शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कापसाच्या झाल्या वाती अन् सोयाबीनची झाली माती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 16:56 IST

परतीच्या पावसाने झोडपले : वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी तालुक्यांत नुकसान, नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाने कापूस, सोयाबीनच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली जाते, यावर्षी चांगला भाव मिळणार, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र, दोन्ही पिकांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती अशीच काय ते शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची अवस्था आहे. 

सुरुवातीला महागडी खत, बियाणं खरेदी करून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत ओरदार झालेल्या पावसाने सुरुवातीपासूनच ही पिके पावसाच्या कचाट्यात आली, तरीही शेतकरी उभे राहिले. मात्र, आता सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात उभी असलेली सोयाबीन आणि कापलेल्या सोयाबीनच्या सुड्या भिजून गेल्या, तर अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पाण्यातून सोयाबीन काढण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. वेचणीला आलेल्या कापसाचीही काही वेगळी अवस्था नसल्याचे चित्र आहे. 

कापूस पाण्यामुळे भिजल्याने मोठ नुकसान होत आहे. शेतातून निघणाऱ्या या उत्पादनावर दिवाळी सणाचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, आता ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतातून उत्पादन निघणार नसल्याने दिवाळी तरी साजरी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. 

पपई उन्मळून पडली, केळीच्या बागेचे नुकसान भिडी : शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसासह गारपिटीने देवळी तालुक्यातील भिंडी, रत्नापूर, हुस्नापूर, वाफगांव, बाभुळगांव, काजळसरा, गणेशपूर, शिरपूर, कोल्हापूर, मलातपूर, खडाँ बोपापूर, शेंदापूर, वाटखेडा, रायपूर येथील शेतकयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आले. भिडी शिवारात बोराच्या आकाराची गारपीट झाली. कपाशीसह सोयाबीन, पपई, केळी पिकाला मोता फटका बसला. फळांची पडझड झाली, तर बागा उन्मळून पडल्या. दरम्यान माजी राज्यमंत्री व आमदार रणजीत कांबळे यांनी नुकसानग्रस्त परिसरात भेट देत पाहणी केली. तसेच विमा अधिकारांसह तह सौलदारांना तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशित केले. 

आर्वी तालुक्यात सोयाबीन पाण्याखालीआर्वी तालुक्यात शनिवारी झालेल्या परतीच्या पावसाने चांगलाच कहर केला. आर्वी तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकयांच्या शेतात पाणी सिरले. नांदूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत जलमय होऊन सोयाबीन पाण्याखाली गेले. तसेच, लाडेगाव परिसरात सोयाबीनच्या गंज्या पाण्याखाली गेल्याचे धडधडीत वास्तव असून, मोठे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :CropपीकCrop Insuranceपीक विमाwardha-acवर्धा