शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

कपाशीचे क्षेत्र वाढण्याचे संकेत

By admin | Updated: May 4, 2015 02:01 IST

शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता उन्हाळवाहीच्या कामांना प्रारंभ केला आहे. शेतातील कचारा

प्रशांत हेलोंडे वर्धाशेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता उन्हाळवाहीच्या कामांना प्रारंभ केला आहे. शेतातील कचारा जाळून वखरण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांप्रमाणे कृषी विभागही हंगामासाठी सज्ज झाला असून नियोजन करण्यात आले आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीच्या पेऱ्यात ११ हजार १२५ हेक्टरची वाढ होणार असल्याचे संकेत कृषी विभागाचा आराखडा देत आहे. गत दोन-तीन वर्षांपासून वाढलेला सोयाबीनचा पेरा यंदा ११ हजार ५४३ हेक्टरचे घटणार असल्याचेही भाकीत कृषी विभागाने आराखड्यात केले आहे. २०१४-१५ च्या खरीप हंगामामध्ये २ लाख २६ हजार ८७५ हेक्टरमध्ये कपाशीची लागवड तर १ लाख २१ हजार ५४३ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली होती़ विलंबाने आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन हाती लागले नाही़ कपाशीचेही समाधानकारक उत्पादन झाले नाही; पण बहुतांश शेतकऱ्यांना कपाशीचा आधार मिळाला़ शिवाय भावही वाढले़ यामुळे यंदा कपाशीच्या पेऱ्यात वाढ होणार भाकीत वर्तविवले आहे.गतवर्षीप्रमाणेच यंदाही ४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे़ यात ज्वारी, कापूस, सोयाबीन, भुईमुंग, तूर, मुग, उडीद व तीळ या पिकांचे नियोजन करण्यात आले आहे़ सर्वाधिक क्षेत्रात कपाशीचा पेरा होणार असल्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसारच बियाणे, खतांची मागणीही करण्यात आलेली आहे़ तुरीच्या पेरणीमध्येही यंदाच्या खरीप हंगामात वाढ होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे़ गतवर्षी जिल्ह्यात ५३ हजार ५७८ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाली होती़ यंदाच्या नियोजनात ती ६५ हजार ६०० हेक्टरपर्यंत होईल, असा अंदाज आहे़ खरीपात एकूण क्षेत्रामध्ये ३,२४६़२७ मेट्रीक टन कापूस उत्पादनाचे लक्ष्य आहे़ गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली व कपाशीचे उत्पादनही घटले़ असे असले तरी यंदा कपाशीच्या पेऱ्यासाठी २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे़ शिवाय अन्य पिकांचेही नियोजन करण्यात आले आहे़