शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

थंड पाणी जार व्यावसायिकांच्या आठ प्लांटला ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 05:00 IST

या व्यवसायांवर अनेकांचे भरणपोषण असल्याने त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित दोन्ही विभागाचा नाहरकत परवाना काढण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा परवाना मिळत नसल्याची तक्रार या व्यावसायिकांची आहे. बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचा आरोप जार व्यावसायिकांनी केला आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या आग्रहावरून या व्यावसायिकांनी कोरोना संक्रमण काळात घरोघरी जावून पाणी पुरवठा केला. 

ठळक मुद्देन.प.ची कारवाई : भूजल प्राधिकरण व अन्न प्रशासनाचा परवानाच नाही

 लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : विनापरवाना थंड पाणी जार पुरवित असल्याचा ठपका ठेवनू देवळी नगर पालिकेने येथील आठ व्यावसायिकांचे प्लांट सील केले आहे. भूजल प्राधिकरण व अन्न व औषध प्रशासनाच्या निर्देशानुसार संबंधित प्लांट बंद करण्यात आले. घरोघरी थंड पाणी पुरविण्याची व्यवस्था अचानक बंद झाल्यामुळे नागरी वस्तीतील व्यावसायिक तसेच औद्योगिक परिसरातील कारखान्यात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांची गैरसोय झाली आहे.थंड पाणी जारचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. त्यांच्याकडे व्यवसायाकरिता भूजल प्राधिकरण तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र असने बंधनकारक आहे. त्यामुळे नगरपालिकेने याबाबत तपासणी करुन संबंधित विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र नसल्याने आठ प्लांट बंद केले. यामध्ये दीपक घोडे, राम अंबुरे, अमोल फटींग, सलीम कुरेशी, सुभाष वालदे, विलास वानखेडे, गुणवंत वरके व दत्ता गाडेकर आदी व्यावसायिकांचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सर्व व्यावसायिकांवर बेकारीची कुºहाड ओढावली आहे. अनेकांनी पाच लाखाच्या स्वखर्चातून तसेच बँकाकडून कर्ज घेवून हा व्यवसाय उभारला आहे. अ‍ॅक्वा गाड्यांची खरेदी करून व्यवसायाला गती दिली आहे. या व्यवसायांवर अनेकांचे भरणपोषण असल्याने त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित दोन्ही विभागाचा नाहरकत परवाना काढण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा परवाना मिळत नसल्याची तक्रार या व्यावसायिकांची आहे. बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचा आरोप जार व्यावसायिकांनी केला आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या आग्रहावरून या व्यावसायिकांनी कोरोना संक्रमण काळात घरोघरी जावून पाणी पुरवठा केला. त्यामुळे शासनाने व्यवसाय बंद करण्याचे दिलेले निर्देश अन्यायकारी व सुशिक्षित बेरोजगाराची रोजीरोटी काढणारे ठरले आहे. भूजन प्राधिकरण तसेच अन्न व औषध प्रशासनाचा नाहरकत परवाना देवून हा व्यवसाय पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी