शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

नागरिकांची इलेक्ट्रिक वाहनांना पसंती पण वाहन मधेच बंद पडले तर दुरुस्त कोण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:32 IST

नागरिकांपुढे अडचणींचा डोंगर कायम : चार वर्षांत ४ हजार १८० ई-वाहनांची खरेदी पण चार्जिंग स्टेशनची सुविधाच नाही !

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बदलत्या वेळेसोबत इंधनालाही पर्याय आल्याने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे पसंतीचे ठरत आहे. मात्र, हेच इलेक्ट्रिक वाहन बंद पडले, तर दुरुस्त कोण करणार? तसेच चार्जिंग कुठे करणार? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

वर्षभरामध्ये जिल्हाभरात ९२२ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. याची उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या लेखी नोंदणीही करण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची संख्या ६६१ इतकी आहे तर चारचाकी वाहनांची संख्या २० इतकी आहे. यात सर्वांत जास्त दुचाकींचा समावेश आहे. दुचाकींमध्ये बिघाड झाल्यास सर्व्हिस सेंटरमध्ये त्याची दुरुस्ती केली जाते. मात्र, इलेक्ट्रिक वाहन दुरुस्त करणाऱ्यांची संख्या नगण्यच आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्येही चुकीचा संदेश जाऊ नये, याचीही काळजी घेणे आवश्यक असून त्याच्या दुरुस्तीची सुविधाही बाजारपेठेत उपलब्ध होण्याची गरज आहे. जिल्ह्यातील इलेक्ट्रिक वाहनांची आकडेवारी लक्षात घेतली असता चारचाकी वाहनाला फारशी मागणी नसल्याचेच दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे जिल्हाभरात कोठेही इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधा नाही. आता काही दिवसांतच एसटीमध्येही इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. यासाठी आर्वी आणि वर्धा आगारात चार्जिंग स्टेशनचे कामही सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात या वाहनांचे मेकॅनिक किती?इलेक्ट्रिक वाहन बंद पडले तर दुरुस्तीला कुणाकडे न्यायचे, असा प्रश्न वाहनचालकासमोर उपस्थित होतो. इलेक्ट्रिक वाहन दुरुस्ती करणारे मेकॅनिक बोटावर मोजण्याइतकेतच आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढत असली तरी दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकची संख्या वाढणेही गरजेचे झाले आहे.

आयटीआयमध्ये कधी शिकवणार काम ?इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढत असताना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या विषयाचा अंतर्भाव करणे अत्यंत गरजेचे आहे. आधीच्या वाहनांचा अभ्यास व्हीसीएमसीमध्ये शिकविला जात होता, हे येथे उल्लेखनीय. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांचा त्यात समावेशच नव्हता. याचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे.

उन्हाळ्यात वाहने पेटण्याच्या समस्या वाढल्याइलेक्ट्रिक वाहनांची आज मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. परंतु, कमी दर्जाची असलेली वाहने अधिक तापमानामुळे पेट घेत असल्याच्या घटनाही घडत आहेत. जिल्ह्याचे उन्हाळ्यात तापमान ४५ च्यावर जाण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत ही वाहने धोकादायक ठरण्याचीही शक्यता वर्तविली जाते.

मेकॅनिकना प्रशिक्षण देण्याची गरजइलेक्ट्रिक वाहन बिघडल्यास एक तरी मेकॅनिक शोधण्याची गरज भासते. सद्यःस्थितीत इलेक्ट्रिक वाहन दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकला प्रशिक्षण देण्याची नितांत गरज निर्माण झाली असून, त्याचा फायदा होईल. या मेकॅनिकना प्रशिक्षण मिळाल्यास कोणत्याही दुकानात याची दुरुस्ती करता येईल. परिणामी वाहनाचाही वापर वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे देखील लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

४ हजार वाहनांची नोंदणी. मात्र, चार्जिंग स्टेशनचा अभावजिल्ह्यात ४ हजार इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत. परंतु, शहरातच काय जिल्हाभरात कोठेही चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसल्याने या चारचाकी चालकांना वाहने घरीच चार्ज करावी लागत आहेत.

"शहरात अनेक इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत. परंतु, आमच्याकडे याच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण नसल्याने, वाहने हाताळत नाही. शोरूम चालकांना याचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली होती. परंतु, आमच्या शोरूममध्ये दुरुस्त होतील, अशी प्रतिक्रिया दिली. चालक वाहनाला धक्का मारत घेऊन जाताना दिसून येतात."- कृणाल बिलवणे, मेकॅनिक

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरwardha-acवर्धा