शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाची नुकसान भरपाई द्या

By admin | Updated: February 25, 2015 02:06 IST

वादळी पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचा अद्यापही आढावा घेण्यात आला नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही़ वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ...

रोहणा : वादळी पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचा अद्यापही आढावा घेण्यात आला नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही़ वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे़ परिसरात नुकसानीचे सर्वेक्षण करून प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़जिल्ह्यात १० फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसामुळे रब्बीतील गहू, हरबरा, ज्वारी पिकांचे नुकसान झाले़ शिवाय आंबा बहर, संत्र्यांचा मृग बहर यांचेही मोठे नुकसान झाले. वेचणीला आलेला कापूसही ओला झाला. यासह शेतात कापणी करून ठेवलेल्या तुरीच्या गंज्या ओल्या झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. तुरीची मळणी केल्यानंतरही शेतात पडून असलेले तुरीचे कुटार ओले होऊन सडण्याची भीती आहे. यात शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले. या पिकांची पाहणी करून महसूल व कृषी विभागाने मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावयास हवा होता; पण नुकसान झालेच नसल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिली़ यामुळे नुकसानीची मदत मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षी खरीपाच्या पेरणीपासून नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत पिके जगविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली़ नैसर्गिक आपत्तीची ही मालिका रबी हंगामातही पिच्छा पुरवित आहे. यंदाचे साल नैसर्गिक आपत्तीचे ठरल्याने शेतकऱ्यांचीही गोची झाली आहे़ संबंधित विभागांनी याकडे लक्ष देत वादळी पावसाची मदत मिळवून देण्याची मागणी होत आहे़(वार्ताहर)