शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

लसींचा ठणठणाट; केंद्रांना लागले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

लससाठा कमी होताना दिसताच लसीकरण केंद्रेही कमी करण्यात आली. २९ तारखेपर्यंत १८ केंद्रांवरून लसीकरण करण्यात आले; मात्र, १ जुलैला केवळ पाचच केंद्रे सुरू होती. इतर सर्व केंद्रांना टाळे लागले असून, पुढील आदेशापर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. मागणीनंतरही लस उपलब्ध न झाल्याने शुक्रवारपासून सर्व लसीकरण केंद्रे कुलूपबंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाच केंद्रांवर लसीकरण : शुक्रवारपासून होणार बोंबाबोंब! कसे साधणार लक्ष्य?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात  प्रथम शतप्रतिशत लसीकरण करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींना पाच लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा खुद्द पालकमंत्र्यांनी केली आहे. पण, लसीकरणाचा वेग वाढायला लागताच लससाठा संपत असल्याचा अनुभव वर्धेकरांना येत आहे. आताही लससाठा संपल्याने केंद्रांना टाळे लागले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लसीकरणाचे लक्ष्य कसे साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून लसीकरणाची गती वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती करण्यासोबतच पारितोषिक योजनाही अंमलात आणली आहे. ग्रामपंचायतीही पुढाकार घेऊन नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे लस घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसल्याने जिल्ह्यात १८० लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांतही लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यासोबतच गावागावांमध्ये शिबिरे घेऊन लसीकरण केले जात आहे. परंतु शासनाकडून लस पुरवठा होत नसल्याने यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. आत. १८ वर्षांवरील  लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढायला लागली. सकाळपासूनच लांबलचक रांगा दिसू लागल्या आहेत. त्यामुळे जवळपास ४७ केंद्रांवरून लसीकरण सुरू होते. लससाठा कमी होताना दिसताच लसीकरण केंद्रेही कमी करण्यात आली. २९ तारखेपर्यंत १८ केंद्रांवरून लसीकरण करण्यात आले; मात्र, १ जुलैला केवळ पाचच केंद्रे सुरू होती. इतर सर्व केंद्रांना टाळे लागले असून, पुढील आदेशापर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. मागणीनंतरही लस उपलब्ध न झाल्याने शुक्रवारपासून सर्व लसीकरण केंद्रे कुलूपबंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि राज्य सरकारकडून जिल्ह्याला लसींचा पुरवठा होतो. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थी संख्येचा विचार करून लससाठ्याची मागणी करण्यात आली आहे. अद्यापही लस उपलब्ध न झाल्याने गुरुवारी केवळ पाच केंद्रांवर लसीकरण सुरू होते. लस उपलब्ध न झाल्यास शुक्रवारपासून ही केंद्रेही बंद करावी लागतील.- डॉ. प्रभाकर नाईक, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस