शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

तज्ज्ञांचा अंदाज चुकल्याने कापूस उत्पादकांना फटका; अजूनही पाढरं सोनं शेतकऱ्यांच्या घरातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 10:54 IST

भाववाढीची प्रतीक्षा कायम

फनिंद्र रघाटाटे

रोहणा (वर्धा) : यावर्षी देशात ३६० लाख गाठी बांधता येईल इतके कापसाचे उत्पादन होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला होता. अतिवृष्टी व महापुरामुळे जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर हा अंदाज ३४० लाख गाठीपर्यंत आला. उत्पादनामध्ये घट झाल्याने बाजारपेठेत आवक मंदावल्याने बाजारभाव कायम राहण्याऐवजी तो गडगडला. अद्यापही कापसाचे भाव कमी असून, उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

त्यामुळे अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवून आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत बाजारात १४५ लाख गाठी बांधता येईल एवढा कापूस बाजारात आला होता. आता भाव वाढेल की नाही, याची काहीही शाश्वती नसल्याने आर्थिक अडचणीमुळे मार्च महिन्यात शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कापूस विकला. परिणामी मार्च महिन्यामध्ये १०० लाख गाठी बांधता येईल, एवढा कापूस बाजारात आला. यावरून आतापर्यंत २४५ लाख गाठींचा कापूस बाजारात आल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांकडे अद्यापही २० टक्के कापूस शिल्लक आहे. व्यापारी किंवा तज्ज्ञ काहीही अंदाज बांधत असले तरी ५० लाख गाठींचा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच आहे. आता शेतकऱ्यांची साठवणूक क्षमता संपली असून तो कापूस बाजारात आला तर शेवटपर्यंत ३०० लाख गाठींचाच कापूस उत्पादित होईल. यापेक्षा जास्त कापूस बाजारपेठेत येऊच शकणार नाही. यावरून व्यापारी धार्जिण्या तज्ज्ञांनी सुरुवातीला व आतापर्यंत व्यक्त केलेला अंदाज खोटा आणि फसवा ठरल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याचे मत व्यक्त होत आहे.

भाव वाढणार, पण कापूस व्यापाऱ्यांकडे गेल्यानंतरच!

भाववाढीच्या प्रतीक्षेत आतापर्यंत ८० टक्केच कापूस बाजारात आला असून, अद्यापही २० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. या शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कापूस विकावा लागला. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही भाववाढ मिळाली नसल्याने येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांकडील शिल्लक असलेला कापूस बाजारात येईल. त्यानंतर तो व्यापाऱ्यांकडे गेल्यावर भाववाढीला सुरुवात होऊन याचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होणार आहे, असे कृषी अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसwardha-acवर्धा