शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कापसाचा भाव ५८०० वरच स्थिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:23 IST

जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कापसाचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्ह दिसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, कापूस पणन महासंघ व नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही.

ठळक मुद्देशासकीय खरेदी केंद्र बंद : सणासुदीत शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कापसाचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्ह दिसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, कापूस पणन महासंघ व नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत व्यापाऱ्यांची खरेदी सुरू झाली आहे. येथे ५८०० पासून भाव दिल्या जात आहे.यंदा जागतिक बाजारपेठेत अनेक देशात कापसाचे उत्पादन घटण्याची स्थिती असल्यामुळे कापसाचे भाव वधारतील, अशी आशा आहे. मात्र, सध्या दिवाळी सण तोंडावर असल्याने शेतकरी सण साजरा करण्यासाठी निघालेला शेतमाल थेट बाजार समितीत घेऊन येत आहे. शनिवारी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत ५८५० रूपये क्विंटल दराने कापसाची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. तर देवळी बाजारपेठेत कापसाला ५८०० ते ५९७१ रूपये पर्यंत भाव देण्यात आला. अशीच परिस्थिती सोयाबीनचीही आहे. सिंदी (रेल्वे) बाजार पेठेत सोयाबीनला २९५० ते ३१८५ भाव मिळाला. देवळी येथे सोयाबीनला २८०० ते ३१३१ रूपये भाव मिळाला. बाजार पेठेत कापूस व सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, व्यापारींची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना सध्या ठराविक भावातच कापूस आणि सोयाबीन विकावे लागत आहे. काही बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. मात्र, तारणात शेतमाल ठेवण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता हा माल विकणे कधीही बरे, अशी प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.पांढरे सोने दगा देण्याची शक्यतावर्धा जिल्ह्याच्या आर्वी उपविभागातील तालुक्यात कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात कपाशी पिकाची लागवड केली जाते. यावर्षी या भागात पाऊस कमी झाल्याने कपाशी पीक एक ते दोन वेच्यानंतर उलंगवाडी करावी लागणार आहे. मात्र सेलू, वर्धा, हिंगणघाट या तालुक्यांमध्ये सिंचनाची सुविधा असल्याने शेतकरी कपाशी पिकाला रात्री व दिवसा भारनियमनाच्या वेळेनुसार पाणी देत असल्याने या भागात कपाशीचे उत्पादन चांगले होण्याची आशा आहे.खासदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडेजिल्ह्यात केवळ ७७ टक्के पाऊस झाल्याने कपाशी व सोयाबीन पिकाचे उत्पादन घटणार आहे. जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यात केवळ तीनच तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हिंगणघाट येथे दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत या विषयावर खासदारांनी चर्चाही केली.आतापर्यंत तीन हजार क्विंटल कापसाची खरेदीहिंगणघाट, देवळी, वर्धा, आर्वी या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. सुत्रांच्या माहितीनुसार ३ हजार क्विंटल पर्यंत कापूस खरेदी जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. व शेतकऱ्यांना ५८०० पर्यंत भाव देण्यात आला, अशी माहिती आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड