शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या मानसिकतेचे कापसावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:05 IST

यंदा कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती सप्टेंबर महिन्यापर्यंत होतीे; पण बोंडअळीने कापूस उत्पादनावर परिणाम झाला. कापूस चिकट व हलका आहे, अशी कारणे पूढे करीत मजूर दररोज वेचणीचे भाव वाढवित आहे.

ठळक मुद्देदररोज वाढविले जातात भाव : एक क्विंटल कापूस विकल्यानंतर मजुरी कापून मिळते अर्धीच रक्कम

फणिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : यंदा कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती सप्टेंबर महिन्यापर्यंत होतीे; पण बोंडअळीने कापूस उत्पादनावर परिणाम झाला. कापूस चिकट व हलका आहे, अशी कारणे पूढे करीत मजूर दररोज वेचणीचे भाव वाढवित आहे. यामुळे कापूस उत्पादक आर्थिक चिंतेत आहे.आर्थिक निकड भागविण्यासाठी आधीच कापूस विकलेले शेतकरी भाववाढीमुळे कपाळावर हात मारून घेत आहे. शेतकºयांच्या श्रमशक्तीवर गब्बर होण्याची संधी मिळाल्याने खासगी व्यापारी आनंदी आहे. यंदा भरपूर पाऊस येईल, हा हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. विदर्भात सरासरीच्या निम्मे पाऊस झाला. विशिष्ट दिवसांनी नियमित पाऊस आल्याने पिकाची चांगली वाढ झाली. यंदा कापसाचे उत्पन्न समाधानकारक होईल, अशी अपेक्षा होती; पण दिवाळीच्या पर्वावर विदर्भात ढगाळी वातावरण व हलक्या पावसामुळे कपाशीचे बुड, बोंडे सडून एकरी २-३ क्विंटलचा फटका बसला. बोंडे परिपक्व होऊन फुटण्याऐवजी दोन कळ्या चांगल्या तर दोन किडग्रस्त फुटत होत्या. शेतकºयांनी हिरवी बोंडे फोडून पाहिली असता प्रत्येक बोंडात शेंदरी बोंडअळी दिसून आली. बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही, हा कंपनीचा दावा खोटा ठरवित विदर्भातील कापूस बोंडअळीने फस्त केला. यामुळे अनेकांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरिवला.काहींनी कापूस वेचण्याचा प्रयत्न केला; पण मजूर १२० रुपये मन प्रमाणे वेचणीस आले. एक दिवस कापूस वेचल्यानंतर मजुरांनी कापूस चिकट आहे, बरोबर निघत नाही व हलका आहे, ही कारणे पूढे करून १५० रुपये भाव द्याल तर उद्या येतो वा येणार नाही, अशी तंबी देणे सुरू केले. शेतकºयांना पर्याय नसल्याने मजुरांना मागेल ती मजुुरी द्यावी लागली. हा कापूस घरी येताच शेतकºयांनी ३५०० ते ४००० रुपयांत खासगी व्यापाºयांना विकला. आता दुसरी व अंतिम वेचणी सुरू आहे. यासाठी मजूर मिळणे कठीण झाले. मजुरांसाठी शेतकरी भटकत आहे; पण मजूर मिळत नाही. कापूस शेतात वाळत आहे. उपलब्ध मजूर २०० रुपये रोज मागत आहे. पूर्वी पायी जाणाºया मजुरांना आता एक किमी अंतरासाठीही वाहनाची व्यवस्था करावी लागते. पूर्वी दलालाशिवाय मजूर येत होते. आता ठेकेदाराशिवाय मजूर मिळत नाही. कामाशिवाय ठेकेदार दररोज शेतकºयांना लुटत आहे. मजूर दररोज भाव वाढविण्याची धमकी देत आहे. मजुरांची चणचण, वेचणीचे न परवडणारे दर व कापसाच्या वजनघटीने शेतकरी त्रस्त आहे. मजुरांची ही मानसिकता शेतकºयांना शेतीपासून परावृत्त करीत आहे. दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असल्याने मजुरांनी शेतकºयांप्रती सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे झाले आहे.वाहन, ठेकेदाराविना मजूर नाहीमजुरीशिवाय दहा मजूर आणण्याचे गाडी भाडे ७०० रुपये व प्रती मजूर २० रुपये ठेकेदाराला हे सर्व पकडून प्रारंभीची कापूस वेचणी प्रती क्विंटल १००० ते १२०० रुपये पडली. आता मजुरांनी दर वाढवित २०० रुपये मागत आहे. यामुळे कापूस वेचणे परवडत नसल्याचे दिसते.

टॅग्स :cottonकापूस