शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

वेबसाईटवर माहिती टाकताना नागरिकांनी दक्ष राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:58 PM

सध्या तरूण पीढीला मोबाईलचे वेड लागलेले आहे. मोबाईलच्या वेडामुळे आपली गोपनिय माहिती जाहीर करून स्वत:चे नुकसान ते करीत आहेत.

ठळक मुद्देनिर्मलादेवी एस. : सायबर सुरक्षा जागृती कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या तरूण पीढीला मोबाईलचे वेड लागलेले आहे. मोबाईलच्या वेडामुळे आपली गोपनिय माहिती जाहीर करून स्वत:चे नुकसान ते करीत आहेत. नागरिक म्हणून आपण विविध मोबाईल अ‍ॅप आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना तिचा गैरवापर होणार नाही याची खात्री असेल तरच माहिती द्यावी, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी केले. त्या सायबर सुरक्षा जागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होत्या.पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. पुढे म्हणाल्या, पत्रकारांनी कुणाचीही फसगत होऊ नये म्हणून याबाबत योग्य माहिती घेऊन सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात सदर कार्यशाळा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.केंद्र शासनाने देशातील ४२ अ‍ॅपवर बंदी घातलेली आहे. त्यात ट्रू कॉलरचाही समावेश आहे. ट्रू कॉलर अ‍ॅप डाऊन लोड केल्यास नागरिकांची फसगत होऊन नुकसान होऊ शकते, अशी माहिती याप्रसंगी सायबर विशेषतज्ञ कुलदीप टांकसाळे यांनी दिली.सदर कार्यशाळेत कुलदीप टांकसाळे यांनी सायबर गुन्हे कसे घडतात याची माहिती दिली. एचटीटीपीएस असलेली संकेत स्थळे वैद्य असतात. अनेकदा बनावट संकेत स्थळाद्वारे नागरिकांना फसविले जाते. यासाठी नागरिकांनी संकेत स्थळावर माहिती देताना ते बनावट नाही ना याची खात्री करावी. बँकींगचे व्यवहार करताना आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी कुणालाही सांगू नये. नागरिकांची एटीएम द्वारे बँक खात्याची फसगत झाली असल्यास ४ ते २४ तासाच्या आत सायबर सेलकडे तक्रार दाखल करावी. यासाठी बँक स्टेटमेंट सोबत न्यावे. यामुळे गुन्हेच्या तपासात मदत होत असून गुन्हेगाराचा शोध घेण्यास मदत होते असेही त्यांनी सांगितले.इंटरनेट स्वस्थ आणि सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आपण उत्साहाच्या भरात वैयक्तिक माहिती मोबाईल अ‍ॅप आणि संकेत स्थळाच्या माध्यमातून टाकत असतो. महाजालातील माहिती पूर्णत: सुरक्षित असते असे नाही असे यावेळी टांकसाळे यांनी स्पष्ट केले.सायबर गुन्ह्याचे विविध प्रकार सांगत टांकसाळे यांनी इंटरनेट बँकींग, फिशिंग, हॉकिंग, स्मिशिंग, नोकरी विषयक फसवणूक, वैवाहिक फसवणूक, शैक्षणिक फसवणूक इत्यादी प्रकारची माहिती उपस्थितांना दिली.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी जिल्ह्यात सायबर क्राईमचे ५३ गुन्हे दाखल असून २४ गुन्हे एटीएम बँकींगचे आहेत. यातील १२ गुन्ह्याच्या तपासामध्ये २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधीकडून सामान्य जनतेला सायबर सुरक्षविषयी जागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.मनीषा सावळे यांनी ट्रान्सफारमिंग महाराष्ट्र अंतर्गत पत्रकार आणि प्रसार माध्यमासाठी सायबर जाणीव जागृती उपक्रम महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेशसिंह यांचे संकल्पनेतून राबविण्यात येते आहे.