शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापेक्षा सोशल मीडियावर त्याबद्दल पसरवली जाणारी भीती जास्त तीव्र; अँटीबॉडी सिरो सर्व्हेचा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:11 IST

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांच्या सयुंक्त सहकार्याने केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार कोरोनाची घातकता आणि मृत्यूदर खुपच कमी असल्याचा निष्कर्ष निघाल्याने न्यायवैद्यक तज्ज्ञांचे मत खरे ठरताना दिसत आहे.

ठळक मुद्देमृत्यू दरही कमीचन्यावैद्यक तज्ज्ञांचे मत ठरताहेत खरे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ चा प्रकोपापेक्षाही सोशल माध्यमाव्दारे कोरोनाबाबत पसरविली जाणारी भीती अधिक तीव्र असल्याने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत धावाधाव सुरु आहे. कोरोना आजाराची ही भीती अनाठायी व अवास्तव असल्याचे मत वर्ध्यातील न्यायवैद्यक तज्ज्ञांनी यापूर्वीही लोकमतच्या माध्यमातून व्यक्त केले. नुकताच राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांच्या सयुंक्त सहकार्याने केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार कोरोनाची घातकता आणि मृत्यूदर खुपच कमी असल्याचा निष्कर्ष निघाल्याने न्यायवैद्यक तज्ज्ञांचे मत खरे ठरताना दिसत आहे.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांनी संयुक्तरित्या केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार दिल्लीतील जवळपास २३ टक्के लोकांमध्ये कोरोनाची अँटीबॉडी दिसून आली आहे. दिल्लीतील लोकसंख्या अंदाजे ३ कोटी असून त्यापैकी २३ टक्के म्हणजे जवळपास ६५ लाख व्यक्ती कोरोनाबाधित झाले असावे. यातील बहुतांश व्यक्ती कोणाच्याही न कळत किंवा रुग्णालयात न जाता बरेही झालेत. यातील केवळ ३ हजार ७०० व्यक्तींचा मृत्यू झाला असून हा मृत्यूदर फक्त ०.०५ टक्के निघतो. म्हणजेच यापूर्वी कोरोनाचा मृत्यूदर ३.४ टक्के सांगितला जात होता त्यापेक्षाही वास्तविक मृत्यूदर फारच अत्यल्प असल्याचे निष्कर्षातून सिद्ध झाले. यावरुन जसजसा अँटीबॉडी सर्वे केला जाईल तसतसा मृत्यू दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता स्वरक्षणाकरिता खबरदारी घेण्याची गरज आहे.कोरोना इतर आजारासारखाचकोरोना काही वेगळा भयावह आजार नसून इतर गंभीर आजारासारखाच असल्याचे मत व्यक्त होत आहे. देशात २००९ मध्ये स्वाईन फ्ल्यूची साथ आली असताना सुरुवातीला मृत्यू दर ३.४ टक्के सांगितला होता. जागतिक आरोग्य संघटनेने तेव्हाही कोरोना प्रमाणेच विलगीकरण, सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, पीपीई किटचा वापर आदी दिशानिर्देश दिले होते. त्यामुळे अमेरिकेत भीतीचे वातावरण निर्माण होऊन शाळांसह इतर कार्यालये बंद केले होते. पण, सोशल मीडिया तेव्हा इतका प्रभावी नसल्याने त्या भीतीचा भारतीयांवर फारसा प्रभाव पडला नव्हता. परंतु अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार भारतातील २४ टक्के लोकांना म्हणजेच जवळपास ३० करोड भारतीयांना पहिल्या टप्प्यात स्वाईन फ्ल्यूची लागण झाली होती. पण, वास्तविक मृत्यूदर हा फक्त ०.०२ टक्केच निघाला होता, असे मत अभ्यासकांनी मांडले आहेत.

दिल्लीतील अँटीबॉडी सर्वेच्या निष्कार्षावरुन प्रथमदर्शी कोरोनाची भीती अवास्तव असल्याचे निदर्शनास येते. त्याचा मृत्यूदरही कमी असल्याने कोरोनाला भयानक आपत्ती न समजता इतर गंभीर आजारासारखा आजार समजून त्यावर उपाययोजना करायला हव्यात. महाराष्ट्रातही अँटीबॉडी सर्वे करुन त्याच्या निष्कर्षावरुन पुढील निर्णय घेण्याची गरज आहे. जेणे करुन नागरिकांच्या मनातील भीती कमी होईल.- डॉ. इंद्रजीत खांडेकर, न्यायवैद्यक तज्ज्ञ. वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस