शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

वर्ध्यात कोरोनाचे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

आतापर्यंत एकूण ५ हजार ७७४ व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ५ हजार ७०५ व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून ५ हजार ६२७ व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. तर सध्या ६९ व्यक्तींच्या अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सेवाग्राम, सावंगी येथे कोविड चाचणीची व्यवस्था आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ४९ व्यक्तींना संसर्ग : जिल्ह्याबाहेरील दहा रुग्णांवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरुवातीला तब्बल ५० दिवस ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात आता कोरोना रुग्ण वाढीला लागले असून मंगळवारी जिल्हा कोरोना रुग्णांबाबत अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मंगळवारी सात नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यापैकी पाच जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी असून एक यवतमाळ तर एक वाशीम जिल्ह्यातील रहिवासी आहे. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील ४९ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शिवाय एकाचा कोरोनाने तर एकाचा इतर आजाराने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याबाहेरील दहा कोरोना बाधितांवर जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ७९ कोरोना बाधितांची नोंद घेतली आहे. त्यापैकी ४९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असून ३० व्यक्ती जिल्ह्याबाहेरील आहेत. तर कोरोनाची लागण झालेल्या पाच व्यक्तींचा वर्ध्यात मृत्यू झाला आहे. त्यापैकी तिघे जिल्ह्याबाहेरील असून वर्धा जिल्ह्यातील दोन व्यक्ती आहेत. या दोन व्यक्तींपैकी केवळ आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील महिलेचा कोरोनाने तर इतर दुसऱ्या व्यक्तीचा इतर आजारांमुळे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील ४९ कोरोना बाधितांपैकी १५ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर जिल्ह्याबाहेरील ३० व्यक्तींपैकी १८ व्यक्तींनी कोरोनाला हरविल्याने त्यांना सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.वर्धा जिल्ह्यातील दोन कोविड रुग्णालयात सध्या कोरोनाचे एकूण ४२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी ३२ व्यक्ती वर्धा जिल्ह्यातील तर १० व्यक्ती जिल्ह्याबाहेरील आहेत. मंगळवारी आढळलेल्या जिल्ह्याबाहेरील दोन्ही रुग्णांची माहिती वर्धा जिल्हा प्रशासनाने यवतमाळ आणि वाशीम जिल्हा प्रशासनाला दिली आहे.६९ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षाआतापर्यंत एकूण ५ हजार ७७४ व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ५ हजार ७०५ व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून ५ हजार ६२७ व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. तर सध्या ६९ व्यक्तींच्या अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सेवाग्राम, सावंगी येथे कोविड चाचणीची व्यवस्था आहे. तर काही विशेष किटही जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या असून त्याद्वारे लवकरच तपासणी सुरू होणार आहे.कस्तुरबा रुग्णालयात २१ अ‍ॅक्टीव्ह रुग्णसेवाग्राम : येथील कस्तुरबा कोविड रुग्णालय सध्या कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरत आहे. या रुग्णालयात सध्या २१ कोविड बाधितांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १३ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. या रुग्णालयात आतापर्यंत ३६ कोरोना बाधितांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यापैकी १३ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सध्या २१ कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहे. शिवाय उपचारादरम्यान दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. या ३६ कोरोना रुग्णांमध्ये वर्धा जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील व्यक्तींचा समावेश आहे.सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयात १९ रुग्ण दाखलसावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात सध्या १९ रुग्ण दाखल आहेत. तेथे मंगळवारी पाच नवे रुग्ण दाखल झालेत, सर्वांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती डॉ. अभ्युदय मेघे यांनी दिली आहे.कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथील कोविड-१९ उपचार केंद्रात एकूण ३६ कोरोना बाधित दाखल झाले होते. सध्या २१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून १३ व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.- डॉ. सुमित जाजू, नोडल अधिकारी,कस्तुरबा कोविड रुग्णालय.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या