शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
3
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
4
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
5
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
6
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
7
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
8
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
9
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
10
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
11
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
12
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
13
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
14
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
15
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
16
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
17
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
18
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
19
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
20
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   

तहसीलदारांना दिले कपाशीचे झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

यंदाच्या खरीप हंगामातील जून महिन्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला. त्यामुळे पेरणीस उशीर झाली. प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात पेरणीस सुरुवात झाली. तालुक्यात जुलै ते आक्टोबरमध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पावसाला उशीरा सुरुवात झाली तसेच पीक वाढीच्या कालावधीत सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहिल्याने किड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आंदोलन : ओला दुष्काळ जाहीर करा

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : कारंजा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी तहसीलदारांना घेराव घालण्यात आला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन व कपाशीचे झाड तहसीलदार सचिन कुमावत यांना दिले.यंदाच्या खरीप हंगामातील जून महिन्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला. त्यामुळे पेरणीस उशीर झाली. प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात पेरणीस सुरुवात झाली. तालुक्यात जुलै ते आक्टोबरमध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पावसाला उशीरा सुरुवात झाली तसेच पीक वाढीच्या कालावधीत सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहिल्याने किड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच जमिनीची योग्य मशागत न झाल्याने पिकांचीही वाढ खुंटत फुल व फळधारणा कमी झाली आहे. अशातच परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, अद्यापही शासनाकडून भरीव शासकीय मदत जाहीर झालेली नाही. ढगाळी वातावरण व पाऊस यामुळे सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर फळ शेती करणाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. सध्या कपाशीचे बोंड सडत असून उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता सर्व शेतकºयांना प्रति हेक्टर सरसकट २५ हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना आ. दादाराव केचे, मंगेश खवशी, उपसभापती रंजना टिपले, जि. पं. सदस्य श्वेता धोटे, सरीता गाखरे, सुरेश खवशी, सभापती निता गजाम यांच्यासह शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कपाशीवर लाल्या अन् बोंडअळीचाही प्रादुर्भावपरतीच्या पावसामुळे कपाशी पिकाचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात अखेरीस झालेल्या परतीच्या पावसानंतरही जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम राहिल्याने सध्या गुलाबी बोंडअळी तसेच लाल्याचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर दिसून येत असल्याचेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :TahasildarतहसीलदारFarmerशेतकरी