शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रूई गाठीच्या उभ्या ट्रकने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:27 IST

रुईच्या गाठी भरून असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. यात ट्रकसह संपूर्ण गाठी जळून भस्मसात झाल्या. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सातेफळ मार्गावर घडली.

ठळक मुद्देअडीच टन रूई भस्मसात : सातेफळ मार्गावरील घटना

ऑनलाईन लोकमतहिंगणघाट : रुईच्या गाठी भरून असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. यात ट्रकसह संपूर्ण गाठी जळून भस्मसात झाल्या. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सातेफळ मार्गावर घडली.जाम येथील पीव्ही टेक्सटाईल्स या सूत गिरणीतून रूईच्या गाठी घेऊन साईबाबा ट्रान्सपोर्ट या एजन्सीचा ट्रक क्र. एमएच ३२ बी ४७६९ यवतमाळ येथे जाण्याकरिता निघाला होता. हिंगणघाट येथे आल्यावर ट्रक मालक महादेव चंदेल यांच्या सातेफळ रस्यावरील घरासमोर ट्रक उभा ठेऊन चालक मोहम्मद अली मोहम्मद इब्राहिम रा. संत कबीर वॉर्ड हा जेवण करण्याकरिता घरी गेला. काही वेळाने तो परत आला व यवतमाळ येथे जाण्याकरिता त्याने ट्रक सुरु केला असता मागील बाजूने धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी गाडी बंद करून ट्रकचे क्लिनर चिंतामण कापटे यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. अवघ्या काही वेळातच संपूर्ण ट्रकला आगीने कवेत घेतले. हिंगणघाट अग्निशमनच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. यामुळे आग लोकवस्तीत पसरली नाही. यामुळे मोठी हानी टळली; पण आगीत संपूर्ण ट्रक व सुमारे २.५ टण रुईच्या गाठी जळून खाक झाल्या. यात मोठे नुकसान झाले असून अंदाज घेणे सुरू आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून जमादार विनोद कांबळे व गजानन जाचक पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :fireआग