शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

तपत्या उन्हात जिल्हाकचेरीत घोटभर थंड पाणी नागरिकांना मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

कार्यालयीन दिवसांत भोजन अवकाशाचा वेळ वगळता सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयालयाचे कामकाज चालते. जिल्हाधिकारी कार्यालयातील थंड पाण्याच्या कॅन बंद करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपआपल्या घरून बाटलीत पिण्याचे थंड पाणी आणतात. पण, जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे अल्पावधीतच हे थंड पाणी गरम होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच उष्माघात टाळण्यासाठी वारंवार भरपूर पाणी पिण्यासह काही मार्गदर्शक सूचना  जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना  देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे काय? याबाबत ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केली असता जीवाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या दिवसांतच जिल्हा कचेरीत घुटभर थंड पाणी नागरिकांना मिळत नसल्याचे दिसून आले.

कर्मचारी घरून शिशीत आणतात पिण्याचे पाणी-    कार्यालयीन दिवसांत भोजन अवकाशाचा वेळ वगळता सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयालयाचे कामकाज चालते. जिल्हाधिकारी कार्यालयातील थंड पाण्याच्या कॅन बंद करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपआपल्या घरून बाटलीत पिण्याचे थंड पाणी आणतात. पण, जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे अल्पावधीतच हे थंड पाणी गरम होते. परिणामी, नाइलाजाने या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत घशाला कोरड पडल्यावर गरम पाणीच प्यावे लागत आहे.

स्वच्छतागृहाशेजारील वॉटर कूलर ठरतोय शोभेची वस्तू -   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाजूला एक वॉटर कूलर आहे. या वॉटर कूलरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर असलेल्या टाकीतील पाणी येते. हे वॉटर कूलर सुरू असले तरी पाणी थंड होत नाही. इतकेच नव्हेतर, हे वॉटर कूलर महिला आणि पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाच्या शेजारीच असल्याने अनेक व्यक्ती या वॉटर कूलरमधील पाण्याचा वापर हात धुण्यासाठी करीत असल्याने हे पाणी कसे प्यावे, असा विचार करतात.

कुंडीतील रोपटेही करपले-    जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर कुंड्यांमध्ये विविध प्रजातीची झाडे लावली आहे. पण जिल्हाधिकारी यांच्या स्वीयसहाय्यक यांच्या दालनाच्या शेजारील स्वच्छतागृहा जवळील कुंडीतील रोपटेच पाण्याअभावी करपल्याचे वास्तव आहे. तर याच भागात काहींनी खर्रा व पान थुंकून भिंतीच रंगविल्या आहेत.तोंड दाबून बुक्क्यांचा मार?-    जिल्हाधिकारी कार्यालयातील थंड पाण्याच्या कॅन बंद करण्यात आल्याने सध्या येथील कर्मचाऱ्यांना जीवाची काहिली होणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसांत गरम पाणीच प्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांचे हे धोरण तोंड दाबून बुक्क्यांचा मारच, अशी चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये रंगत आहे.पाण्यासाठी वृद्धांना चढाव्या लागतात पायऱ्या-    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारातीत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील व उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय आहे. तहसील व उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या निराधार व वृद्धांना घशाला कोरड पडल्यावर ग्लासभर पाण्यासाठी पायऱ्या चढत पहिल्या मजल्यावर जावे लागते. पण,   स्वच्छतागृहाशेजारील वॉटर कूलरमधील पाणीच थंड होत नसल्याने गरम पाणी पिऊनच या व्यक्तींना आपली तृष्णातृप्ती करावी लागत आहे.

वयोवृद्ध मोडताहेत बोटे-    जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त दररोज शेकडो नागरिक येतात. यात वयोवृद्धांसह महिलांचाही समावेश असतो. घशाला कोरड पडल्यावर वयोवृद्धांसह महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर अनेकांना जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाशेजारील वॉटर कूलरमधील गरम पाणी सेवन करून अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत तृष्णातृप्ती करावी लागत आहे.

 

टॅग्स :Waterपाणी