शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचा भाव ५८०० वरच स्थिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:23 IST

जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कापसाचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्ह दिसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, कापूस पणन महासंघ व नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही.

ठळक मुद्देशासकीय खरेदी केंद्र बंद : सणासुदीत शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कापसाचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्ह दिसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, कापूस पणन महासंघ व नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत व्यापाऱ्यांची खरेदी सुरू झाली आहे. येथे ५८०० पासून भाव दिल्या जात आहे.यंदा जागतिक बाजारपेठेत अनेक देशात कापसाचे उत्पादन घटण्याची स्थिती असल्यामुळे कापसाचे भाव वधारतील, अशी आशा आहे. मात्र, सध्या दिवाळी सण तोंडावर असल्याने शेतकरी सण साजरा करण्यासाठी निघालेला शेतमाल थेट बाजार समितीत घेऊन येत आहे. शनिवारी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत ५८५० रूपये क्विंटल दराने कापसाची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. तर देवळी बाजारपेठेत कापसाला ५८०० ते ५९७१ रूपये पर्यंत भाव देण्यात आला. अशीच परिस्थिती सोयाबीनचीही आहे. सिंदी (रेल्वे) बाजार पेठेत सोयाबीनला २९५० ते ३१८५ भाव मिळाला. देवळी येथे सोयाबीनला २८०० ते ३१३१ रूपये भाव मिळाला. बाजार पेठेत कापूस व सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, व्यापारींची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना सध्या ठराविक भावातच कापूस आणि सोयाबीन विकावे लागत आहे. काही बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. मात्र, तारणात शेतमाल ठेवण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता हा माल विकणे कधीही बरे, अशी प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.पांढरे सोने दगा देण्याची शक्यतावर्धा जिल्ह्याच्या आर्वी उपविभागातील तालुक्यात कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात कपाशी पिकाची लागवड केली जाते. यावर्षी या भागात पाऊस कमी झाल्याने कपाशी पीक एक ते दोन वेच्यानंतर उलंगवाडी करावी लागणार आहे. मात्र सेलू, वर्धा, हिंगणघाट या तालुक्यांमध्ये सिंचनाची सुविधा असल्याने शेतकरी कपाशी पिकाला रात्री व दिवसा भारनियमनाच्या वेळेनुसार पाणी देत असल्याने या भागात कपाशीचे उत्पादन चांगले होण्याची आशा आहे.खासदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडेजिल्ह्यात केवळ ७७ टक्के पाऊस झाल्याने कपाशी व सोयाबीन पिकाचे उत्पादन घटणार आहे. जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यात केवळ तीनच तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हिंगणघाट येथे दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत या विषयावर खासदारांनी चर्चाही केली.आतापर्यंत तीन हजार क्विंटल कापसाची खरेदीहिंगणघाट, देवळी, वर्धा, आर्वी या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. सुत्रांच्या माहितीनुसार ३ हजार क्विंटल पर्यंत कापूस खरेदी जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. व शेतकऱ्यांना ५८०० पर्यंत भाव देण्यात आला, अशी माहिती आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड