शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

काँग्रेस गटनेत्याने ‘रायगड’मध्ये बळकावले दालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून नगरपालिकेची ‘रायगड’ ही आकर्षक इमारत साकार झाली. इमारतीमधील व्यवस्था, सजावट युनिक असून अनेकांना ती भूरळ घालणारीच आहे. नगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, काँग्रेसचे पाच असे संख्याबळ आहेत. पालिकेत विरोधी पक्षनेत्याकरिता १३ नगरसेवकाचे संख्याबळ आवश्यक आहे. परंतु हे संख्याबळ कोणत्याही विरोधी पक्षाकडे नाहीत.

ठळक मुद्देवर्धा नगरपालिकेच्या नगरसेवकांमध्ये नाराजी : इतर गटनेत्यांची सामूहिक व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या कित्येक वर्षापासून जलकुंभाखाली असलेले नगरपालिकेचे कामकाज गुपचूप सुसज्ज अशा ‘रायगड’ इमारतीमध्ये गेले. या ठिकाणी नगराध्यक्ष, उपाध्यक्षांसह अधिकाऱ्यांकरीता वेगळे दालन तयार करण्यात आले. तसेच तीन गटनेत्यांकरिता एका मोठ्या हॉलमध्ये वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली. परंतु पालिकेत संख्याबळ नसतानाही काँग्रेसच्या गटनेत्याने चक्क एका अधिकाऱ्यासाठी राखीव असलेले दालन बळकावले. स्वतंत्र्य दालन मिळविण्याची ही हाव इतर नगरसेवकांना खटकल्याने नाराजी व्यक्त होत आहे.कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून नगरपालिकेची ‘रायगड’ ही आकर्षक इमारत साकार झाली. इमारतीमधील व्यवस्था, सजावट युनिक असून अनेकांना ती भूरळ घालणारीच आहे. नगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, काँग्रेसचे पाच असे संख्याबळ आहेत. पालिकेत विरोधी पक्षनेत्याकरिता १३ नगरसेवकाचे संख्याबळ आवश्यक आहे. परंतु हे संख्याबळ कोणत्याही विरोधी पक्षाकडे नाहीत. त्यामुळे भाजपाचे गटनेता म्हणून प्रदीप ठाकरे, राष्ट्रवादीचे सोनल ठाकरे आणि काँग्रेसचे नीलेश खोंड यांची सदस्यांनी निवड केली आहे. ‘रायगड’ मध्ये पदाधिकारी व अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. विरोधी पक्ष नेता नसल्याने त्यांचे वेगळे दालन न करता तीन गटनेत्यांसाठी एकाच मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली. याच हॉलच्या बाजुला एका अधिकाऱ्यासाठी दालन राखीव ठेवले होते. पण, स्वतंत्र्य दालनाचा मोह आवरला नसल्याने अल्पसंख्याबळ असतानाही काँग्रसचे गटनेता नीलेश खोंड यांनी अधिकाऱ्याच्या राखीव दालनावर अतिक्रमण करुन ते दालन ताब्यात घेतले. याप्रकारामुळे सत्ताधारी आणि दुसऱ्या नंबरचे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्येही नाराजीचा सूर आहे. काँग्रेसच्या गटनेत्याला स्वतंत्र दालन मिळते तर आम्हाला का नाही; अशीही चर्चा आता पालिकेत सुरु झाल्याने दालनावरुन वादंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगराध्यक्ष, मुख्याधिकारी गप्पचन.प. मध्ये भाजपाकडे संख्याबळ आहे आणि सत्ताही. तरीही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या गटनेत्याकरिता एका हॉलमध्ये बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पण, काँग्रेसच्या गटनेत्याने कोणाचीही परवानगी न घेता स्वत: एका अधिकाऱ्यासाठी राखीव असलेल्य दालनात घुसखोरी करुन आपल्या नावाची पाटी लावत कामकाज सुरु केले आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. केवळ पाच नगरसेवकांच्या जोरावर गटनेता झालेला नगरसेवक स्वतंत्र दालन घेऊन शकतो तर मग सत्ता असलेल्या भाजपाच्या आणि त्यांनतर सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीच्या गटनेत्याला स्वतंत्र दालन का नाही? असा प्रश्न आता चर्चीला जात आहे. पण, याबाबत नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारीही गप्प असल्याने नगरसेवकांचाही रोष वाढत आहे. आता नगरसेवक काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. 

येत्या काही दिवसावर पालिकेच्या निवडणुका आहे. त्या अनुषंगाने नगरसेवकांशी चर्चा करण्यासाठी स्वतंत्र दालन आवश्यक होते. तिन्ही पक्षाचे गटनेते एकाच ठिकाणी चर्चा कशी करणार? त्यामुळे सुुरुवातीपासून स्वतंत्र दालन मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आता मी माझे स्वतंत्र दालन मिळविले. इतर गटनेत्यांनीही त्यांच्यासाठी स्वतंत्र दालन घ्यावे.- नीलेश खोंड,   गटनेता, काँग्रेस, न.प.वर्धा.

 

टॅग्स :congressकाँग्रेसMuncipal Corporationनगर पालिका