शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

३७३ शेतकऱ्यांनी नोंदविल्या तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

खरीप हंगामात नुकसान झालेल्या १ लाख १५ हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे पंचनामे पूर्ण  झाले आहेत. कापूस पिकांचे पंचनामे सुरू आहेत. महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने संयुक्तरीत्या पंचनामे केले जात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावरच नुकसानीचे क्षेत्र कळेल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे  यांनी दिली.

ठळक मुद्देपीक विमा योजना : २७,६६७ शेतकर्यांनी उतरविला विमा

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिकांना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि  विविध रोगांच्या आक्रमणा पिकांचे जिल्ह्यात दरवर्षी मोठे नुकसान होते. पीक नुकसानीच्या कालावधीत अत्यंत कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य टिकून राहावे, पिकांना संरक्षण मिळावे म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत  आतापावेतो जिल्ह्यातील २७ हजार ६६७ शेतकर्यांनी पीक विमा भरला. मात्र पीक विमा भरूनही बहुतांशवेळी नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले जाते.  यात शेतकर्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. यंदा खरीप हंगामात अतिपाऊस आणि विविध रोगांच्या आक्रमणामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीनचे पीक पिवळे पडले तर कपाशीचीही बोंडे सडली. ७२ तासांत नुकसान झालेल्या ३७३ शेतकर्यांनी कृषी ऑनलाईन तक्रारी नोंदविल्या.  

पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यातखरीप हंगामात नुकसान झालेल्या १ लाख १५ हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे पंचनामे पूर्ण  झाले आहेत. कापूस पिकांचे पंचनामे सुरू आहेत. महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने संयुक्तरीत्या पंचनामे केले जात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावरच नुकसानीचे क्षेत्र कळेल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे  यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीबांधवांना पीक नुकसानीपोटी मिळणार्या आर्थिक मदतीकरिता दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

१,१५००० हेक्टरवरील पिकांचे झालेत पंचनामेखरीप हंगामात अतिपाऊस, विविध रोगांच्या आक्रमणामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे अनेकांना सोयाबीनचा एकरी एक  ते दोन पोती उतारा आला. तर कपाशी पिकाचीही अशीच अवस्था झाली. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरीत्या पंचनामे केले. १ लाख १५ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून  कपाशीचे पंचनामे सुरू आहेत.

पिकांना संरक्षण मिळावे म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जाते. जिलह्यातील २७ हजार ६६७ शेतकर्यांनी पिकांचा विमा उतरविला असून ४ कोटी ९२ लाख ६९ हजार नुकसान भरपाई देण्यात आली आहे. पीक विमा उतरवूनही लाभ मिळाला नसल्यास शेतकर्यांनी तक्रार करावी. उपाययाेजना केल्या जाईल.          -विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती