शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पिकांची लागवड करताना जमिनीचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:57 IST

शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन कुठल्या गुणवत्तेची आहे याचा विचार करूनच विविध पिकांची लागवड करावी. शिवाय शेतातील मातीचे परीक्षण करून आवश्यक तितक्याच प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले.

ठळक मुद्देज्ञानेश्वर भारती : ‘उन्नत शेती-समुद्ध शेतकरी’ पंधरवडा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन कुठल्या गुणवत्तेची आहे याचा विचार करूनच विविध पिकांची लागवड करावी. शिवाय शेतातील मातीचे परीक्षण करून आवश्यक तितक्याच प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले.सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून २४ मे ते ७ जून या कालावधीत ‘उन्नत शेती-प्रगत शेतकरी’ हा उपक्रम जिल्ह्यातील कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्या उपक्रमाचा उद्घाटनपर कार्यक्रम रोठा येथे पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समन्वयीत शेतकरी उत्पादक कंपनी वर्धाचे अध्यक्ष नरेंद्र काळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महाबीज अकोलाचे विपणन महाव्यवस्थापक रामचंद्र नाके, सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. पी.एस. उंबरकर, कृषी विषय विशेषज्ञ डॉ. रुपेश झाडोदे, महाबीज नागपूरचे विभागीय व्यवस्थापक लिलाधर मेश्राम, केम प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक दिनेश राठोड आदींची उपस्थिती होती.शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ‘उन्नत शेती-समुद्ध शेतकरी’ हा पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना प्रमुख पिकांकरिता आधुनिक आणि अद्यायावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे. शेतकरी हितार्थ असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे. जमिनीची सुपिकता वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे. बीज प्रक्रियेबाबत विशेष कार्यशाळा आयोजित करणे. पीक विमा योजनेचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कवच देणे. विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे. वेळोवेळी योग्य मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांना एम किसान पोर्टलशी जोडणे आदीसाठी जिल्ह्यात सुमारे ४७४ ठिकाणी विशेष कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मेघा कुमरे, अजय फुलझेले, कवडु साखरकर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Farmerशेतकरी