शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अटीची पूर्तता करण्याकडे नागरिकांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 22:14 IST

भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करण्यासाठी प्रत्येक घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या आवारात वॉटर हार्वेस्टिंगचा वापर होणे गरजेचे आहे. परंतु, प्रभावी जनजागृतीअभावी हा विषय थंडबस्त्यात आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय जनजागृती मंचची मिळाली साथ : महत्त्व ओळखून पालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग केले क्रमप्राप्त

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करण्यासाठी प्रत्येक घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या आवारात वॉटर हार्वेस्टिंगचा वापर होणे गरजेचे आहे. परंतु, प्रभावी जनजागृतीअभावी हा विषय थंडबस्त्यात आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षीपासून वर्धा नगरपलिकेने बांधकाम परवानगी घेताना वॉटर हार्वेस्टिंग क्रमप्राप्त केले आहे.शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात जलसंकटाला सामोरे जावे लागल्याने यंदा वर्धा शहरातील अनेक नागरिकांनी वॉटर हार्वेस्टिंग घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठान परिसरात केले आहे. परंतु, त्याची नोंद नगरपालिकेने घेतली नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज असल्याने त्याबाबत वैद्यकीय जनजागृती मंच व वर्धा न.प.च्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे. यंदा स्वत: नगराध्यक्षांनी या विषयी पुढाकार घेतला होता. त्यामुळे नवीन बांधकाम करणाऱ्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग नकाशात नमूद नसल्यास त्यांना बांधकाम परवानगीच देण्यात आली नाही.ही वर्धा नगरपालिकेची भूमिका असली तरी कागदावर रेन वॉटर हार्वेस्टिंग दाखविणारे प्रत्यक्षात कृती करतात काय, याचीही शहानिशा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी केली पाहिजे, अशी अपेक्षा जल जागृतीसाठी काम करणाºयांना आहे.मालमत्ता करात मिळते २ टक्के सूटघर किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानाचे बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब केल्यास त्या मालमत्ता धारकाला मालमत्ता करात २ टक्के सूट दिली जात आहे. शिवाय प्रभावी जनजागृतीसाठी विविध सामाजिक संघटनांना सोबत घेतले जाईल. तर प्रत्यक्ष कृती न करणाºयांना भोगवटदार प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.- प्रदीप जगताप, मुख्याधिकारी, न.प.वर्धा.अन्यथा जलसंकटाला सामोरे जावे लागेलशहरात भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा होतो. त्या तुलनेत जमिनीत पाणी जिरविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. मागील काही वर्षांत सर्वत्र सिमेंटीकरण झाल्याने जमिनीत नैसर्गिकरीत्या पाणी जिरणेदेखील बंद झाले आहे. याकरिता प्रत्येकाने पावसाचे पाणी बोअरवेल, विहिरींमध्ये सोडून पाणी पुनर्भरण करणे आज काळाची गरज आहे. अन्यथा भविष्यात भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.- डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष, वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा.असे केले जाते जल पुनर्भरणपावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी घेता येते.

टॅग्स :Rainपाऊस