शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

तपत्या उन्हात जिल्हाकचेरीत घोटभर थंड पाणी नागरिकांना मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

कार्यालयीन दिवसांत भोजन अवकाशाचा वेळ वगळता सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयालयाचे कामकाज चालते. जिल्हाधिकारी कार्यालयातील थंड पाण्याच्या कॅन बंद करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपआपल्या घरून बाटलीत पिण्याचे थंड पाणी आणतात. पण, जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे अल्पावधीतच हे थंड पाणी गरम होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच उष्माघात टाळण्यासाठी वारंवार भरपूर पाणी पिण्यासह काही मार्गदर्शक सूचना  जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना  देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे काय? याबाबत ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केली असता जीवाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या दिवसांतच जिल्हा कचेरीत घुटभर थंड पाणी नागरिकांना मिळत नसल्याचे दिसून आले.

कर्मचारी घरून शिशीत आणतात पिण्याचे पाणी-    कार्यालयीन दिवसांत भोजन अवकाशाचा वेळ वगळता सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयालयाचे कामकाज चालते. जिल्हाधिकारी कार्यालयातील थंड पाण्याच्या कॅन बंद करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपआपल्या घरून बाटलीत पिण्याचे थंड पाणी आणतात. पण, जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे अल्पावधीतच हे थंड पाणी गरम होते. परिणामी, नाइलाजाने या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत घशाला कोरड पडल्यावर गरम पाणीच प्यावे लागत आहे.

स्वच्छतागृहाशेजारील वॉटर कूलर ठरतोय शोभेची वस्तू -   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाजूला एक वॉटर कूलर आहे. या वॉटर कूलरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर असलेल्या टाकीतील पाणी येते. हे वॉटर कूलर सुरू असले तरी पाणी थंड होत नाही. इतकेच नव्हेतर, हे वॉटर कूलर महिला आणि पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाच्या शेजारीच असल्याने अनेक व्यक्ती या वॉटर कूलरमधील पाण्याचा वापर हात धुण्यासाठी करीत असल्याने हे पाणी कसे प्यावे, असा विचार करतात.

कुंडीतील रोपटेही करपले-    जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर कुंड्यांमध्ये विविध प्रजातीची झाडे लावली आहे. पण जिल्हाधिकारी यांच्या स्वीयसहाय्यक यांच्या दालनाच्या शेजारील स्वच्छतागृहा जवळील कुंडीतील रोपटेच पाण्याअभावी करपल्याचे वास्तव आहे. तर याच भागात काहींनी खर्रा व पान थुंकून भिंतीच रंगविल्या आहेत.तोंड दाबून बुक्क्यांचा मार?-    जिल्हाधिकारी कार्यालयातील थंड पाण्याच्या कॅन बंद करण्यात आल्याने सध्या येथील कर्मचाऱ्यांना जीवाची काहिली होणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसांत गरम पाणीच प्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांचे हे धोरण तोंड दाबून बुक्क्यांचा मारच, अशी चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये रंगत आहे.पाण्यासाठी वृद्धांना चढाव्या लागतात पायऱ्या-    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारातीत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील व उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय आहे. तहसील व उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या निराधार व वृद्धांना घशाला कोरड पडल्यावर ग्लासभर पाण्यासाठी पायऱ्या चढत पहिल्या मजल्यावर जावे लागते. पण,   स्वच्छतागृहाशेजारील वॉटर कूलरमधील पाणीच थंड होत नसल्याने गरम पाणी पिऊनच या व्यक्तींना आपली तृष्णातृप्ती करावी लागत आहे.

वयोवृद्ध मोडताहेत बोटे-    जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त दररोज शेकडो नागरिक येतात. यात वयोवृद्धांसह महिलांचाही समावेश असतो. घशाला कोरड पडल्यावर वयोवृद्धांसह महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर अनेकांना जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाशेजारील वॉटर कूलरमधील गरम पाणी सेवन करून अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत तृष्णातृप्ती करावी लागत आहे.

 

टॅग्स :Waterपाणी