शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

दोन वर्षात रक्कम दुप्पट : वर्ध्यात ठगबाजांचा फंडा, अनेकांना लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 17:34 IST

कंपनीत रक्कम गुंतविल्यास दोन वर्षात रक्कम दुपटीने मिळणार असे सांगून सुमारे शंभरावर नागरिकांसह बेरोजगारांना लाखो रुपयांनी गंडविल्याची घटना वर्धेत उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देअज्ञेय ॲग्रो कंपनीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : कंपनीत रक्कम गुंतविल्यास दोन वर्षांत रक्कम दुप्पट करून देणार असल्याचे आमिष देत सुमारे शंभरावर नागरिकांसह बेरोजगारांना तब्बल ३८ लाख ६२ हजार ३३९ रुपयांनी गंडवून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी कंपनीसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, जून २०१८ मध्ये दुष्यंत प्रमाेद चाफले याच्या ओळखीच्या आशिष वानखेडे रा.समतानगर, वैभव काळे यांच्याकडून अज्ञेय कंपनीने चांगली योजना आणली असून या कंपनीत रक्कम गुंतविल्यास दोन वर्षात रक्कम दुपटीने मिळणार असल्याचे सांगितले. या कंपनीचे कार्यालय पोस्ट ऑफीसकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रसाद चंदावार यांच्या घरी असल्याने युवकांनी कार्यालयात जात अधिकची माहिती घेतली. शहर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञेय अग्रो ॲण्ड इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. नाशिक या कंपनीसह तब्बल ९ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जुलै २०१८ मध्ये पुन्हा प्रशांत धोटे, महेंद्र डेकाटे, रोशन क्षीरसागर, नितीन देशमुख, अश्विन तवाडे, शुभम मुंजेवार, आशिष वानखेडे, वैभव काळे यांच्यासह काही युवक नाशिक येथे कंपनीचा प्लांट पाहण्यास गेले होते. कंपनीचे सीईओ रमेशकुमार जोनवाल यांनी कंपनीचा प्लान समजावून सांगितला. ३५०० आणि ६००० रुपये अशा दोन पॅकेजमध्ये हा प्लान असून कुठलाही एक प्लान घेतल्यास तुम्हाला कंपनीत जॉयनिंग मिळेल, असे त्यांनी सांगितले. रक्कम गुंतविल्यास तुम्हाला अनेक फायदे होतील, असे सांगण्यात आले.

ऑगस्टमध्ये वर्ध्यातील विद्यादीप सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. तब्बल १२०० च्यावर नागरिक व गुंतवणूकदार उपस्थित होते. प्रत्येक मेंबरकडून १००० रुपये मेंबरशिप म्हणून घेण्यात आले व १ लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करण्यात आले. मात्र, काही दिवसांनी कुठलाही परतावा मिळाला नसल्याने नागरिकांनी कंपनीच्या सीईओला विचारणा केली असता परतावा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

आशीष झाडे याने २०१८ मध्ये लाखो रुपये भरले आहेत. तसेच वैभव काळे यानेदेखील ४ लाख रुपये असे एकूण १४ लाख ९२ हजार रुपये कंपनीत गुंतविलेले आहे. आशिषच्या पत्नीच्या बँक खात्यात १ लाख २१ हजार रुपये व आशिषच्या बँक खात्यात ४ लाख २० हजार रुपयांचा परतावा झाला असून ९ लाख ५० हजार ७६० रुपयांची रक्कम अजूनही परत केली नसून कंपनीने गंडविले आहे. अनेकांचे असे एकूण ३८ लाख ६३ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी रमेशकुमार जोनवाल, अनिता जोनवाल, रामसिंग जोनवाल, रमेशकुमार जोनवाल, रवींद्र पंडित, उशा मोहिते यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी