शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पावसाळ्याच्या तोंडावर शहर कचऱ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

पावसामुळे हा कचरा कुजून प्रचंड दुगरंधी सुटलेली आहे. परिणामी, येथून नागरिकांना नाकावर रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. केसरीमल कन्या शाळा परिसरात भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडका भाजीपाला आणि फळे टाकली जात असल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या सडक्या फळ-भाजीपाल्यावर जनावरे उच्छाद घालत आहे. मात्र, नगरपालिकेकडून नियमित कचऱ्याची उचल होत असल्याचे दिसून येत नाही.

ठळक मुद्देनगरपालिकेची डोळेझाक : विविध भागात अस्वच्छतेने गाठला कळस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळा तोंडावर असताना शहरातील विविध भाग आणि मार्गालगत अस्वच्छतेने कळस गाठला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव असतानाच साथीचे आजार बळावण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. याकडे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचा कानाडोळा आहे.पावसाळ्याचे नियोजन म्हणून नगरपालिकेच्या वतीने विविध भागातील नाल्यांची स्वच्छता केली. मात्र, लहान नाल्यांची स्वच्छता आणि विविध भागात असलेले कचऱ्याचे ढीग उचलण्याचा पालिका प्रशासनाला विसर पडला असल्याचे चित्र आहे. शहरातील महादेवपुरा, इतवारा बाजार, केसरीमल कन्या शाळा परिसर, न्यू हायस्कूल परिसर, सुदामपुरी, गांधीनगर, गजानननगर, आर्वी नाका, हवालदारपुरा, मालगुजारीपुरा, गोंड प्लॉट, भामटीपुरा, कृष्णनगर, रामनगर, आदिवासी कॉलनी आदी ठिकाणी कित्येक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पडून आहेत. न्यू इंग्लिश हायस्कूल परिसरात पालिका संचालित लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेच्या भिंतीलगतच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.तसेच या मार्गावरील निरूपयोगी विहिरीला घाणीने विळखा घातलेला आहे. पावसामुळे हा कचरा कुजून प्रचंड दुगरंधी सुटलेली आहे. परिणामी, येथून नागरिकांना नाकावर रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. केसरीमल कन्या शाळा परिसरात भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडका भाजीपाला आणि फळे टाकली जात असल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या सडक्या फळ-भाजीपाल्यावर जनावरे उच्छाद घालत आहे. मात्र, नगरपालिकेकडून नियमित कचऱ्याची उचल होत असल्याचे दिसून येत नाही. कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असतानाच कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित नगरसेवक, नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट आहे. शहरातील विविध भागात नगरपालिकेने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.फळ-भाजी विक्रेत्यांचा बेशिस्तपणाशहरातून जाणाऱ्या नागपूर मार्गालगत केसरीमल कन्या शाळेत अनेक भाजी-फळ विक्रेत्यांनी अस्थायी स्वरूपात रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली आहेत. हे व्यावसायिक दुकान बंद करतेवेळी सडकी भाजी आणि फळे केसरीमल कन्या शाळा परिसरात ठेवलेल्या कंटेनरमध्ये न टाकता रस्त्याच्या कडेला फेकतात. भाजी-फळविक्रेत्यांच्या या बेशिस्तपणामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. नगरपालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस