शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी उपविभागातील ३३५ विहिरींचे बांधकाम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

आर्वी उपविभागात आर्वी, आष्टी, तसेच कारंजा (घा.) तालुक्यांचा समावेश असून, या तिन्ही तालुक्यांतील ३३५ विहिरींचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महत्त्वाकांशी ठरणाऱ्या या योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष कामांनाही ब्रेक लागला आहे. कोरडवाहू शेतीही सिंचनाखाली यावी या हेतूने, तसेच स्वतंत्र सिंचनव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून शासनाने धडक सिंचन विहीर योजना उपक्रम हाती घेतला.

अमोल सोटेलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शेतकऱ्यांनी तिन्ही हंगामांत विविध पीक घेऊन उत्पन्न दुप्पट करता यावे, या हेतूने शासनाकडून धडक सिंचन विहीर योजना कार्यान्वित करण्यात आली; पण निधीअभावी शासनाची ही योजना पांढरा हत्ती ठरू पाहत आहे. आर्वी उपविभागातील तब्बल ३३५ सिंचन विहिरींचे बांधकाम निधीअभावी अर्धवट असून, शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.आर्वी उपविभागात आर्वी, आष्टी, तसेच कारंजा (घा.) तालुक्यांचा समावेश असून, या तिन्ही तालुक्यांतील ३३५ विहिरींचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महत्त्वाकांशी ठरणाऱ्या या योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष कामांनाही ब्रेक लागला आहे. कोरडवाहू शेतीही सिंचनाखाली यावी या हेतूने, तसेच स्वतंत्र सिंचनव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून शासनाने धडक सिंचन विहीर योजना उपक्रम हाती घेतला. आपल्यालाही विहीर मिळेल म्हणून शेतकरीवर्ग समाधानी झाला होता; पण सध्या निधीच नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.विशेष म्हणजे, शासनाने टप्प्याटप्प्याने सिंचन विहिरीचे अनुदान वितरित करायला सुरुवात केली होती. मात्र, अलीकडच्या काळात हे सर्व खितपत पडल्यामुळे शेतकऱ्यांनी उसनवारीने, सावकाराकडून पैसे आणून बांधकाम केले. मात्र, त्यांना काहीही पैसे मिळालेले नाहीत. परिणामी, अनेक विहिरी अर्धवट स्थितीत आहेत, हे विशेष. 

तिन्ही यंत्रणा आल्या अडचणीत-    धडक सिंचन विहीर बांधकामासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जिल्हा परिषद लघु सिंचन विभाग, अशा तीन स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाकडून निधी प्रलंबित असल्यामुळे या तिन्ही यंत्रणा अडचणीत आलेल्या आहेत.  शेतकरी वारंवार शासकीय कार्यालयाला घिरट्या घालून साहेब निधी कधी येणार, अशी विचारणा करीत असल्यामुळे अधिकारीही निरुत्तर झाले आहेत.

धडक सिंचन विहिरीच्या अर्धवट बांधकामाच्या अनुदानासंदर्भात शासनाकडे मागणीचे प्रस्ताव वारंवार पाठविण्यात आले आहेत. मात्र, शासनाकडून निधी आला नसल्याने शेतकऱ्यांचे सर्व बांधकाम प्रलंबित आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे; पण निधी कधी येईल, हे निश्चित सांगता येत नाही.- विनीत साबळे, उपविभागीय अभियंता, जि.प. लघुसिंचन, उपविभाग, आर्वी

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प