शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

नागरिकांची इलेक्ट्रिक वाहनांना पसंती पण वाहन मधेच बंद पडले तर दुरुस्त कोण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:32 IST

नागरिकांपुढे अडचणींचा डोंगर कायम : चार वर्षांत ४ हजार १८० ई-वाहनांची खरेदी पण चार्जिंग स्टेशनची सुविधाच नाही !

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बदलत्या वेळेसोबत इंधनालाही पर्याय आल्याने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे पसंतीचे ठरत आहे. मात्र, हेच इलेक्ट्रिक वाहन बंद पडले, तर दुरुस्त कोण करणार? तसेच चार्जिंग कुठे करणार? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

वर्षभरामध्ये जिल्हाभरात ९२२ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. याची उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या लेखी नोंदणीही करण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची संख्या ६६१ इतकी आहे तर चारचाकी वाहनांची संख्या २० इतकी आहे. यात सर्वांत जास्त दुचाकींचा समावेश आहे. दुचाकींमध्ये बिघाड झाल्यास सर्व्हिस सेंटरमध्ये त्याची दुरुस्ती केली जाते. मात्र, इलेक्ट्रिक वाहन दुरुस्त करणाऱ्यांची संख्या नगण्यच आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्येही चुकीचा संदेश जाऊ नये, याचीही काळजी घेणे आवश्यक असून त्याच्या दुरुस्तीची सुविधाही बाजारपेठेत उपलब्ध होण्याची गरज आहे. जिल्ह्यातील इलेक्ट्रिक वाहनांची आकडेवारी लक्षात घेतली असता चारचाकी वाहनाला फारशी मागणी नसल्याचेच दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे जिल्हाभरात कोठेही इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधा नाही. आता काही दिवसांतच एसटीमध्येही इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. यासाठी आर्वी आणि वर्धा आगारात चार्जिंग स्टेशनचे कामही सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात या वाहनांचे मेकॅनिक किती?इलेक्ट्रिक वाहन बंद पडले तर दुरुस्तीला कुणाकडे न्यायचे, असा प्रश्न वाहनचालकासमोर उपस्थित होतो. इलेक्ट्रिक वाहन दुरुस्ती करणारे मेकॅनिक बोटावर मोजण्याइतकेतच आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढत असली तरी दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकची संख्या वाढणेही गरजेचे झाले आहे.

आयटीआयमध्ये कधी शिकवणार काम ?इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढत असताना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या विषयाचा अंतर्भाव करणे अत्यंत गरजेचे आहे. आधीच्या वाहनांचा अभ्यास व्हीसीएमसीमध्ये शिकविला जात होता, हे येथे उल्लेखनीय. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांचा त्यात समावेशच नव्हता. याचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे.

उन्हाळ्यात वाहने पेटण्याच्या समस्या वाढल्याइलेक्ट्रिक वाहनांची आज मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. परंतु, कमी दर्जाची असलेली वाहने अधिक तापमानामुळे पेट घेत असल्याच्या घटनाही घडत आहेत. जिल्ह्याचे उन्हाळ्यात तापमान ४५ च्यावर जाण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत ही वाहने धोकादायक ठरण्याचीही शक्यता वर्तविली जाते.

मेकॅनिकना प्रशिक्षण देण्याची गरजइलेक्ट्रिक वाहन बिघडल्यास एक तरी मेकॅनिक शोधण्याची गरज भासते. सद्यःस्थितीत इलेक्ट्रिक वाहन दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकला प्रशिक्षण देण्याची नितांत गरज निर्माण झाली असून, त्याचा फायदा होईल. या मेकॅनिकना प्रशिक्षण मिळाल्यास कोणत्याही दुकानात याची दुरुस्ती करता येईल. परिणामी वाहनाचाही वापर वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे देखील लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

४ हजार वाहनांची नोंदणी. मात्र, चार्जिंग स्टेशनचा अभावजिल्ह्यात ४ हजार इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत. परंतु, शहरातच काय जिल्हाभरात कोठेही चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसल्याने या चारचाकी चालकांना वाहने घरीच चार्ज करावी लागत आहेत.

"शहरात अनेक इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत. परंतु, आमच्याकडे याच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण नसल्याने, वाहने हाताळत नाही. शोरूम चालकांना याचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली होती. परंतु, आमच्या शोरूममध्ये दुरुस्त होतील, अशी प्रतिक्रिया दिली. चालक वाहनाला धक्का मारत घेऊन जाताना दिसून येतात."- कृणाल बिलवणे, मेकॅनिक

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरwardha-acवर्धा