शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

Coronavirus ; कोरोनामुळे अनेकांच्या घरी लांबला पाळणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 08:58 IST

Wardha news कोविड संसर्गाच्या भीतीमुळे अनेकांच्या घरी पाळणा ही लांबल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देनागरिकांची तोबा गर्दी ठरतेय संसर्ग वाढीसाठी पोषक

वर्धा : नागरिकांची तोबा गर्दी कोरोना संसर्ग झपाट्याने वाढण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याने बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यांसह विविध कार्यक्रमांवर होत आहेत. विशेष म्हणजे कोविड संसर्गाच्या भीतीमुळे अनेकांच्या घरी पाळणा ही लांबल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

लग्नसोहळा म्हटला की वाजंत्री, वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत काढण्यात येणारी वरात आदी चित्र डोळ्यासमोर येते. परंतु, मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे विवाह सोहळ्यांसह धार्मिक आणि विविध कार्यक्रमांवर अटी व शर्ती लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवघ्या काही व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पाडले जात आहेत. असे असले तरी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सध्या राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. या कठोर निर्बंधांच्या काळात धुमधडाक्यात होणाऱ्या लग्नसोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून लग्नसोहळ्यांवर नियम व अटी कायम असल्याने अनेकांची लग्नसोहळे पुढे ढकललेत. तर काहींनी मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसोहळे उरकवले. तसेच काही नव विवाहितांनी पाळणा लांबविल्याचे वास्तव आहे.

साधेपणाने केले जातेय लग्न

कोरोना संकटामुळे ग्रामीण आणि शहरी भागात रीतसर परवानगी घेऊन अगदी साधेपणाने लग्नसोहळे केले जात आहेत. लग्नसोहळा दरम्यान नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना वधू व वर कुटुंबीयांना पोलिसांकडून दिल्या जात आहेत.

१ टक्क्याने जन्मदर वाढला

जिल्ह्यात २०१९ मध्ये १६ हजार ६८१ बालकांनी जन्म घेतला. त्यावेळी जिल्ह्याचा जन्मदर १२.४० टक्के होता. तर २०२० मध्ये जिल्ह्यात १७ हजार ७९७ बालकांनी जन्म घेतला. त्याचा जन्मदर १३.११ टक्के असल्याचे सांगण्यात आले.

 

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस