शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

कपाशीची लागवड सुरू

By admin | Updated: June 15, 2015 02:13 IST

शेतीची मशागत करून पेरणीकरिता पावसाकडे डोळे असलेल्या बळीराजाची प्रतीक्षा काही अंशी संपली आहे.

वर्धा : शेतीची मशागत करून पेरणीकरिता पावसाकडे डोळे असलेल्या बळीराजाची प्रतीक्षा काही अंशी संपली आहे. जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाला प्रारंभ झाला. आलेला पाऊस दमदार नसला तरी तो कपाशीच्या लागवडीकरिता ठीक असल्याचे म्हणत बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड करणे सुरू आहे. यात ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांनी पाऊस येण्यापूर्वीच लागवड केली आहे. जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला तरी गत हंगामात पावसाने डोळे वटारल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यामुळे गत हंगामात आलेला अनुभव हाताशी घेत जिल्ह्यातील शेतकरी सावधानता बाळगत असल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या पहिल्या सरींनी जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी केवळ कपाशीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनची पेरणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी अद्याप सुरुवात के ली नसल्याचे चित्र आहे. गत हंगामाप्रमाणे यंदा जर पुन्हा पावसाने डोळे वटारले तर मोठे नुकसान सहन करण्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हिंमत नाही. यामुळे प्रारंभी केवळ कपाशीची लागवड करणे सुरू आहे. जर पावसाने डोळे वटारले तर कपाशीचे बियाणे पुन्हा विकत घेणे परवडणारे आहे; मात्र यात जर सोयाबीनला मोड आली तर ते बियाणे मिळणे कठीण जाण्याचे संकेत आहेत. गत हंगामात सोयाबीन झाले नसल्याने यंदा शेतकऱ्यांकडे घरगुती बियाणेही शिल्लक नाही. यामुळे दमदार पाऊस आल्याशिवाय सोयाबीनचा पेरा नको, असे म्हणत शेतकऱ्यांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. यंदाच्या खरीपात एकूण ४ लाख हेक्टरवर विविध पिकांचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात नमूद आहे. यात कपाशीचा पेरा वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात २ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होणार असल्याचे कृषी विभागाने आराखड्यात म्हटले आहे. या व्यतिरिक्त सुमारे दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. गत हंगामात सोयाबीन झाले नसल्याने यंदाच्या हंगामात सोयाबीनचे बियाणे मिळणे कठीण झाल्याने कपाशीचे क्षेत्र वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस येण्यापूर्वी तर काही शेतकऱ्यांनी मृगाच्या पहिल्या सरी पडताच कपाशीची लागवड करणे सुरू केले आहे. (प्रतिनिधी)