शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शास्त्रीय दृष्टिकोनातून सौंदर्यीकरण व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:22 IST

मी आश्रमची वकिली करणार नाही; पण पवनार येथील धाम नदीला खडकाचे सौंदर्य लाभले आहे. ते इतरत्र दिसत नाही.

ठळक मुद्देराजेंद्र सिंग : वादावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत भवनात बैठक

ऑनलाईन लोकमतपवनार : मी आश्रमची वकिली करणार नाही; पण पवनार येथील धाम नदीला खडकाचे सौंदर्य लाभले आहे. ते इतरत्र दिसत नाही. नदीचे पाणी आटले असले तरी जीव-जंतु खडकाखालील ओलाव्यामुळे जिवंत राहतात. त्यांच्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. मुरूम टाकून नदी बुजविण्याचा प्रयत्न केला तर तिचा नाला होईल. यामुळे तांत्रिक व शास्त्रीय दृष्टिकोनातून सौंदर्यीकरण व्हावे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा निर्माण करू नये, असे मत प्रसिद्ध जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.सेवाग्राम-पवनार विकास आराखड्यांतर्गत धामतिरावर आश्रम परिसराकडून २१ कोटींच्या कामाला प्रारंभ झाला. यात दोन हजार ट्रक मुरूम टाकून नदी बुजविली जात आहे. गुजरातच्या साबरमती तिरावर झालेल्या सौंदर्यीकरणाच्या धर्तीवर येथे सौंदर्यीकरण होत आहे. यासाठी नदी बुजविणे व खडक फोडण्यास आश्रमवासी विरोध करीत आहे. यामुळे आश्रमवासी व ग्रामस्थ यांच्यात तात्विक वाद निर्माण झाला आहे. ग्रामस्थांना विकास हवा आहे; पण कामाच्या पद्धतीला आश्रमवासीयांचा विरोध आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ग्रा.पं. भवन येथे बैठक घेण्यात आली. यवेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.सरपंच गांडोळे यांनी या सौंदर्यीकरणामुळे येथे येणाºया पर्यटकांची संख्या वाढेल. स्थानिकांना रोजगारही मिळेल. मूर्ती विसर्जन कुंड, नदीला मिळणाºया नाल्यावर बसणारे बायो फिल्टर यामुळे नदीचे पाणी दूषित होणार नाही. जलशुद्धीकरणावर होणारा अवास्तव खर्चही कमी होईल. गांधी-विनोबा विचारसरणीय धूरिणींचा यावर आक्षेप असेल तर चर्चेतून काही बदल करून हा प्रश्न मार्गी लावता येईल. प्रकल्प होऊच नये, ही अंतिम भूमिका असेल तर तोडगा निघणार नाही, असे सांगितले. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता क्षीरसागर यांनी डॉ. राजेंद्र सिंग व सहकाºयांना प्रकल्प समजावून सांगताना हा प्रकल्प पर्यावरणपूरक राहील याची खात्री दिली. प्रकल्प व्यवस्थापक हासिम खान यांनी आपल्या सूचना, बदलांचा विचार करून तो प्रकल्पात कसा समाविष्ट करता येईल, हे ठरविले जाईल, असे सांगितले. चर्चेत सहभागी करुणा बहन यांनी सृष्टीच्या रचनेला छेद देऊ नका. यामुळे ºहास होईल, असे सांगितले.