शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

कपाशीची लागवड सुरू

By admin | Updated: June 15, 2015 02:13 IST

शेतीची मशागत करून पेरणीकरिता पावसाकडे डोळे असलेल्या बळीराजाची प्रतीक्षा काही अंशी संपली आहे.

वर्धा : शेतीची मशागत करून पेरणीकरिता पावसाकडे डोळे असलेल्या बळीराजाची प्रतीक्षा काही अंशी संपली आहे. जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाला प्रारंभ झाला. आलेला पाऊस दमदार नसला तरी तो कपाशीच्या लागवडीकरिता ठीक असल्याचे म्हणत बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड करणे सुरू आहे. यात ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांनी पाऊस येण्यापूर्वीच लागवड केली आहे. जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला तरी गत हंगामात पावसाने डोळे वटारल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यामुळे गत हंगामात आलेला अनुभव हाताशी घेत जिल्ह्यातील शेतकरी सावधानता बाळगत असल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या पहिल्या सरींनी जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी केवळ कपाशीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनची पेरणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी अद्याप सुरुवात के ली नसल्याचे चित्र आहे. गत हंगामाप्रमाणे यंदा जर पुन्हा पावसाने डोळे वटारले तर मोठे नुकसान सहन करण्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हिंमत नाही. यामुळे प्रारंभी केवळ कपाशीची लागवड करणे सुरू आहे. जर पावसाने डोळे वटारले तर कपाशीचे बियाणे पुन्हा विकत घेणे परवडणारे आहे; मात्र यात जर सोयाबीनला मोड आली तर ते बियाणे मिळणे कठीण जाण्याचे संकेत आहेत. गत हंगामात सोयाबीन झाले नसल्याने यंदा शेतकऱ्यांकडे घरगुती बियाणेही शिल्लक नाही. यामुळे दमदार पाऊस आल्याशिवाय सोयाबीनचा पेरा नको, असे म्हणत शेतकऱ्यांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. यंदाच्या खरीपात एकूण ४ लाख हेक्टरवर विविध पिकांचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात नमूद आहे. यात कपाशीचा पेरा वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात २ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होणार असल्याचे कृषी विभागाने आराखड्यात म्हटले आहे. या व्यतिरिक्त सुमारे दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. गत हंगामात सोयाबीन झाले नसल्याने यंदाच्या हंगामात सोयाबीनचे बियाणे मिळणे कठीण झाल्याने कपाशीचे क्षेत्र वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस येण्यापूर्वी तर काही शेतकऱ्यांनी मृगाच्या पहिल्या सरी पडताच कपाशीची लागवड करणे सुरू केले आहे. (प्रतिनिधी)