शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

स्वच्छ अभियानाची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 22:34 IST

स्वच्छ भारत अभियान योजनेच्या प्रचार व प्रसाराकरीता नगर परिषदेला प्राप्त झालेल्या निधीची खोटी बिले काढून केलेल्या भ्रष्टाचाराची प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळ जगताप यांनी नागरिकांना प्रत्यक्ष ठिकाणावर नेऊन पोलखोल केली.

ठळक मुद्देलाखोची बिले काढली : प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन केली कामाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : स्वच्छ भारत अभियान योजनेच्या प्रचार व प्रसाराकरीता नगर परिषदेला प्राप्त झालेल्या निधीची खोटी बिले काढून केलेल्या भ्रष्टाचाराची प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळ जगताप यांनी नागरिकांना प्रत्यक्ष ठिकाणावर नेऊन पोलखोल केली. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेला भाजप पदाधिकाऱ्यांनीच उधळी लावल्यामुळे संताप व्यक्त केल्या जात आहे. यात सहभागी असलेल्या सर्वांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.भारतीय जनता पक्षाच्या शत प्रतिशत ताब्यात असलेल्या येथील नगर परिषदेला स्वच्छ भारत योजनेअंतर्गत लाखो रूपये प्राप्त झाले. या योजनेच्या प्रचाराकरिता नगर परिषदेने शहरातील महत्वाच्या ठिकाणावरील भिंतीवर रंगरंगोटी करून लिहिण्याचा कंत्राट नगर परिषदेमध्ये सतत वावरत असलेल्या अतुल तंबाखे यांना दिले.शहरातील टाऊन हॉलच्या भिंतीवर ७ शब्द लिहायचे ७ हजार रूपये, गांधी विद्यालयाच्या भिंतीवर ६ शब्द लिहायच ३ हजार रूपये, वन विभागाच्या भिंतीवर ६ शब्द लिहायचे ६ हजार ६५० रूपये, तहसील निवास स्थानाच्या भिंतीवर ६ शब्द लिहायचे ५ हजार २५० रूपये, उपविभागीय अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षा भिंतीवर ६ शब्द लिहायचे ३ हजार ४०० रूपये, कदम पेट्रोल पंपच्या भिंतीवर ६ शब्द लिहायचे ५ हजार २०० रूपये, बस आगाराच्या सुरक्षा भिंतीवर १२ शब्द लिहायचे ८ हजार ८०० रूपये, नवीन मटन मार्केटच्या सुरक्षा भिंतीवर ६ शब्द लिहायचे ८ हजार ७५० रूपये, तलाव रोड बर्फ कारखाण्यावर ६ शब्द लिहायचे ४ हजार २०० रूपये, आयटीआय कॉलेजच्या भिंतीवर ८ शब्द लिहायचे ६ हजार ८०० रूपये, ग्रामीण रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीवर ६ शब्द लिहायचे ३ हजार ७५० रूपयाचे, बसस्थानकाच्या स्वच्छता गृहाची रंगरंगोटी व १२ शब्द लिहायचे ४७ हजार ७०० रूपये, शिवाजी चौकातील पुतळ्या खाली रंगरंगोटी व शब्द लिहायचे ३३ हजार ७५० रूपये, अटल बिहारी उधानातील दर्शनीय भिंतीवर रंगरंगोटी करून ८ शब्द लिहायचे ३५ हजार १०० रूपये, स्वामी समर्थ उधानाच्या भिंतीवर एकही शब्द लिहिला नाही खर्च २ हजार रूपये, हमाल पुºयातील शासकीय गोदामावर एकही शब्द लिहीला नाही ३ हजार ५०० रूपये, शिवाजी शाळेच्या भिंतीवर एकही शब्द लिहला नाही बील २ हजार रूपयाचे तर काढलेच याशिवाय कहर म्हणजे आर्वी शहरात अस्तीत्वातच नसलेल्या राधा स्वामी उधानाच्या नावाने ५१ हजार १२० रूपयाचे बील काढण्यात आले आहे.२ लक्ष ४९ हजार २८० रूपयाचे हे बील काढताना कामाचे मोजमाप रजिस्टर लिहिल्या गेले नाही. मोजमाप करून अहवाल सुध्दा सादर केल्या गेला नाही. अंतर्गत लेखापरिक्षण झाले नाही. फक्त लेखाप्रमुखाने पडताळणी केली आणि मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी बील मंजूर केल्याची माहिती बाळ जगताप यांनी शहरातील नागरिकांना प्रत्यक्ष मजकूर लिहिलेल्या ठिकाणावर नेवून दिली. यात तत्थ आढळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.यावेळी सुधीर जाचक, अरसलान खान, सैय्यद जुनेद, विक्रम भगत, संजय कुरील, धीरज गिरडे, संतोष, गौरकार, मुकेश मस्के, मुन्ना दमाये, मनोहर उईके, संदीप राठोड, जुम्मा शाहा, बाल्या राऊत आदी हजर होते.अडचणीत वाढयुवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने विधानसभा क्षेत्र प्रमुख दिलीप पोटफोडे यांनी मंगळवारी पालिकेच्या घरकुल यादीत नगरसेवकांच्या नातलगांचा समावेश असल्याचा आरोप केला. व यादीच त्यांनी सादर केली. पालिकेत पुंगी पेटारा गुंडाळो आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBJPभाजपा