शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीची लागवड सुरू

By admin | Updated: June 15, 2015 02:13 IST

शेतीची मशागत करून पेरणीकरिता पावसाकडे डोळे असलेल्या बळीराजाची प्रतीक्षा काही अंशी संपली आहे.

वर्धा : शेतीची मशागत करून पेरणीकरिता पावसाकडे डोळे असलेल्या बळीराजाची प्रतीक्षा काही अंशी संपली आहे. जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाला प्रारंभ झाला. आलेला पाऊस दमदार नसला तरी तो कपाशीच्या लागवडीकरिता ठीक असल्याचे म्हणत बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड करणे सुरू आहे. यात ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांनी पाऊस येण्यापूर्वीच लागवड केली आहे. जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला तरी गत हंगामात पावसाने डोळे वटारल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यामुळे गत हंगामात आलेला अनुभव हाताशी घेत जिल्ह्यातील शेतकरी सावधानता बाळगत असल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या पहिल्या सरींनी जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी केवळ कपाशीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनची पेरणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी अद्याप सुरुवात के ली नसल्याचे चित्र आहे. गत हंगामाप्रमाणे यंदा जर पुन्हा पावसाने डोळे वटारले तर मोठे नुकसान सहन करण्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हिंमत नाही. यामुळे प्रारंभी केवळ कपाशीची लागवड करणे सुरू आहे. जर पावसाने डोळे वटारले तर कपाशीचे बियाणे पुन्हा विकत घेणे परवडणारे आहे; मात्र यात जर सोयाबीनला मोड आली तर ते बियाणे मिळणे कठीण जाण्याचे संकेत आहेत. गत हंगामात सोयाबीन झाले नसल्याने यंदा शेतकऱ्यांकडे घरगुती बियाणेही शिल्लक नाही. यामुळे दमदार पाऊस आल्याशिवाय सोयाबीनचा पेरा नको, असे म्हणत शेतकऱ्यांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. यंदाच्या खरीपात एकूण ४ लाख हेक्टरवर विविध पिकांचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात नमूद आहे. यात कपाशीचा पेरा वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात २ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होणार असल्याचे कृषी विभागाने आराखड्यात म्हटले आहे. या व्यतिरिक्त सुमारे दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. गत हंगामात सोयाबीन झाले नसल्याने यंदाच्या हंगामात सोयाबीनचे बियाणे मिळणे कठीण झाल्याने कपाशीचे क्षेत्र वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस येण्यापूर्वी तर काही शेतकऱ्यांनी मृगाच्या पहिल्या सरी पडताच कपाशीची लागवड करणे सुरू केले आहे. (प्रतिनिधी)