शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वादळी पावसाची नुकसान भरपाई द्या

By admin | Updated: February 25, 2015 02:06 IST

वादळी पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचा अद्यापही आढावा घेण्यात आला नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही़ वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ...

रोहणा : वादळी पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचा अद्यापही आढावा घेण्यात आला नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही़ वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे़ परिसरात नुकसानीचे सर्वेक्षण करून प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़जिल्ह्यात १० फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसामुळे रब्बीतील गहू, हरबरा, ज्वारी पिकांचे नुकसान झाले़ शिवाय आंबा बहर, संत्र्यांचा मृग बहर यांचेही मोठे नुकसान झाले. वेचणीला आलेला कापूसही ओला झाला. यासह शेतात कापणी करून ठेवलेल्या तुरीच्या गंज्या ओल्या झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. तुरीची मळणी केल्यानंतरही शेतात पडून असलेले तुरीचे कुटार ओले होऊन सडण्याची भीती आहे. यात शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले. या पिकांची पाहणी करून महसूल व कृषी विभागाने मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावयास हवा होता; पण नुकसान झालेच नसल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिली़ यामुळे नुकसानीची मदत मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षी खरीपाच्या पेरणीपासून नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत पिके जगविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली़ नैसर्गिक आपत्तीची ही मालिका रबी हंगामातही पिच्छा पुरवित आहे. यंदाचे साल नैसर्गिक आपत्तीचे ठरल्याने शेतकऱ्यांचीही गोची झाली आहे़ संबंधित विभागांनी याकडे लक्ष देत वादळी पावसाची मदत मिळवून देण्याची मागणी होत आहे़(वार्ताहर)