शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या तोंडावर शहर कचऱ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

पावसामुळे हा कचरा कुजून प्रचंड दुगरंधी सुटलेली आहे. परिणामी, येथून नागरिकांना नाकावर रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. केसरीमल कन्या शाळा परिसरात भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडका भाजीपाला आणि फळे टाकली जात असल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या सडक्या फळ-भाजीपाल्यावर जनावरे उच्छाद घालत आहे. मात्र, नगरपालिकेकडून नियमित कचऱ्याची उचल होत असल्याचे दिसून येत नाही.

ठळक मुद्देनगरपालिकेची डोळेझाक : विविध भागात अस्वच्छतेने गाठला कळस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळा तोंडावर असताना शहरातील विविध भाग आणि मार्गालगत अस्वच्छतेने कळस गाठला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव असतानाच साथीचे आजार बळावण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. याकडे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचा कानाडोळा आहे.पावसाळ्याचे नियोजन म्हणून नगरपालिकेच्या वतीने विविध भागातील नाल्यांची स्वच्छता केली. मात्र, लहान नाल्यांची स्वच्छता आणि विविध भागात असलेले कचऱ्याचे ढीग उचलण्याचा पालिका प्रशासनाला विसर पडला असल्याचे चित्र आहे. शहरातील महादेवपुरा, इतवारा बाजार, केसरीमल कन्या शाळा परिसर, न्यू हायस्कूल परिसर, सुदामपुरी, गांधीनगर, गजानननगर, आर्वी नाका, हवालदारपुरा, मालगुजारीपुरा, गोंड प्लॉट, भामटीपुरा, कृष्णनगर, रामनगर, आदिवासी कॉलनी आदी ठिकाणी कित्येक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पडून आहेत. न्यू इंग्लिश हायस्कूल परिसरात पालिका संचालित लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेच्या भिंतीलगतच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.तसेच या मार्गावरील निरूपयोगी विहिरीला घाणीने विळखा घातलेला आहे. पावसामुळे हा कचरा कुजून प्रचंड दुगरंधी सुटलेली आहे. परिणामी, येथून नागरिकांना नाकावर रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. केसरीमल कन्या शाळा परिसरात भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडका भाजीपाला आणि फळे टाकली जात असल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या सडक्या फळ-भाजीपाल्यावर जनावरे उच्छाद घालत आहे. मात्र, नगरपालिकेकडून नियमित कचऱ्याची उचल होत असल्याचे दिसून येत नाही. कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असतानाच कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित नगरसेवक, नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट आहे. शहरातील विविध भागात नगरपालिकेने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.फळ-भाजी विक्रेत्यांचा बेशिस्तपणाशहरातून जाणाऱ्या नागपूर मार्गालगत केसरीमल कन्या शाळेत अनेक भाजी-फळ विक्रेत्यांनी अस्थायी स्वरूपात रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली आहेत. हे व्यावसायिक दुकान बंद करतेवेळी सडकी भाजी आणि फळे केसरीमल कन्या शाळा परिसरात ठेवलेल्या कंटेनरमध्ये न टाकता रस्त्याच्या कडेला फेकतात. भाजी-फळविक्रेत्यांच्या या बेशिस्तपणामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. नगरपालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस