शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

कोट्यवधीच्या विकासकामांना अल्पावधीत तडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:27 IST

शहरातील विकास कामांकरिता नगरपालिकेला १० कोटी रुपयाचा विशेष निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध विकास कामे केली जात असून ही कामे नियमबाह्य तसेच सदोष असल्याने निधीची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देनिधींची उधळपट्टी : अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रस्ता व नालींचे नियमबाह्य बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : शहरातील विकास कामांकरिता नगरपालिकेला १० कोटी रुपयाचा विशेष निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध विकास कामे केली जात असून ही कामे नियमबाह्य तसेच सदोष असल्याने निधीची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा यांच्या माध्यमातून शहरात १० कोटी रुपयांची विकास कामे सुरु आहे. या निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक ७ मधील सेलडोह-सिंदी-कांढळी रस्ता व राज्य मार्ग ३३० ते माता मंदिर या रस्त्यांकरिता १ कोटी ५२ लाख ७८ हजार ३४३ रुपयाचा निधी खर्च करण्यात येत आहे. हा रस्ता नदीलगत असून पूरपिडित क्षेत्रात येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला नियमानुसार मोठी व उंच संरक्षण भिंत देणे आवश्यक असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराच्या हितापोटी केवळ पाच फुट उंचीचीच भिंत दाखवून कामाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली.नदीलगतच्या पुरपिडीत क्षेत्रात नियमानुसार कुठल्याही बांधकामाकरिता तांत्रिक मंजुरी मिळत नसतानाही बांधकाम विभागाने या परिसरातील बांधकामाला मंजूरी देत या बांधकामाचा कंत्राट वर्ध्यातील कदम नामक कंत्राटदाराला दिला आहे.या कंत्राटदाराने रस्त्यावरील विद्यूत पोल कायम ठेवूनच बांधकाम सुरु केले आहे. तसेच बांधण्यात आलेल्या नालीचाही योग्य उतार काढला नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नालीच्या या उतारामुळे तेजराम नरड यांच्या घराजवळील नालीत सांडपाणी तुंंबले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या नालीतील पाणी वाहून जाण्याकरिता ठिकठिकाणी सिमेंटचे पाईप टाकण्याची गरज असताना कंत्राटदाराने सिमेंटच्या पाईपाऐवजी टिनपत्र्याचा गोल ड्रम तयार करून टाकण्यात आला. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी वाहून जात नसल्याने अडचणी वाढल्या. तसेच या नालीला आत्तापासूनच भेगा पडल्याने रस्ता व नालीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. येथील नदीवरही पुलाचे बांधकाम करण्यात आले असून त्याचीही उंची कमी असल्याने पावसाळ्यात रस्ता व पूल शेतकºयांसह नारिकांच्या किती उपयोगात येईल? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. पूर पीडित क्षेत्रातील नदीलगतच परिसर अति संवेदनशील असतानाही पुलाचे व रस्त्याचे नियमबाह्य सदोष काम होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची जाणीवपूर्वक डोळेझाक ही आश्चर्यकारक असल्याने या बांधकामाची वरिष्ठांनी चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी गावकºयांकडून केली जात असून यासंदर्भात तक्रारही देण्यात येणार आहे.कंत्राटदाराचे वराती मागून घोडेवर्ध्यातील कदम नामक कंत्रटदाराने या कामाला सुरुवात केली असून रस्त्या व नालीचे बांधकाम करताना सुरुवातीला रस्त्यावरील विद्यूत खांब हटविणे आवश्यक होते. परंतु कंत्राटदाराने विद्यूत खांब तसेच ठेऊन कामाला गती दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने कंत्राटदाराचा वराती मागून घोडे नाचविण्याचा प्रकार सुरु असल्याची ओरड होत आहे.