शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

पारंपरिक यात्रा व मेळाव्यासाठी भराडी समाज झाला गोळा

By admin | Updated: May 1, 2017 00:31 IST

मागील दहा दशकांपासून येथे दरवर्षी भराडी समाजाचे (किंगरी वाजविणारे) लोक येतात.

नाथजोगी समाज म्हणून ओळख : साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने विकासापासून दूर समुद्रपूर : मागील दहा दशकांपासून येथे दरवर्षी भराडी समाजाचे (किंगरी वाजविणारे) लोक येतात. हा समाज महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे विखुरला आहे. या समाजाचे पुरूष, महिला, मुले, मुली अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एकत्र येतात. यंदाही या भराडी समाजाच्या लोकांचे धपकी परिसरात आगमन झाले आहे. परंपरेनुसार यांची यात्रा व मेळावा येथे भरणार आहे. या यात्रेच्या कालावधीतच उपवर मुली व मुलांचे लग्न जुळविले जाऊन तेथेच विवाह पार पडतात. या निमित्ताने सर्व समाजातील घटकाच्या भेटीगाठी घेऊन माहिती घेतली जाते. या समाजाचे नेतृत्व सुंदरलाल व भक्तराज हे वर्धा जिल्ह्यातील धपकी येथे राहणारे करतात. ते तेथील माजी सरपंच होते. ही मंडळी विदर्भ, महाराष्ट्र व इतर प्रांतातून एकत्र येतात. यापूर्वी वाहनांची सोय नसल्याने सायकल, घोडे व इतर साधनांनी १५ दिवसांपूर्वी कोंबड्या, बकऱ्या व वस्तीला राहता येईल, असे बिराड सोबत आणत होते. परंपरेनुसार वस्तीचे ठिकाण गावाच्या दक्षिणेला राहत असून ते आपापल्या झोपड्या (तंबू) करून राहत होते. विखूरलेल्या व पोटासाठी भटकणाऱ्या या समाजाची नाथजोगी समाज अशी ओळख आहे. मुख्य प्रवाहापासून दूर झाल्याने परिस्थिती हलाखीची असून साक्षरतेचे प्रमाण अगदी नगण्य आहे. परिणामी, अंधश्रद्धा व रूढी परंपरेच्या विळख्यात सापडला आहे. घोडे, मेंढ्या, बकऱ्या पाळणे, गोणे शिवणे, किंगरी नावाचे वाद्य वाजविणे, घरोघरी जाऊन मिळेल त्यावर गुजराण करणे हेच यांचे कार्य आहे. हा समाज एका ठिकाणी स्थानिक नसल्याने कमालीचा दारिद्र्यात आहे. तेवढीच कमालीची उपजत संगीत कला अवगत असताना उपयोग नव्हता. काळानुसार धपकी सारख्या ठिकाणी काही प्रमाणात स्थाईक झाले. हा समाज गुरूला आपले दैवत मानतो. त्यांच्या ठिकाणी दैवी शक्ती असल्याचा त्यांचा समज असतो. त्यांचे दोन गुरू असून ते सख्खे भाऊच आहेत. एकाचे नाव बाळाजी शिंदे तर दुसरा पुजारी महाराज. काही वर्षांपूर्वी हे दोघे भाऊ समुद्रपूरला आले असता वयाने मोठे पुजारी महाराजांचा मृत्यू झाला. नितांत श्रद्धेपोटी त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले. मृत्यू अमावस्येच्या दिवशी झाल्याने या दिवसावर ते एकत्र येतात. सोबत आणलेले कोंबडे, बकरे घेऊन गावाच्या पूर्वेकडे एका टोकावर असलेल्या गुरूच्या समाधीकडे लाल रंगाचे झेंडे घेऊन वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. गुरूची पूजा करून नैवद्य ठेवला जातो. यानंतर एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला जातो. यानंतर ठिक-ठिकाणावरून आलेली ही मंडळी परतीच्या प्रवासाला निघतात. पुढील वर्षी याच दिवशी याच ठिकाणावर पुन्हा यात्रा आणि मेळावा घेत विधिवत पूजन केले जाते.(तालुका प्रतिनिधी)