शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

कोरोनापेक्षा सोशल मीडियावर त्याबद्दल पसरवली जाणारी भीती जास्त तीव्र; अँटीबॉडी सिरो सर्व्हेचा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:11 IST

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांच्या सयुंक्त सहकार्याने केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार कोरोनाची घातकता आणि मृत्यूदर खुपच कमी असल्याचा निष्कर्ष निघाल्याने न्यायवैद्यक तज्ज्ञांचे मत खरे ठरताना दिसत आहे.

ठळक मुद्देमृत्यू दरही कमीचन्यावैद्यक तज्ज्ञांचे मत ठरताहेत खरे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ चा प्रकोपापेक्षाही सोशल माध्यमाव्दारे कोरोनाबाबत पसरविली जाणारी भीती अधिक तीव्र असल्याने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत धावाधाव सुरु आहे. कोरोना आजाराची ही भीती अनाठायी व अवास्तव असल्याचे मत वर्ध्यातील न्यायवैद्यक तज्ज्ञांनी यापूर्वीही लोकमतच्या माध्यमातून व्यक्त केले. नुकताच राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांच्या सयुंक्त सहकार्याने केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार कोरोनाची घातकता आणि मृत्यूदर खुपच कमी असल्याचा निष्कर्ष निघाल्याने न्यायवैद्यक तज्ज्ञांचे मत खरे ठरताना दिसत आहे.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांनी संयुक्तरित्या केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार दिल्लीतील जवळपास २३ टक्के लोकांमध्ये कोरोनाची अँटीबॉडी दिसून आली आहे. दिल्लीतील लोकसंख्या अंदाजे ३ कोटी असून त्यापैकी २३ टक्के म्हणजे जवळपास ६५ लाख व्यक्ती कोरोनाबाधित झाले असावे. यातील बहुतांश व्यक्ती कोणाच्याही न कळत किंवा रुग्णालयात न जाता बरेही झालेत. यातील केवळ ३ हजार ७०० व्यक्तींचा मृत्यू झाला असून हा मृत्यूदर फक्त ०.०५ टक्के निघतो. म्हणजेच यापूर्वी कोरोनाचा मृत्यूदर ३.४ टक्के सांगितला जात होता त्यापेक्षाही वास्तविक मृत्यूदर फारच अत्यल्प असल्याचे निष्कर्षातून सिद्ध झाले. यावरुन जसजसा अँटीबॉडी सर्वे केला जाईल तसतसा मृत्यू दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता स्वरक्षणाकरिता खबरदारी घेण्याची गरज आहे.कोरोना इतर आजारासारखाचकोरोना काही वेगळा भयावह आजार नसून इतर गंभीर आजारासारखाच असल्याचे मत व्यक्त होत आहे. देशात २००९ मध्ये स्वाईन फ्ल्यूची साथ आली असताना सुरुवातीला मृत्यू दर ३.४ टक्के सांगितला होता. जागतिक आरोग्य संघटनेने तेव्हाही कोरोना प्रमाणेच विलगीकरण, सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, पीपीई किटचा वापर आदी दिशानिर्देश दिले होते. त्यामुळे अमेरिकेत भीतीचे वातावरण निर्माण होऊन शाळांसह इतर कार्यालये बंद केले होते. पण, सोशल मीडिया तेव्हा इतका प्रभावी नसल्याने त्या भीतीचा भारतीयांवर फारसा प्रभाव पडला नव्हता. परंतु अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार भारतातील २४ टक्के लोकांना म्हणजेच जवळपास ३० करोड भारतीयांना पहिल्या टप्प्यात स्वाईन फ्ल्यूची लागण झाली होती. पण, वास्तविक मृत्यूदर हा फक्त ०.०२ टक्केच निघाला होता, असे मत अभ्यासकांनी मांडले आहेत.

दिल्लीतील अँटीबॉडी सर्वेच्या निष्कार्षावरुन प्रथमदर्शी कोरोनाची भीती अवास्तव असल्याचे निदर्शनास येते. त्याचा मृत्यूदरही कमी असल्याने कोरोनाला भयानक आपत्ती न समजता इतर गंभीर आजारासारखा आजार समजून त्यावर उपाययोजना करायला हव्यात. महाराष्ट्रातही अँटीबॉडी सर्वे करुन त्याच्या निष्कर्षावरुन पुढील निर्णय घेण्याची गरज आहे. जेणे करुन नागरिकांच्या मनातील भीती कमी होईल.- डॉ. इंद्रजीत खांडेकर, न्यायवैद्यक तज्ज्ञ. वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस