शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचा भाव ५८०० वरच स्थिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:23 IST

जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कापसाचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्ह दिसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, कापूस पणन महासंघ व नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही.

ठळक मुद्देशासकीय खरेदी केंद्र बंद : सणासुदीत शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कापसाचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्ह दिसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, कापूस पणन महासंघ व नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत व्यापाऱ्यांची खरेदी सुरू झाली आहे. येथे ५८०० पासून भाव दिल्या जात आहे.यंदा जागतिक बाजारपेठेत अनेक देशात कापसाचे उत्पादन घटण्याची स्थिती असल्यामुळे कापसाचे भाव वधारतील, अशी आशा आहे. मात्र, सध्या दिवाळी सण तोंडावर असल्याने शेतकरी सण साजरा करण्यासाठी निघालेला शेतमाल थेट बाजार समितीत घेऊन येत आहे. शनिवारी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत ५८५० रूपये क्विंटल दराने कापसाची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. तर देवळी बाजारपेठेत कापसाला ५८०० ते ५९७१ रूपये पर्यंत भाव देण्यात आला. अशीच परिस्थिती सोयाबीनचीही आहे. सिंदी (रेल्वे) बाजार पेठेत सोयाबीनला २९५० ते ३१८५ भाव मिळाला. देवळी येथे सोयाबीनला २८०० ते ३१३१ रूपये भाव मिळाला. बाजार पेठेत कापूस व सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, व्यापारींची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना सध्या ठराविक भावातच कापूस आणि सोयाबीन विकावे लागत आहे. काही बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. मात्र, तारणात शेतमाल ठेवण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता हा माल विकणे कधीही बरे, अशी प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.पांढरे सोने दगा देण्याची शक्यतावर्धा जिल्ह्याच्या आर्वी उपविभागातील तालुक्यात कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात कपाशी पिकाची लागवड केली जाते. यावर्षी या भागात पाऊस कमी झाल्याने कपाशी पीक एक ते दोन वेच्यानंतर उलंगवाडी करावी लागणार आहे. मात्र सेलू, वर्धा, हिंगणघाट या तालुक्यांमध्ये सिंचनाची सुविधा असल्याने शेतकरी कपाशी पिकाला रात्री व दिवसा भारनियमनाच्या वेळेनुसार पाणी देत असल्याने या भागात कपाशीचे उत्पादन चांगले होण्याची आशा आहे.खासदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडेजिल्ह्यात केवळ ७७ टक्के पाऊस झाल्याने कपाशी व सोयाबीन पिकाचे उत्पादन घटणार आहे. जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यात केवळ तीनच तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हिंगणघाट येथे दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत या विषयावर खासदारांनी चर्चाही केली.आतापर्यंत तीन हजार क्विंटल कापसाची खरेदीहिंगणघाट, देवळी, वर्धा, आर्वी या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. सुत्रांच्या माहितीनुसार ३ हजार क्विंटल पर्यंत कापूस खरेदी जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. व शेतकऱ्यांना ५८०० पर्यंत भाव देण्यात आला, अशी माहिती आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड