शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

गुन्ह्याचे प्रमाण २७५ वरून १९८

By admin | Updated: June 26, 2017 00:32 IST

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समाजातील प्रत्येक स्तरातून समजावून सांगितले जात आहे;

कारवाईचा बडगा : अवैध वृक्षतोडीवर वनविभागाचा वॉच महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समाजातील प्रत्येक स्तरातून समजावून सांगितले जात आहे; पण वन्यप्राण्यांसह मनुष्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या वनसंपदेची अवैध कत्तल मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे वास्तव आहे. वन विभागाच्या व्यापक उपायोजनांची यंदा प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्याने अवैध वृक्ष कत्तलीला आळा घालण्यात वन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. गतवर्षी अवैध वृक्षतोडीच्या २७५ गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली होती तर यंदा हा आकडा १९८ इतका असल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. मध्यंतरीच्या काळात अवैध वृक्षतोडीला जिल्ह्यात उधान आले होते. परिणामी, या प्रकाराला आळा घालण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियोजनबद्द कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून करून घेतली. नागरिकांच्या तक्रारींकडे जिल्ह्यातील वन विभागातील अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देत झटपट कार्यवाही करण्याला प्राधान्य दिले. सन २०१५-१६ मध्ये अवैध वृक्षतोडीच्या २७५ गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली होती. त्यावेळी ७५ आरोपींना वन कोठडीत पाठविण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले. सन २०१६-१७ मध्ये वरिष्ठांनी आखून दिलेल्या प्रभावी उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात आल्याने अवैध वृक्ष कत्तलीच्या प्रकाराला बऱ्यापैकी आळा बसत या आकड्यात कमालीची घसरण झाली. २०१६-१७ मध्ये १९८ गुन्ह्यांची नोंद घेत २८ आरोपींना वनकोठडीत डांबण्यात यश आले आहे. तक्रारीकरिता हॅलो फॉरेस्ट अवैध वृक्षकत्तलीला आळा घालण्यासाठी जानेवारी २०१७ पासून शासनाद्वारे हॅलो फॉरेस्ट कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. यावर प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेतली जात असल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. दोन वर्षांत १,४१० वृक्षांची अवैध कत्तल अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यात वनविभागाला बऱ्यापैकी यश आले असले तरी २०१५-१६ मध्ये सागवान तस्करांनी ८२९ तर २०१६-१७ मध्ये ५८१ वृक्षांची कत्तल केली आहे. यात २०१५-१६ मध्ये ४ लाख ९२ हजार ९१० व २०१६-१७ मध्ये ४ लाख ८८ हजार ४६५ रुपयांच्या वनसंपदेचे नुकसान केले. दोन वर्षांत अवैध पद्धतीने १ हजार ४१० वृक्ष तोडून एकूण ९ लाख ८१ हजार ३७५ रुपयांचे नुकसान अवैध वृक्षांची कत्तल करणाऱ्यांनी केले असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे. ८.११ हजारांचा दंड वन विभागाने ठिकठिकाणी कार्यवाही करून विना परवाना वाहतूक केल्या जाणारा लाकूड साठा मोठ्या प्रमाणात पकडला. २०१५-१६ मध्ये ६२९ नग (३२.००६ घ.मी.) तर २०१६-१७ मध्ये ४५० नग (३३.८६७ घ.मी.) लाकूड पकडून वर्षनिहाय अनुक्रमे ४ लाख १३ हजार ४६२ रुपये आणि ३ लाख ९७ हजार ५५४ रुपये, अशी एकूण ८ लाख ११ हजार १६ रुपयांची वसुली केली.