शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यात राबविणार बाल स्वच्छता मिशन

By admin | Updated: November 12, 2014 22:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता, घर व परिसरातील स्वच्छता

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता, घर व परिसरातील स्वच्छता वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची बांधणी, अंगणवाडी व सार्वजनिक शौचालयाची बांधणी, उघड्यावर शौचालयाची प्रथा बंद करण्याकिरता कार्य सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्यात बाल स्वच्छता मिशन सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली आहे. केंद्र शासनाच्या सुचनेंतर्गत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बाल स्वच्छता मिशन राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वच्छतेचे संदेश, हात धुणे व प्रचार प्रसिद्धीकरिता बालकांना महत्त्वाचे दूत म्हणून या मोहिमेत सहभागी करून घ्यावयाचे आहे. आणि हा कार्यक्रम गाव, तालुका व जिल्हा स्तरावर राबवावयाचा आहे. १४ ते १९ नोव्हेंबर २०१४ (जागतिक स्वच्छतागृह दिन) पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये बालकांना लघुशंका व शौचालयाला जाण्याकरिता जागेची उपलब्धता, शाळामध्ये तसेच प्रत्येक घरी शौचालय व्यवस्था, बसस्थानक, बसथांबे, यात्रा स्थळे, उपहार गृहे, प्रक्षेणिय स्थळ, आठवडी बाजार, मैदाने, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे व वेळेवर स्वच्छतागृह उपलब्ध होणे या बालकांच्या हक्कांची त्यांना जाणिव करून देण्यात येणार आहे.स्वच्छतेच्या परिपाठामध्ये बालकांमध्ये स्वच्छतेची जागृती करणे हा या मागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. बाल स्वच्छता मिशन अंतर्गत तालुका स्तरावर गाव व ग्रामपंचायत स्तरावर निबंध स्पर्धा, भित्तीचित्रक स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, स्वच्छ परिसर स्पर्धा, स्वच्छ शाळा व अंगणवाडी स्पर्धा, यास स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र काटोलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)