शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात; विलगीकरणाचा आलेख चढताच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 16:12 IST

कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता विलगीकरणावर भर असल्याने वर्धा जिल्ह्यामध्ये विलगीकरणाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे.

ठळक मुद्दे५३२९ व्यक्ती गृह विलगीकरणात ४७५३१ व्यक्ती क्वारंटाईनमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यभरात कोरोनाचा हाहाकार असतानाही वर्ध्यातील प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाला पाय पसरविण्यास संधीच मिळाली नाही. परिणामी, राज्यभरात सर्वांत कमी रुग्णसंख्या वर्धा जिल्ह्यात आहे. येथे कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता विलगीकरणावर भर असल्याने जिल्ह्यामध्ये विलगीकरणाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या ५ हजार ३२९ व्यक्ती गृह विलगीकरणात, तर ११७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.लॉकडाऊनच्या कालावधीत रोजगार हिरावल्यामुळे अनेकांनी घराचा रस्ता धरला. जिल्ह्यातही तब्बल ५० हजार व्यक्ती बाहेर जिल्हा-राज्यातून दाखल झाल्या आहेत.

बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सोळावर पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाने बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यावर भर दिला आहे. ज्यांच्याकडे व्यवस्था नाही, अशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ५२ हजार ८६० व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ४७ हजार ५३१ व्यक्तींचा गृह विलगीकरणाचा कार्यकाळ संपला असून सध्या ५ हजार ३२९ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत. सध्या ई-पासद्वारे जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून नागरिक क्वारंटाईन होण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

तसेच बाहेर जिल्ह्यातून आलेली एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यास अख्खा परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये येत असल्याने इतर नागरिकांना विनाकारण १४ दिवस होम क्वारंटाईन होण्याची वेळ येते. ही अडचण टाळण्यासाठी आता सुरुवातीचे सात दिवस संस्थात्मक, तर नंतरचे सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केले आहे. त्यामुळे आता संस्थात्मक विलगीकरणाची आकडेवारीही वाढणार आहे.

४ हजार १८१ व्यक्तींची केली चाचणीकोरोना संशयित म्हणून आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ४ हजार १८१ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४ हजार ११५ अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ४ हजार ८० अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप ६६ अहवाल प्रलंबित असून जिल्ह्यामध्ये १६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

११ व्यक्ती कोरोनामुक्तजिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजनांमुळे या महामारीच्या काळात जिल्ह्यामध्ये १६ रुग्ण आढळून आले असून त्यातील सर्वच रुग्ण बाहेर जिल्ह्यातून प्रवास करून आलेले आहेत. यातील ११ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून तिघांवर जिल्ह्यात तर एकावर नागपुरात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या