शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कापसाचे भाव वधारले, इतर शेतमालाचे गडगडले; शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच फायदा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2022 13:19 IST

जिल्ह्यात कापसाला १४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला असून, इतर शेतमालाचे भाव गडगडल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपांढऱ्या सोन्याने गाठला १४ हजारांचा पल्ला

वर्धा : यावर्षी कापसासह सोयाबीनच्या उत्पादनातही कमालीची घट झाल्याने जागतिक बाजारपेठेतही चांगली मागणी होती, तसेच रुपयाच्या अवमूल्यनासह रशिया-युक्रेन युद्धाचाही परिणाम बाजार भावावर पडल्याने कापसाच्या भावात वाढ झाली आहे. जिल्ह्यात कापसाला १४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला असून, इतर शेतमालाचे भाव गडगडल्याचे चित्र आहे.

खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनला चांगलाच फटका बसल्याने उत्पादनातही घट झाली. गुलाबी बोंड अळी आणि अवकाळी पावसाने इतर पिकांनाही दणका दिला. खरिपातील हे नुकसान भरून काढण्याकरिता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडे लक्ष केंद्रित केले; परंतु रब्बीतही अपेक्षेप्रमाणे उत्पन्न झाले नाही. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचीही लागवड केली.

एकंदरीत उत्पादन घटल्याने सोयाबीनलाही सुरुवातीला चांगलाच भाव मिळाला. त्यानंतर कापसाने हळूहळू दहा हजारांचा आणि आता १४ हजारांचा पल्ला गाठला आहे. या भाववाढीचा फायदा आता व्यापाऱ्यांनाच मिळणार असल्याचे दिसत आहे. बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी अद्यापही भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस साठवून ठेवला आहे; पण आता खरीप हंगाम तोंडावर असल्याने त्यांनीही हा कापूस विकायला काढला आहे. सध्या बाजारपेठेत कापसाची आवक मंदावली असून, बाजारभाव १४ हजारांच्या आसपासच आहे. मात्र, आता सोयाबीन व तुरीचे भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनाने गव्हाची निर्यात देखील बंद केल्याने गव्हाचेही भाव कमी झाले आहेत.

कापसाला ऐतिहासिक भाव

यावर्षी सोयाबीनसह कापसालाही ऐतिहासिक बाजारभाव मिळत आहे. सुरुवातीला सोयाबीननेही साडेसात ते आठ हजारांपर्यंत भाव खाल्ला होता. त्यामुळे उत्पन्न घटले तरीही या वाढीव बाजारभावाने उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला, तसेच कापसाने हमीभावाला मागे टाकत १४ हजार ५०० रुपयांचा पल्ला गाठला असून, हा कापसाचा ऐतिहासिक भाव ठरला आहे. अजूनही यात वाढ होऊन १५ हजार रुपयांची सीमा ओलांडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसFarmerशेतकरी