शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खोकला कमी होईना? तोंडात ज्येष्ठमधाचा तुकडा ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

कुणाला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासारखा त्रास उद्भवतो. अनेक जण याला आजार समजून डाॅक्टरकडे उपचारासाठी जातात; परंतु हा आजार नसून नैसर्गिक बदल आहे. त्यामुळे आपल्या शरीराला वातावरणाशी जुळवून घेताना थोडा त्रास होतो. शरीराच्या तापमानात वाढ होते, शरीरांचे स्नायू दुखतात व सर्दी-खोकला जाणवतो.  तसेच वातावरण बदलामध्ये टाॅन्सीलचा  त्रास वाढतो, अशा वेळेस बाभळीच्या सालीचा काढा बनवून त्यात काळे मीठ टाकून त्या पाण्याच्या गुळण्या केल्यास टाॅन्सीलचा त्रास कमी होतो.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  वातावरणात होत असलेला बदल आणि व्हायरलमुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखीचे रुग्ण वाढत आहेत. यावरील उपायांसाठी डॉक्टरकडे जाण्यासोबतच  अनेकजण आजीबाईचा बटवा वापरत आहेत. असे असले तरी वातावरणाच्या बदलाचा आरोग्यावर परिणाम होतोच. कुणाला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासारखा त्रास उद्भवतो.     अनेक जण याला आजार समजून डाॅक्टरकडे उपचारासाठी जातात; परंतु हा आजार नसून नैसर्गिक बदल आहे. त्यामुळे आपल्या शरीराला वातावरणाशी जुळवून घेताना थोडा त्रास होतो. शरीराच्या तापमानात वाढ होते, शरीरांचे स्नायू दुखतात व सर्दी-खोकला जाणवतो.  तसेच वातावरण बदलामध्ये टाॅन्सीलचा  त्रास वाढतो, अशा वेळेस बाभळीच्या सालीचा काढा बनवून त्यात काळे मीठ टाकून त्या पाण्याच्या गुळण्या केल्यास टाॅन्सीलचा त्रास कमी होतो. वातावरण बदलामुळे होणाऱ्या खोकल्याचा त्रास कमी करण्याकरिता ज्येष्ठमधाचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवल्यास खोकल्याचा त्रास होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. एकदा शरीर वातावरणाशी एकरूप झाले की आपोआपच त्रास कमी होतो.  ज्यांच्या शरीरात रोगप्रतीकारक शक्ती कमी असते त्यांच्यावर वातावरणीय बदलाचा परिणाम लवकर होतो.   या त्रासापासून सुटका मिळवायची असल्यास अगदी साध्या उपायांनी आपण यावर मात करू शकतो. याकरिता आपल्या आजीने सांगितलेले उपाय हमखास उपयोगाचे ठरतात. आपल्या स्वयंपाकघरातील अनेक वनस्पतींचा याकरिता उपयोग होतो.अद्रक, हळद, तुळस, काळी मिरी, लवंग, गवती चहा आदी औषधी  पदार्थांचा उपयोग करून सर्दी, ताप, खोकला यावर उपाय करू शकतो.

काय म्हणतात तज्ज्ञ

घरगुती उपायांमुळे साईड इफेक्ट्स होण्याची भीती राहत नाही, असे म्हटले जाते; परंतु खूप दिवसाचा खोकला असेल आणि त्यासाठी घरगुती उपाय करीत असाल तर तो धोकादायक ठरू शकतो. प्रत्येकाची शरीररचना वेगवेगळी असते. आजाराची गंभीरता वेगळी असते. यामुळे कोणत्या घरगुती उपचाराचा फायदा होईल, याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून घ्यायला हवा. यामुळे दुष्परिणाम टाळणे शक्य आहे.- डॉ. पवन भोयर,आयुर्वेदिक तज्ज्ञ

दूध आणि हळद  मुलांना हळदयुक्त दुध दिल्यास त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते व सर्दी, खोकल्यासारखे आजार होत नाहीत. हळद ही अँटिबायोटिक असल्यामुळे शरीरातील अनावश्यक विषाणूंचा नाश करते. म्हणूनच हळदीचे आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे.

आल्याचा चहाआपण चहामध्ये आल्याचा हमखास उपयोग करतो. आले सर्दी खोकला या आजारांवर अत्यंत उपयोगी आहे. आल्यातील औषधीय गुणांमुळे आयुर्वेदात फार महत्त्व आहे. त्यामुळे पावसाळा आणि हिवाळ्यात आल्याचा चहा गुणकारी ठरतो.

तुळशीची पाने आणि मध तुळशीच्या पानांचा रस व मध कफावर अत्यंत गुणकारी आहे. वातावरण बदलामुळे कफ वाढतो. त्यासाठी तुळशीच्या पानांचा रस मधातून घेतल्यास कफ पातळ होऊन आराम मिळतो. तुळसी, आलं आणि मधही एकत्र करुन चाटन दिले जाते.

लिंबू आणी मध कोमट पाण्यातून लिंबूचा रस आणि मध रोज सकाळी घेतल्यास पोटातील इन्फेक्शन दूर होते. पोट साफ होते व लिव्हरसंबंधी तक्रारी दूर होतात. अपचन होणे, पोट साफ न होणे या तक्रारी असल्यास रोज सकाळी कोमट पाण्यात मध, लिंबाचा रस प्यावा.

 

टॅग्स :Healthआरोग्य