शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

कोरोनापेक्षा सोशल मीडियावर त्याबद्दल पसरवली जाणारी भीती जास्त तीव्र; अँटीबॉडी सिरो सर्व्हेचा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:11 IST

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांच्या सयुंक्त सहकार्याने केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार कोरोनाची घातकता आणि मृत्यूदर खुपच कमी असल्याचा निष्कर्ष निघाल्याने न्यायवैद्यक तज्ज्ञांचे मत खरे ठरताना दिसत आहे.

ठळक मुद्देमृत्यू दरही कमीचन्यावैद्यक तज्ज्ञांचे मत ठरताहेत खरे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ चा प्रकोपापेक्षाही सोशल माध्यमाव्दारे कोरोनाबाबत पसरविली जाणारी भीती अधिक तीव्र असल्याने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत धावाधाव सुरु आहे. कोरोना आजाराची ही भीती अनाठायी व अवास्तव असल्याचे मत वर्ध्यातील न्यायवैद्यक तज्ज्ञांनी यापूर्वीही लोकमतच्या माध्यमातून व्यक्त केले. नुकताच राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांच्या सयुंक्त सहकार्याने केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार कोरोनाची घातकता आणि मृत्यूदर खुपच कमी असल्याचा निष्कर्ष निघाल्याने न्यायवैद्यक तज्ज्ञांचे मत खरे ठरताना दिसत आहे.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांनी संयुक्तरित्या केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार दिल्लीतील जवळपास २३ टक्के लोकांमध्ये कोरोनाची अँटीबॉडी दिसून आली आहे. दिल्लीतील लोकसंख्या अंदाजे ३ कोटी असून त्यापैकी २३ टक्के म्हणजे जवळपास ६५ लाख व्यक्ती कोरोनाबाधित झाले असावे. यातील बहुतांश व्यक्ती कोणाच्याही न कळत किंवा रुग्णालयात न जाता बरेही झालेत. यातील केवळ ३ हजार ७०० व्यक्तींचा मृत्यू झाला असून हा मृत्यूदर फक्त ०.०५ टक्के निघतो. म्हणजेच यापूर्वी कोरोनाचा मृत्यूदर ३.४ टक्के सांगितला जात होता त्यापेक्षाही वास्तविक मृत्यूदर फारच अत्यल्प असल्याचे निष्कर्षातून सिद्ध झाले. यावरुन जसजसा अँटीबॉडी सर्वे केला जाईल तसतसा मृत्यू दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता स्वरक्षणाकरिता खबरदारी घेण्याची गरज आहे.कोरोना इतर आजारासारखाचकोरोना काही वेगळा भयावह आजार नसून इतर गंभीर आजारासारखाच असल्याचे मत व्यक्त होत आहे. देशात २००९ मध्ये स्वाईन फ्ल्यूची साथ आली असताना सुरुवातीला मृत्यू दर ३.४ टक्के सांगितला होता. जागतिक आरोग्य संघटनेने तेव्हाही कोरोना प्रमाणेच विलगीकरण, सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, पीपीई किटचा वापर आदी दिशानिर्देश दिले होते. त्यामुळे अमेरिकेत भीतीचे वातावरण निर्माण होऊन शाळांसह इतर कार्यालये बंद केले होते. पण, सोशल मीडिया तेव्हा इतका प्रभावी नसल्याने त्या भीतीचा भारतीयांवर फारसा प्रभाव पडला नव्हता. परंतु अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार भारतातील २४ टक्के लोकांना म्हणजेच जवळपास ३० करोड भारतीयांना पहिल्या टप्प्यात स्वाईन फ्ल्यूची लागण झाली होती. पण, वास्तविक मृत्यूदर हा फक्त ०.०२ टक्केच निघाला होता, असे मत अभ्यासकांनी मांडले आहेत.

दिल्लीतील अँटीबॉडी सर्वेच्या निष्कार्षावरुन प्रथमदर्शी कोरोनाची भीती अवास्तव असल्याचे निदर्शनास येते. त्याचा मृत्यूदरही कमी असल्याने कोरोनाला भयानक आपत्ती न समजता इतर गंभीर आजारासारखा आजार समजून त्यावर उपाययोजना करायला हव्यात. महाराष्ट्रातही अँटीबॉडी सर्वे करुन त्याच्या निष्कर्षावरुन पुढील निर्णय घेण्याची गरज आहे. जेणे करुन नागरिकांच्या मनातील भीती कमी होईल.- डॉ. इंद्रजीत खांडेकर, न्यायवैद्यक तज्ज्ञ. वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस