वर्धा : केंद्र व राज्य सरकार काँग्रेस सरकारचीच जनताविरोधी धोरणे अंमलात आणत आहे. या धोरणांमुळे महागाई, बेरोजगारी, बाजारी शिक्षण पद्धत, दलित, आदिवासीवरील अत्याचार, उद्योगांचे खासगीकरण, शेतकरी आत्महत्या वाढत आहे. यात कष्टकरी, श्रमिक, दलितांच्या समस्या वाढत असून त्यांच्या पाठीशी माकप सदैव उभी राहील, असे मत प्रा. उदयन शर्मा यांनी व्यक्त केले़ माकपच्या २१ व्या जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन ५ जानेवारी रोजी नामदेव मठ सभागृहात झाले़ यावेळी ते बोलत होते़ मंचावर प्रा. उदयन शर्मा, डॉ. अशोक ढवळे, मनोहर मुळे मुंबई, यशवंत झाडे उपस्थित होते. तसेच प्रभा घंगारे, मारोती तलमले, गणपत मेंढे, सीताराम लोहकरे, दामोधर हिवरे, महेश दुबे उपस्थित होते़ तीन वर्षांचा अहवाल झाडे यांनी मांडला. अधिवेशनात विविध विषयावर ठराव पारित करण्यात आलेत़(कार्यालय प्रतिनिधी)
श्रमिकांच्या हक्कासाठी संघर्षाला माकपा कटीबद्ध
By admin | Updated: January 8, 2015 22:59 IST