शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी उपविभागातील ३३५ विहिरींचे बांधकाम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

आर्वी उपविभागात आर्वी, आष्टी, तसेच कारंजा (घा.) तालुक्यांचा समावेश असून, या तिन्ही तालुक्यांतील ३३५ विहिरींचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महत्त्वाकांशी ठरणाऱ्या या योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष कामांनाही ब्रेक लागला आहे. कोरडवाहू शेतीही सिंचनाखाली यावी या हेतूने, तसेच स्वतंत्र सिंचनव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून शासनाने धडक सिंचन विहीर योजना उपक्रम हाती घेतला.

अमोल सोटेलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शेतकऱ्यांनी तिन्ही हंगामांत विविध पीक घेऊन उत्पन्न दुप्पट करता यावे, या हेतूने शासनाकडून धडक सिंचन विहीर योजना कार्यान्वित करण्यात आली; पण निधीअभावी शासनाची ही योजना पांढरा हत्ती ठरू पाहत आहे. आर्वी उपविभागातील तब्बल ३३५ सिंचन विहिरींचे बांधकाम निधीअभावी अर्धवट असून, शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.आर्वी उपविभागात आर्वी, आष्टी, तसेच कारंजा (घा.) तालुक्यांचा समावेश असून, या तिन्ही तालुक्यांतील ३३५ विहिरींचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महत्त्वाकांशी ठरणाऱ्या या योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष कामांनाही ब्रेक लागला आहे. कोरडवाहू शेतीही सिंचनाखाली यावी या हेतूने, तसेच स्वतंत्र सिंचनव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून शासनाने धडक सिंचन विहीर योजना उपक्रम हाती घेतला. आपल्यालाही विहीर मिळेल म्हणून शेतकरीवर्ग समाधानी झाला होता; पण सध्या निधीच नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.विशेष म्हणजे, शासनाने टप्प्याटप्प्याने सिंचन विहिरीचे अनुदान वितरित करायला सुरुवात केली होती. मात्र, अलीकडच्या काळात हे सर्व खितपत पडल्यामुळे शेतकऱ्यांनी उसनवारीने, सावकाराकडून पैसे आणून बांधकाम केले. मात्र, त्यांना काहीही पैसे मिळालेले नाहीत. परिणामी, अनेक विहिरी अर्धवट स्थितीत आहेत, हे विशेष. 

तिन्ही यंत्रणा आल्या अडचणीत-    धडक सिंचन विहीर बांधकामासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जिल्हा परिषद लघु सिंचन विभाग, अशा तीन स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाकडून निधी प्रलंबित असल्यामुळे या तिन्ही यंत्रणा अडचणीत आलेल्या आहेत.  शेतकरी वारंवार शासकीय कार्यालयाला घिरट्या घालून साहेब निधी कधी येणार, अशी विचारणा करीत असल्यामुळे अधिकारीही निरुत्तर झाले आहेत.

धडक सिंचन विहिरीच्या अर्धवट बांधकामाच्या अनुदानासंदर्भात शासनाकडे मागणीचे प्रस्ताव वारंवार पाठविण्यात आले आहेत. मात्र, शासनाकडून निधी आला नसल्याने शेतकऱ्यांचे सर्व बांधकाम प्रलंबित आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे; पण निधी कधी येईल, हे निश्चित सांगता येत नाही.- विनीत साबळे, उपविभागीय अभियंता, जि.प. लघुसिंचन, उपविभाग, आर्वी

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प