शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्याचे प्रमाण २७५ वरून १९८

By admin | Updated: June 26, 2017 00:32 IST

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समाजातील प्रत्येक स्तरातून समजावून सांगितले जात आहे;

कारवाईचा बडगा : अवैध वृक्षतोडीवर वनविभागाचा वॉच महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समाजातील प्रत्येक स्तरातून समजावून सांगितले जात आहे; पण वन्यप्राण्यांसह मनुष्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या वनसंपदेची अवैध कत्तल मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे वास्तव आहे. वन विभागाच्या व्यापक उपायोजनांची यंदा प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्याने अवैध वृक्ष कत्तलीला आळा घालण्यात वन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. गतवर्षी अवैध वृक्षतोडीच्या २७५ गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली होती तर यंदा हा आकडा १९८ इतका असल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. मध्यंतरीच्या काळात अवैध वृक्षतोडीला जिल्ह्यात उधान आले होते. परिणामी, या प्रकाराला आळा घालण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियोजनबद्द कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून करून घेतली. नागरिकांच्या तक्रारींकडे जिल्ह्यातील वन विभागातील अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देत झटपट कार्यवाही करण्याला प्राधान्य दिले. सन २०१५-१६ मध्ये अवैध वृक्षतोडीच्या २७५ गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली होती. त्यावेळी ७५ आरोपींना वन कोठडीत पाठविण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले. सन २०१६-१७ मध्ये वरिष्ठांनी आखून दिलेल्या प्रभावी उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात आल्याने अवैध वृक्ष कत्तलीच्या प्रकाराला बऱ्यापैकी आळा बसत या आकड्यात कमालीची घसरण झाली. २०१६-१७ मध्ये १९८ गुन्ह्यांची नोंद घेत २८ आरोपींना वनकोठडीत डांबण्यात यश आले आहे. तक्रारीकरिता हॅलो फॉरेस्ट अवैध वृक्षकत्तलीला आळा घालण्यासाठी जानेवारी २०१७ पासून शासनाद्वारे हॅलो फॉरेस्ट कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. यावर प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेतली जात असल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. दोन वर्षांत १,४१० वृक्षांची अवैध कत्तल अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यात वनविभागाला बऱ्यापैकी यश आले असले तरी २०१५-१६ मध्ये सागवान तस्करांनी ८२९ तर २०१६-१७ मध्ये ५८१ वृक्षांची कत्तल केली आहे. यात २०१५-१६ मध्ये ४ लाख ९२ हजार ९१० व २०१६-१७ मध्ये ४ लाख ८८ हजार ४६५ रुपयांच्या वनसंपदेचे नुकसान केले. दोन वर्षांत अवैध पद्धतीने १ हजार ४१० वृक्ष तोडून एकूण ९ लाख ८१ हजार ३७५ रुपयांचे नुकसान अवैध वृक्षांची कत्तल करणाऱ्यांनी केले असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे. ८.११ हजारांचा दंड वन विभागाने ठिकठिकाणी कार्यवाही करून विना परवाना वाहतूक केल्या जाणारा लाकूड साठा मोठ्या प्रमाणात पकडला. २०१५-१६ मध्ये ६२९ नग (३२.००६ घ.मी.) तर २०१६-१७ मध्ये ४५० नग (३३.८६७ घ.मी.) लाकूड पकडून वर्षनिहाय अनुक्रमे ४ लाख १३ हजार ४६२ रुपये आणि ३ लाख ९७ हजार ५५४ रुपये, अशी एकूण ८ लाख ११ हजार १६ रुपयांची वसुली केली.