शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

गुन्ह्याचे प्रमाण २७५ वरून १९८

By admin | Updated: June 26, 2017 00:32 IST

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समाजातील प्रत्येक स्तरातून समजावून सांगितले जात आहे;

कारवाईचा बडगा : अवैध वृक्षतोडीवर वनविभागाचा वॉच महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समाजातील प्रत्येक स्तरातून समजावून सांगितले जात आहे; पण वन्यप्राण्यांसह मनुष्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या वनसंपदेची अवैध कत्तल मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे वास्तव आहे. वन विभागाच्या व्यापक उपायोजनांची यंदा प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्याने अवैध वृक्ष कत्तलीला आळा घालण्यात वन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. गतवर्षी अवैध वृक्षतोडीच्या २७५ गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली होती तर यंदा हा आकडा १९८ इतका असल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. मध्यंतरीच्या काळात अवैध वृक्षतोडीला जिल्ह्यात उधान आले होते. परिणामी, या प्रकाराला आळा घालण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियोजनबद्द कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून करून घेतली. नागरिकांच्या तक्रारींकडे जिल्ह्यातील वन विभागातील अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देत झटपट कार्यवाही करण्याला प्राधान्य दिले. सन २०१५-१६ मध्ये अवैध वृक्षतोडीच्या २७५ गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली होती. त्यावेळी ७५ आरोपींना वन कोठडीत पाठविण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले. सन २०१६-१७ मध्ये वरिष्ठांनी आखून दिलेल्या प्रभावी उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात आल्याने अवैध वृक्ष कत्तलीच्या प्रकाराला बऱ्यापैकी आळा बसत या आकड्यात कमालीची घसरण झाली. २०१६-१७ मध्ये १९८ गुन्ह्यांची नोंद घेत २८ आरोपींना वनकोठडीत डांबण्यात यश आले आहे. तक्रारीकरिता हॅलो फॉरेस्ट अवैध वृक्षकत्तलीला आळा घालण्यासाठी जानेवारी २०१७ पासून शासनाद्वारे हॅलो फॉरेस्ट कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. यावर प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेतली जात असल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. दोन वर्षांत १,४१० वृक्षांची अवैध कत्तल अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यात वनविभागाला बऱ्यापैकी यश आले असले तरी २०१५-१६ मध्ये सागवान तस्करांनी ८२९ तर २०१६-१७ मध्ये ५८१ वृक्षांची कत्तल केली आहे. यात २०१५-१६ मध्ये ४ लाख ९२ हजार ९१० व २०१६-१७ मध्ये ४ लाख ८८ हजार ४६५ रुपयांच्या वनसंपदेचे नुकसान केले. दोन वर्षांत अवैध पद्धतीने १ हजार ४१० वृक्ष तोडून एकूण ९ लाख ८१ हजार ३७५ रुपयांचे नुकसान अवैध वृक्षांची कत्तल करणाऱ्यांनी केले असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे. ८.११ हजारांचा दंड वन विभागाने ठिकठिकाणी कार्यवाही करून विना परवाना वाहतूक केल्या जाणारा लाकूड साठा मोठ्या प्रमाणात पकडला. २०१५-१६ मध्ये ६२९ नग (३२.००६ घ.मी.) तर २०१६-१७ मध्ये ४५० नग (३३.८६७ घ.मी.) लाकूड पकडून वर्षनिहाय अनुक्रमे ४ लाख १३ हजार ४६२ रुपये आणि ३ लाख ९७ हजार ५५४ रुपये, अशी एकूण ८ लाख ११ हजार १६ रुपयांची वसुली केली.