शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

तळीरामांना आवर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

वर्धा जिल्हा दारूबंदी असला तरी येथे देशी, विदेशी, गावठी दारू राजरोसपणे विकली जाते. या अवैद्य व्यवसायात जिल्ह्यात १० हजारांवर लोक गुंतलेले आहेत. गावागावात दारू विक्रीला कुटीर उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.कमी श्रमात मोठा मोबदला यात मिळत असल्याने अनेकजण यात सहभागी आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागात संसर्गाची भीती : दोन ठाण्यांची पोलीस यंत्रणा सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : महसूल, ग्रामपंचायत, आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नाने नागरिकांच्या सहकार्याने कारंजा तालुक्यांत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेला नाही. पण कारंजा तालुक्यातील अनेक गावांत तळीरामांचे दुसऱ्या तालुक्यांतून आवागमन सुरू असल्यामुळे या तालुक्यात कोरोनाचा केव्हा शिरकाव होईल याचा नेम नाही.दारूबाजांच्या भटकंतीमुळे आणि अवैद्य दारू निर्मिती व विक्रीमुळे अनेक खेड्यातील सामान्य जनता कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहे. कारंजा तालुक्यात दारूबंदी सध्यातरी पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे कागदावरच दिसून येत आहे. कारंजा पोलीस ठाण्याचा भार कमी करण्यासाठी कारंजा तालुक्यातील पारडी बोटोणा, सारवाडी, जसापूर, नरसिंगपूर, एकांबा, किन्हाळा अशी १५ ते २० गावे तळेगाव पोलीस ठाण्याला जोडल्या गेली आहेत. बहुतांश सर्व गावे जंगलाला लागून आहे. तळेगाव पोलीस ठाण्याचे या सर्व गावांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. त्यामुळे काही गावात सर्रास अवैद्य दारू निर्र्मिती व विक्री सुरू आहे. सारवाडी आणि पारडीमध्ये दारूचा पूर आहे. एकट्या पारडी गावांत जंगलाला लागून २५ हून अधिक अवैद्य दारू भट्ट्या आहेत. येथे दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे आष्टी तालुक्यातील थार आणि सभोवतालचे नारा, आजनादेवी , एकांबा, बोटोना येथील ‘तळीराम’ छुप्या जंगली मार्गाने, आपली दारूची हौस भागविण्याकरीता पायी किंवा सोयीच्या वाहनानी पारडीला येतात. आणि सामान्य जनतेला कोरोनाचा धोका निर्माण करतात. तळेगाव पोलीस ठाण्याचे या गावांतील या अवैद्य व्यवसायाकडे आणि वाहतुकीकडे दुर्लक्ष आहे. नागपूर सिमेला लागून असलेल्या बोरी, ठाणेगांव, धतीमुर्ती, कन्नमवारग्राम या गावामध्ये सुद्धा काटोल व नागपूरवरून रात्री बे-रात्री दारूची वाहतूक सुरू असते.रेड झोन असलेल्या नागपूर जिल्ह्यातून कारंजात येत असलेल्या दारूमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारंजा पोलीस ठाण्याने रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे आहे. कारंजा तालुक्यांतील अवैद्य दारू निर्र्मिती आणि विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यापुर्वी अनेक गावांत महिला व युवक दारूबंदी मंडळ कार्यरत होती. सामाजिक कर्तव्य म्हणून उत्स्फुर्तपणे काम करणारी मंडळी पोलीस यंत्रणेची साथ व सरंक्षण न मिळाल्यामुळे निष्क्रीय झाली. आपोआपच या असामाजिक व्यवसायाला रान खुले झाले आहे. पुन्हा गावखेड्यांचे सामाजिक आरोग्य राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने, तालुक्यांतील दारूबंदीसाठी कर्तव्य बजावणे अवैद्य दारू निर्मिती व विक्रेत्यांना साथ न देता दारूबंदी मंडळांना मनापासून साथ देणे आवश्यक आहे.दारूविक्री व्यवसाय झाला कुटीरोद्योगवर्धा जिल्हा दारूबंदी असला तरी येथे देशी, विदेशी, गावठी दारू राजरोसपणे विकली जाते. या अवैद्य व्यवसायात जिल्ह्यात १० हजारांवर लोक गुंतलेले आहेत. गावागावात दारू विक्रीला कुटीर उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.कमी श्रमात मोठा मोबदला यात मिळत असल्याने अनेकजण यात सहभागी आहेत.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाPoliceपोलिस