शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

वर्धा जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात; विलगीकरणाचा आलेख चढताच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 16:12 IST

कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता विलगीकरणावर भर असल्याने वर्धा जिल्ह्यामध्ये विलगीकरणाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे.

ठळक मुद्दे५३२९ व्यक्ती गृह विलगीकरणात ४७५३१ व्यक्ती क्वारंटाईनमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यभरात कोरोनाचा हाहाकार असतानाही वर्ध्यातील प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाला पाय पसरविण्यास संधीच मिळाली नाही. परिणामी, राज्यभरात सर्वांत कमी रुग्णसंख्या वर्धा जिल्ह्यात आहे. येथे कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता विलगीकरणावर भर असल्याने जिल्ह्यामध्ये विलगीकरणाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या ५ हजार ३२९ व्यक्ती गृह विलगीकरणात, तर ११७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.लॉकडाऊनच्या कालावधीत रोजगार हिरावल्यामुळे अनेकांनी घराचा रस्ता धरला. जिल्ह्यातही तब्बल ५० हजार व्यक्ती बाहेर जिल्हा-राज्यातून दाखल झाल्या आहेत.

बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सोळावर पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाने बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यावर भर दिला आहे. ज्यांच्याकडे व्यवस्था नाही, अशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ५२ हजार ८६० व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ४७ हजार ५३१ व्यक्तींचा गृह विलगीकरणाचा कार्यकाळ संपला असून सध्या ५ हजार ३२९ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत. सध्या ई-पासद्वारे जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून नागरिक क्वारंटाईन होण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

तसेच बाहेर जिल्ह्यातून आलेली एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यास अख्खा परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये येत असल्याने इतर नागरिकांना विनाकारण १४ दिवस होम क्वारंटाईन होण्याची वेळ येते. ही अडचण टाळण्यासाठी आता सुरुवातीचे सात दिवस संस्थात्मक, तर नंतरचे सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केले आहे. त्यामुळे आता संस्थात्मक विलगीकरणाची आकडेवारीही वाढणार आहे.

४ हजार १८१ व्यक्तींची केली चाचणीकोरोना संशयित म्हणून आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ४ हजार १८१ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४ हजार ११५ अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ४ हजार ८० अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप ६६ अहवाल प्रलंबित असून जिल्ह्यामध्ये १६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

११ व्यक्ती कोरोनामुक्तजिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजनांमुळे या महामारीच्या काळात जिल्ह्यामध्ये १६ रुग्ण आढळून आले असून त्यातील सर्वच रुग्ण बाहेर जिल्ह्यातून प्रवास करून आलेले आहेत. यातील ११ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून तिघांवर जिल्ह्यात तर एकावर नागपुरात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या