शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus in Wardha; पालकांनो, पॉझिटिव्ह आल्यानंतर मुलाबाळांना दूर करून मोकळे होऊ नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 15:43 IST

Wardha news लहान मुलेच कोरोना स्प्रेडर ठरत असल्याने ‘पालकांनो, पॉझिटिव्ह आल्यानंतर मुलाबाळांना दूर करुन मोकळे होऊ नका, त्यांना सोबतच ठेऊन त्यांचीही काळजी घ्या,’ असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहनलहान मुले ठरत आहेत कोरोना स्प्रेेडरम्हाताऱ्या आजी-आजोबांनाही होत आहेत बाधा

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना आता घराघरांमध्ये पोहोचला आहे. घरातील एक सदस्य पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले इतरही सदस्य पॉझिटिव्ह येत आहे. अशातच आई-वडिलांपैकी कुण्या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरातील लहान मुलांना बाधा होऊ नये, म्हणून शेजारी किंवा नातेवाइकांकडे पाठविले जात आहे, पण ही लहान मुलेच कोरोना स्प्रेडर ठरत असल्याने ‘पालकांनो, पॉझिटिव्ह आल्यानंतर मुलाबाळांना दूर करुन मोकळे होऊ नका, त्यांना सोबतच ठेऊन त्यांचीही काळजी घ्या,’ असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.

कोरोनामुळे माणसच माणसापासून दूर जायला लागले, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात भीतिपोटी अनेकांना माणुसकीचा विसर पडला आहे. कोरोना हा आजार इतर आजारांप्रमाणेच बरा होणारा असून, एकमेकांना आधार देऊन कोरोनावर मात करण्याची गरज आहे, पण सध्या समाजात विचित्र प्रकार घडतांना दिसून येत आहे. काही आई-वडील आपला मुलगा पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या योग्य उपचार करण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी लांब जातांना दिसत आहे, तर काही आई-वडील पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्या मुलांना कोरोनाची बाधा होऊ नये, म्हणून शेजारी, नातेवाईक किंवा आजी-आजोबांकडे पाठवित आहे. यामुळे आई-वडिलांच्या संपर्कात आल्यानंतर कालांतराने मुलांनाही संसर्ग होऊन तो आतापर्यंत काळजी घेणाऱ्या म्हाताऱ्या आजी-आजोबांसह नातेवाइकांनाही कोरोनाच्या सावटात ओढत आहे. परिणामी, मुलांवर उपचार करण्यासाठी त्यांची धावपळ उडतात. त्यामुळे पालकांनी काळजी घेऊन मुलाबाळांनाही आपल्याच सोबत ठेऊन योग्य उपचार घेण्याची गरज आहे.

तुमची काळजी इतरांसाठी ठरत आहेत संकट

पालकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर काळजी पोटी पालक मुलाबाळांना शेजारी, नातेवाईक किंवा आजी-आजोबांकडे ठेवतात. त्यामुळे मुलांमध्ये आई-वडिलांपासून दूर झाल्याची भावना निर्माण होऊन त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यातूनच मग त्या मुलांनाही कोरोनाची बाधा होऊन ते ज्यांच्याकडे रहायला गेलेत, त्यांनाही कोरोना आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालकांना कोरोनाच्या काळात मुलांप्रती असलेली ही काळजी इतरांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

मुले पाच दिवसांनंतर येऊ शकतात पॉझिटिव्ह

घरातील एका व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना पाच दिवसांनंतरही बाधा होण्याची शक्यता असते. आई-वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर मुले पूर्णपणे ठणठणीत आहे, असे समजून त्यांना बाधा होऊ नये म्हणून इतरत्र पाठविले जातात. पण, पाच दिवसानंतरही या मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना इतरत्र पाठवून कोरोनाचा संसर्ग वाढविण्यापेक्षा घरीच ठेवणे फायदेशीर ठरणारे आहे.

आई-वडील पॉझिटिव्ह आल्यानंतर मुलांना ताप नसला, तरीही ते विनालक्षणाने कोरोनाबाधित राहू शकतात. पाच किंवा सात दिवसांनी मुलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आई-वडिलांनी स्वत:सोबतच मुलांचीही घरीच सर्व नियम पाळून काळजी घ्यावी. त्यांना इतरत्र पाठवून कोरोनाचा संसर्ग वाढविण्याला ब्रेक लावावा.

डॉ.सचिन पावडे, बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस