शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या तोंडावर शहर कचऱ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

पावसामुळे हा कचरा कुजून प्रचंड दुगरंधी सुटलेली आहे. परिणामी, येथून नागरिकांना नाकावर रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. केसरीमल कन्या शाळा परिसरात भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडका भाजीपाला आणि फळे टाकली जात असल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या सडक्या फळ-भाजीपाल्यावर जनावरे उच्छाद घालत आहे. मात्र, नगरपालिकेकडून नियमित कचऱ्याची उचल होत असल्याचे दिसून येत नाही.

ठळक मुद्देनगरपालिकेची डोळेझाक : विविध भागात अस्वच्छतेने गाठला कळस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळा तोंडावर असताना शहरातील विविध भाग आणि मार्गालगत अस्वच्छतेने कळस गाठला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव असतानाच साथीचे आजार बळावण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. याकडे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचा कानाडोळा आहे.पावसाळ्याचे नियोजन म्हणून नगरपालिकेच्या वतीने विविध भागातील नाल्यांची स्वच्छता केली. मात्र, लहान नाल्यांची स्वच्छता आणि विविध भागात असलेले कचऱ्याचे ढीग उचलण्याचा पालिका प्रशासनाला विसर पडला असल्याचे चित्र आहे. शहरातील महादेवपुरा, इतवारा बाजार, केसरीमल कन्या शाळा परिसर, न्यू हायस्कूल परिसर, सुदामपुरी, गांधीनगर, गजानननगर, आर्वी नाका, हवालदारपुरा, मालगुजारीपुरा, गोंड प्लॉट, भामटीपुरा, कृष्णनगर, रामनगर, आदिवासी कॉलनी आदी ठिकाणी कित्येक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पडून आहेत. न्यू इंग्लिश हायस्कूल परिसरात पालिका संचालित लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेच्या भिंतीलगतच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.तसेच या मार्गावरील निरूपयोगी विहिरीला घाणीने विळखा घातलेला आहे. पावसामुळे हा कचरा कुजून प्रचंड दुगरंधी सुटलेली आहे. परिणामी, येथून नागरिकांना नाकावर रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. केसरीमल कन्या शाळा परिसरात भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडका भाजीपाला आणि फळे टाकली जात असल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या सडक्या फळ-भाजीपाल्यावर जनावरे उच्छाद घालत आहे. मात्र, नगरपालिकेकडून नियमित कचऱ्याची उचल होत असल्याचे दिसून येत नाही. कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असतानाच कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित नगरसेवक, नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट आहे. शहरातील विविध भागात नगरपालिकेने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.फळ-भाजी विक्रेत्यांचा बेशिस्तपणाशहरातून जाणाऱ्या नागपूर मार्गालगत केसरीमल कन्या शाळेत अनेक भाजी-फळ विक्रेत्यांनी अस्थायी स्वरूपात रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली आहेत. हे व्यावसायिक दुकान बंद करतेवेळी सडकी भाजी आणि फळे केसरीमल कन्या शाळा परिसरात ठेवलेल्या कंटेनरमध्ये न टाकता रस्त्याच्या कडेला फेकतात. भाजी-फळविक्रेत्यांच्या या बेशिस्तपणामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. नगरपालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस