शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूचे प्रकरण पोलिसांनी दडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:24 IST

तालुक्यातील मदनी येथे हरिलाल चव्हाण यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात सुभाष वानखेडे यांच्या मंडप डेकोरेशन साहित्यातील डीजेच्या वीजपुरवठ्यातील प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने मुलगा शंकर गजानन जाधव (२४) रा. मदनी याचा ५ जून रोजी मृत्यू झाला.

ठळक मुद्देआई विमल जाधव यांचा आरोप। चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील मदनी येथे हरिलाल चव्हाण यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात सुभाष वानखेडे यांच्या मंडप डेकोरेशन साहित्यातील डीजेच्या वीजपुरवठ्यातील प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने मुलगा शंकर गजानन जाधव (२४) रा. मदनी याचा ५ जून रोजी मृत्यू झाला. या प्रकरणाचा सेवाग्राम पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नाही, हे प्रकरण दडपले, अशी तक्रार मृताची आई विमल गजानन जाधव यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.याप्रकरणी योग्य तपास करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे व आपल्या मुलाच्या मृत्यूची जबाबदारी म्हणून आपल्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शंकर गजानन जाधव हा ५ जून रोजी हरिलाल चव्हाण यांच्या घरी लग्न कार्यासाठी डेकोरेशन कंत्राटदार सुभाष वानखेडे यांच्यासोबत गेला होता. रात्री ९.३० वाजतादरम्यान डीजेच्या वीजपुरवठ्यातील प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल तीन दिवसांनी सेवाग्राम पोलिसांनी गावात येऊन चौकशी केली. यावेळी सदर डीजे वायर काढून पोलीस ठाण्यात नेला; मात्र नंतर संबंधिताला परत करण्यात आला. या प्रकरणात मातेचे बयाण नोंदवून घेण्यात आले नाही. पोलिसांनी परस्पर मुलाचा मृत्यू हृदयविकाराने झाला, अशी खोटी अशी माहिती नोंदविली. हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहे, असे विमल जाधव यांनी या निवेदनात म्हटले आहे. मुलाच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विमल जाधव यांनी केली आहे. या प्रकरणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून दाद मागणार असल्याचेही विमल जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस