शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अटीची पूर्तता करण्याकडे नागरिकांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 22:14 IST

भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करण्यासाठी प्रत्येक घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या आवारात वॉटर हार्वेस्टिंगचा वापर होणे गरजेचे आहे. परंतु, प्रभावी जनजागृतीअभावी हा विषय थंडबस्त्यात आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय जनजागृती मंचची मिळाली साथ : महत्त्व ओळखून पालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग केले क्रमप्राप्त

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करण्यासाठी प्रत्येक घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या आवारात वॉटर हार्वेस्टिंगचा वापर होणे गरजेचे आहे. परंतु, प्रभावी जनजागृतीअभावी हा विषय थंडबस्त्यात आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षीपासून वर्धा नगरपलिकेने बांधकाम परवानगी घेताना वॉटर हार्वेस्टिंग क्रमप्राप्त केले आहे.शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात जलसंकटाला सामोरे जावे लागल्याने यंदा वर्धा शहरातील अनेक नागरिकांनी वॉटर हार्वेस्टिंग घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठान परिसरात केले आहे. परंतु, त्याची नोंद नगरपालिकेने घेतली नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज असल्याने त्याबाबत वैद्यकीय जनजागृती मंच व वर्धा न.प.च्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे. यंदा स्वत: नगराध्यक्षांनी या विषयी पुढाकार घेतला होता. त्यामुळे नवीन बांधकाम करणाऱ्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग नकाशात नमूद नसल्यास त्यांना बांधकाम परवानगीच देण्यात आली नाही.ही वर्धा नगरपालिकेची भूमिका असली तरी कागदावर रेन वॉटर हार्वेस्टिंग दाखविणारे प्रत्यक्षात कृती करतात काय, याचीही शहानिशा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी केली पाहिजे, अशी अपेक्षा जल जागृतीसाठी काम करणाºयांना आहे.मालमत्ता करात मिळते २ टक्के सूटघर किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानाचे बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब केल्यास त्या मालमत्ता धारकाला मालमत्ता करात २ टक्के सूट दिली जात आहे. शिवाय प्रभावी जनजागृतीसाठी विविध सामाजिक संघटनांना सोबत घेतले जाईल. तर प्रत्यक्ष कृती न करणाºयांना भोगवटदार प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.- प्रदीप जगताप, मुख्याधिकारी, न.प.वर्धा.अन्यथा जलसंकटाला सामोरे जावे लागेलशहरात भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा होतो. त्या तुलनेत जमिनीत पाणी जिरविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. मागील काही वर्षांत सर्वत्र सिमेंटीकरण झाल्याने जमिनीत नैसर्गिकरीत्या पाणी जिरणेदेखील बंद झाले आहे. याकरिता प्रत्येकाने पावसाचे पाणी बोअरवेल, विहिरींमध्ये सोडून पाणी पुनर्भरण करणे आज काळाची गरज आहे. अन्यथा भविष्यात भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.- डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष, वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा.असे केले जाते जल पुनर्भरणपावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी घेता येते.

टॅग्स :Rainपाऊस