शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

३७३ शेतकऱ्यांनी नोंदविल्या तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

खरीप हंगामात नुकसान झालेल्या १ लाख १५ हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे पंचनामे पूर्ण  झाले आहेत. कापूस पिकांचे पंचनामे सुरू आहेत. महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने संयुक्तरीत्या पंचनामे केले जात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावरच नुकसानीचे क्षेत्र कळेल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे  यांनी दिली.

ठळक मुद्देपीक विमा योजना : २७,६६७ शेतकर्यांनी उतरविला विमा

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिकांना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि  विविध रोगांच्या आक्रमणा पिकांचे जिल्ह्यात दरवर्षी मोठे नुकसान होते. पीक नुकसानीच्या कालावधीत अत्यंत कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य टिकून राहावे, पिकांना संरक्षण मिळावे म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत  आतापावेतो जिल्ह्यातील २७ हजार ६६७ शेतकर्यांनी पीक विमा भरला. मात्र पीक विमा भरूनही बहुतांशवेळी नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले जाते.  यात शेतकर्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. यंदा खरीप हंगामात अतिपाऊस आणि विविध रोगांच्या आक्रमणामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीनचे पीक पिवळे पडले तर कपाशीचीही बोंडे सडली. ७२ तासांत नुकसान झालेल्या ३७३ शेतकर्यांनी कृषी ऑनलाईन तक्रारी नोंदविल्या.  

पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यातखरीप हंगामात नुकसान झालेल्या १ लाख १५ हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे पंचनामे पूर्ण  झाले आहेत. कापूस पिकांचे पंचनामे सुरू आहेत. महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने संयुक्तरीत्या पंचनामे केले जात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावरच नुकसानीचे क्षेत्र कळेल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे  यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीबांधवांना पीक नुकसानीपोटी मिळणार्या आर्थिक मदतीकरिता दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

१,१५००० हेक्टरवरील पिकांचे झालेत पंचनामेखरीप हंगामात अतिपाऊस, विविध रोगांच्या आक्रमणामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे अनेकांना सोयाबीनचा एकरी एक  ते दोन पोती उतारा आला. तर कपाशी पिकाचीही अशीच अवस्था झाली. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरीत्या पंचनामे केले. १ लाख १५ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून  कपाशीचे पंचनामे सुरू आहेत.

पिकांना संरक्षण मिळावे म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जाते. जिलह्यातील २७ हजार ६६७ शेतकर्यांनी पिकांचा विमा उतरविला असून ४ कोटी ९२ लाख ६९ हजार नुकसान भरपाई देण्यात आली आहे. पीक विमा उतरवूनही लाभ मिळाला नसल्यास शेतकर्यांनी तक्रार करावी. उपाययाेजना केल्या जाईल.          -विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती