शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

अपेक्षांच्या भडिमाराने हिरावला चिमुकल्यांचा ‘बालहक्क’

By admin | Updated: November 19, 2014 22:45 IST

मुलांवर होणारे शारीरिक, मानसिक अत्याचार व माध्यमांद्वारे दाखविल्या जाणाऱ्या काही बाबींमुळे मुलांचे भावविश्व बदलत आहे. त्यांच्यावर अपेक्षांचा भडिमार होत असताना त्यांचे बालपण व पर्यायाने

पराग मगर - वर्धामुलांवर होणारे शारीरिक, मानसिक अत्याचार व माध्यमांद्वारे दाखविल्या जाणाऱ्या काही बाबींमुळे मुलांचे भावविश्व बदलत आहे. त्यांच्यावर अपेक्षांचा भडिमार होत असताना त्यांचे बालपण व पर्यायाने त्यांचे हक्क हिरावले जात आहे. यामुळे मुलांचे हक्क, कर्तव्ये व अधिकार यावर नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. महिला व बालकल्याण विभागाद्वारे बालकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात़ त्यांच्या अधिकारांबाबत चर्चा होत आहे; पण मुलांचे अधिकार आधी मुलांना कळणे गरजेचे आहे. याबाबत बालहक्कदिनी घेतलेला धांडोळा़़़मानवाधिकार, नागरी हक्क, ग्राहकांचा हक्क, महिलांना हक्क असे अनेक विषय सध्या चर्चिले जातात. जगात लोकसंख्येच्या १५ टक्के लोकसंख्या ही बालकांची आहे. तरीही बालकांचा हक्क या विषयाकडे सहज दुर्लक्ष केले जाते़ मुळात बालकांना गृहितच धरले जात असल्याने हा प्रकार होतो; पण युनिसेफ व इतरही संस्थांचे कार्य तसेच बालकांवर होत असलेले अत्याचार व त्यांचे बदलते आयुष्य यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ मध्ये पुढाकार घेऊन बालहक्काचा करार मांडला. तेव्हापासून बालहक्कावर संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. या करारात एकूण ५४ कलमे अंतर्निहित असून अस्तित्व, संरक्षण, विकास आणि सहभाग या चार हक्कांमध्ये त्यांचा समावेश आहे. घरांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद काही अंशी कमी झाला असला तरी त्यांना गृहित धरण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांचाही घरच्या निर्णयात काहीसा सहभाग असावा, ही बाबच न रूजल्याने महिला व बाल कल्याण विभागामार्फत बालकांचे हक्क, त्यांच्यासाठी असलेल्या योजना आदी माहिती सर्वांपर्यंत पोहोचविली जाते. यासाठी सन २००० पासून बाल न्याय अधिनियमही तयार करण्यात आला़ आजची मुले उद्याचे नागरिक आहे, या दृष्टीने विचार व्हावा यासाठी बालविकास विभागाद्वारे प्रयत्नही होत आहे; पण मुलांना हक्काप्रती जागरुक होण्यासाठी बोलतं करणे व हक्काप्रती जागरुक करणे गरजेचे आहे़