शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

तज्ज्ञांचा अंदाज चुकल्याने कापूस उत्पादकांना फटका; अजूनही पाढरं सोनं शेतकऱ्यांच्या घरातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 10:54 IST

भाववाढीची प्रतीक्षा कायम

फनिंद्र रघाटाटे

रोहणा (वर्धा) : यावर्षी देशात ३६० लाख गाठी बांधता येईल इतके कापसाचे उत्पादन होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला होता. अतिवृष्टी व महापुरामुळे जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर हा अंदाज ३४० लाख गाठीपर्यंत आला. उत्पादनामध्ये घट झाल्याने बाजारपेठेत आवक मंदावल्याने बाजारभाव कायम राहण्याऐवजी तो गडगडला. अद्यापही कापसाचे भाव कमी असून, उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

त्यामुळे अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवून आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत बाजारात १४५ लाख गाठी बांधता येईल एवढा कापूस बाजारात आला होता. आता भाव वाढेल की नाही, याची काहीही शाश्वती नसल्याने आर्थिक अडचणीमुळे मार्च महिन्यात शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कापूस विकला. परिणामी मार्च महिन्यामध्ये १०० लाख गाठी बांधता येईल, एवढा कापूस बाजारात आला. यावरून आतापर्यंत २४५ लाख गाठींचा कापूस बाजारात आल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांकडे अद्यापही २० टक्के कापूस शिल्लक आहे. व्यापारी किंवा तज्ज्ञ काहीही अंदाज बांधत असले तरी ५० लाख गाठींचा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच आहे. आता शेतकऱ्यांची साठवणूक क्षमता संपली असून तो कापूस बाजारात आला तर शेवटपर्यंत ३०० लाख गाठींचाच कापूस उत्पादित होईल. यापेक्षा जास्त कापूस बाजारपेठेत येऊच शकणार नाही. यावरून व्यापारी धार्जिण्या तज्ज्ञांनी सुरुवातीला व आतापर्यंत व्यक्त केलेला अंदाज खोटा आणि फसवा ठरल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याचे मत व्यक्त होत आहे.

भाव वाढणार, पण कापूस व्यापाऱ्यांकडे गेल्यानंतरच!

भाववाढीच्या प्रतीक्षेत आतापर्यंत ८० टक्केच कापूस बाजारात आला असून, अद्यापही २० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. या शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कापूस विकावा लागला. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही भाववाढ मिळाली नसल्याने येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांकडील शिल्लक असलेला कापूस बाजारात येईल. त्यानंतर तो व्यापाऱ्यांकडे गेल्यावर भाववाढीला सुरुवात होऊन याचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होणार आहे, असे कृषी अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसwardha-acवर्धा