फस्त केला. यामुळे अनेकांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरिवला.काहींनी कापूस वेचण्याचा प्रयत्न केला; पण मजूर १२० रुपये मन प्रमाणे वेचणीस आले. एक दिवस कापूस वेचल्यानंतर मजुरांनी कापूस चिकट आहे, बरोबर निघत नाही व हलका आहे, ही कारणे पूढे करून १५० रुपये भाव द्याल तर उद्या येतो वा येणार नाही, अशी तंबी देणे सुरू केले. शेतकºयांना पर्याय नसल्याने मजुरांना मागेल ती मजुुरी द्यावी लागली. हा कापूस घरी येताच शेतकºयांनी ३५०० ते ४००० रुपयांत खासगी व्यापाºयांना विकला. आता दुसरी व अंतिम वेचणी सुरू आहे. यासाठी मजूर मिळणे कठीण झाले. मजुरांसाठी शेतकरी भटकत आहे; पण मजूर मिळत नाही. कापूस शेतात वाळत आहे. उपलब्ध मजूर २०० रुपये रोज मागत आहे. पूर्वी पायी जाणाºया मजुरांना आता एक किमी अंतरासाठीही वाहनाची व्यवस्था करावी लागते. पूर्वी दलालाशिवाय मजूर येत होते. आता ठेकेदाराशिवाय मजूर मिळत नाही. कामाशिवाय ठेकेदार दररोज शेतकºयांना लुटत आहे. मजूर दररोज भाव वाढविण्याची धमकी देत आहे. मजुरांची चणचण, वेचणीचे न परवडणारे दर व कापसाच्या वजनघटीने शेतकरी त्रस्त आहे. मजुरांची ही मानसिकता शेतकºयांना शेतीपासून परावृत्त करीत आहे. दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असल्याने मजुरांनी शेतकºयांप्रती सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे झाले आहे.वाहन, ठेकेदाराविना मजूर नाहीमजुरीशिवाय दहा मजूर आणण्याचे गाडी भाडे ७०० रुपये व प्रती मजूर २० रुपये ठेकेदाराला हे सर्व पकडून प्रारंभीची कापूस वेचणी प्रती क्विंटल १००० ते १२०० रुपये पडली. आता मजुरांनी दर वाढवित २०० रुपये मागत आहे. यामुळे कापूस वेचणे परवडत नसल्याचे दिसते.

टॅग्स :cottonकापूस