शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

नानाजी देशमुख कृषी संजीवनीतील जाचक अटी शेतकऱ्यांकरिता डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 1:52 PM

शासनाच्या शेतकरीहिताच्या अनेक योजना असल्या तरी योजनेतील जाचक अटींची पूर्तता करताना शेतकरी घायकुतीस येतात. असाच प्रत्यय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबाबत येत असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे.

फनिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्या शेतकरीहिताच्या अनेक योजना असल्या तरी योजनेतील जाचक अटींची पूर्तता करताना शेतकरी घायकुतीस येतात. असाच प्रत्यय शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबाबत येत असल्याने या योजनेचेही भवितव्य अधांतरीच असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे.शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प काही भागांसाठी सुरू केला आहे. पण, या प्रकल्पातील जाचक अटी लक्षात घेत्या त्या रद्द न करता प्रकल्प राबविल्यास एकही शेतकरी लाभार्थी लाभ घेऊ शकत नाही.या प्रकल्पातील शेतकऱ्यांना विहीर पाहिजे असल्यास एक चौरस किलोमीटर परिसरात आठपेक्षा अधिक विहिरी मागणाऱ्या शेतकऱ्यांना भूगर्भ विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र आणणे सक्तीचे केले आहे. तसेच कोणतेही साहित्य शेतकऱ्यांनी प्रथम रोखीने खरेदी करून नंतर अनुदान मागावे, अशा अटी घातल्या आहेत. रोहणा परिसरातील वाई, बोदड, चोरआंबा, गौरखेडा, सालदरा, दिघी, सायखेडा, वडगाव या सर्वच गावांत एक चौरस किलोमीटर परिसरात आधीच ८ विहिरी आहेत, तरीदेखील शेतकऱ्यांची खस्ता हालत आहे. या कामात १० टक्केही सिंचन नाही. योजनेतील अटीनुसार या भागात एकाही नवीन विहिरीला अनुदान मिळू शकत नाही.मग, हा प्रकल्प काय कामाचा, असा प्रश्न निर्माण होतो. विहिरी खोदण्यासाठी भूगर्भ विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र सक्तीचे केले. पण, भूगर्भ विभागातील अधिकारी म्हणतात, हा भाग ड्रायझोनमध्ये येतो. या कारणाने प्रमाणपत्र देता येत नाही. मग हे प्रमाणपत्रच मिळणार नसेल तर प्रकल्प कुचकामी ठरणार तसेच कृषी साहित्य खरेदी करताना लाभार्थींनी प्रथम हे साहित्य रोखीने खरेदी करून मग अनुदानाचा प्रस्ताव सादर करावा, ही अट आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत जाचक असून रोखीने साहित्य खरेदी करण्यासाठी हाताशी पैसे असलेला शेतकरी दुर्मीळ आहे.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील एक चौरस किमीच्या परिसरात ८ पेक्षा अधिक विहिरी असून जिल्हा भूगर्भ विभागाचे प्रमाणपत्र सक्तीचे व साहित्याची अगोदर रोखीने खरेदी करणे अशा जाचक अटी रद्द केल्याशिवाय प्रकल्प लाभदायी ठरणार नाही.- रवींद्र बाळाजी जुवारेशेतकरी, रोहणा.

२६ जानेवारीच्या ग्रामसभेत घ्या ठरावशासनाला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, असे वाटत असेल तर शासनाने उपरोक्त अटी रद्द कराव्या व त्यासाठी प्रकल्पात समाविष्ट गावातील ग्रामपंचायतीने येत्या २६ जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभेत तसा ठराव करून त्याच्या प्रती जिल्हाधिकारी तथा प्रकल्पातील संचालकांना व संबंधित विभागाना पाठवाव्यात, असे आवाहन शेतकरी रवींद्र जुवारे व स्थानिक सरपंच सुनील वाघ यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती