शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

लसींचा ठणठणाट; केंद्रांना लागले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

लससाठा कमी होताना दिसताच लसीकरण केंद्रेही कमी करण्यात आली. २९ तारखेपर्यंत १८ केंद्रांवरून लसीकरण करण्यात आले; मात्र, १ जुलैला केवळ पाचच केंद्रे सुरू होती. इतर सर्व केंद्रांना टाळे लागले असून, पुढील आदेशापर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. मागणीनंतरही लस उपलब्ध न झाल्याने शुक्रवारपासून सर्व लसीकरण केंद्रे कुलूपबंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाच केंद्रांवर लसीकरण : शुक्रवारपासून होणार बोंबाबोंब! कसे साधणार लक्ष्य?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात  प्रथम शतप्रतिशत लसीकरण करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींना पाच लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा खुद्द पालकमंत्र्यांनी केली आहे. पण, लसीकरणाचा वेग वाढायला लागताच लससाठा संपत असल्याचा अनुभव वर्धेकरांना येत आहे. आताही लससाठा संपल्याने केंद्रांना टाळे लागले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लसीकरणाचे लक्ष्य कसे साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून लसीकरणाची गती वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती करण्यासोबतच पारितोषिक योजनाही अंमलात आणली आहे. ग्रामपंचायतीही पुढाकार घेऊन नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे लस घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसल्याने जिल्ह्यात १८० लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांतही लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यासोबतच गावागावांमध्ये शिबिरे घेऊन लसीकरण केले जात आहे. परंतु शासनाकडून लस पुरवठा होत नसल्याने यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. आत. १८ वर्षांवरील  लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढायला लागली. सकाळपासूनच लांबलचक रांगा दिसू लागल्या आहेत. त्यामुळे जवळपास ४७ केंद्रांवरून लसीकरण सुरू होते. लससाठा कमी होताना दिसताच लसीकरण केंद्रेही कमी करण्यात आली. २९ तारखेपर्यंत १८ केंद्रांवरून लसीकरण करण्यात आले; मात्र, १ जुलैला केवळ पाचच केंद्रे सुरू होती. इतर सर्व केंद्रांना टाळे लागले असून, पुढील आदेशापर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. मागणीनंतरही लस उपलब्ध न झाल्याने शुक्रवारपासून सर्व लसीकरण केंद्रे कुलूपबंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि राज्य सरकारकडून जिल्ह्याला लसींचा पुरवठा होतो. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थी संख्येचा विचार करून लससाठ्याची मागणी करण्यात आली आहे. अद्यापही लस उपलब्ध न झाल्याने गुरुवारी केवळ पाच केंद्रांवर लसीकरण सुरू होते. लस उपलब्ध न झाल्यास शुक्रवारपासून ही केंद्रेही बंद करावी लागतील.- डॉ. प्रभाकर नाईक, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस