शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

भारनियमनाच्या विरोधात नागरिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 11:28 PM

तालुक्यातील काही भागात १६ तासाचे भारनियमन केले जात आहे. याचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देविद्युत देयक न भरण्याचा निवेदनातून अधिकाºयांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील काही भागात १६ तासाचे भारनियमन केले जात आहे. याचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर जनजीवन विस्कळीत झाले असल्याचा आरोप करीत तात्काळ सुरू केलेले भारनियमन बंद करा अन्यथा आम्ही विद्युत देयके अदा करणार नाही, असा इशारा महावितरणच्या अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून तालुका सरपंच संघटनेचे दिला आहे.वेळी-अवेळी विद्युत पुरवठा खंडित केल्या जात असल्याने तालुक्यातील अनेक गावातील पाणी पुरवठा योजना प्रभावीत झाली आहे. घागर-घागर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर भारनियमनामुळे ग्रामीण भागातील गव्हाचे पीठ करणाºया चक्की पासून ते शेतीच्या ओलिताची कामे ठप्प पडत आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे दिवस असून विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने त्यांनाही याचा चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. शहरी भागात २४ तास विद्युत पुरवठा दिल्या जातो. तर ग्रामीण भागात १६ तासाचे भारनियमन होत आहे. हा प्रकार ग्रामीण जनतेवर अन्याय करणारा असून तात्काळ भारनियमन बंद करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील जनतेला सवताची वागणूक दिली जात आहे. येत्या काही दिवसांत निवेनाद्वारे करण्यात आलेल्या मागणीवर विचार न झाल्यास भारनियमन बंद होईस्तोवर महावितरणकडून दिल्या जाणारे विद्युत देयक तालुक्यातील नागरिक करणार नाही, असा इशाराही निवेदनातून महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आला आहे. सदर निवेदन सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष निखिल कडु यांच्या नेतृत्त्वात महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आले.तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याच्या मागणीच्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यलय वर्धा यांना तर उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना धमेंद्र राऊत, बाळा सोनटक्के, दिनेश डेहनकर, अश्विन शेंडे, अरूण मांडवकर, रोशन राऊत, जीतेश मात्रे, अशोक कठाणे, योगेश सरोदे, रामु मसराम, प्रशांत भडके, पुरुषोत्तम ढोले, सागर ठाकरे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, शेतमजुर व परिसरातील गावांमधील महिला-पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.