शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘चाईल्ड लाईन’ने रोखला वर्ध्यात हाेणारा बालविवाह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 05:00 IST

सभागृह चालकाला विवाह सोहळ्यासाठी सभागृह देताना वर आणि वधू या दोघांचे आधार कार्ड, वयाचा दाखला घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. असे न केल्यास सभागृहचालक, केटरिंगचालक, फोटोग्राफर आदींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्या.

ठळक मुद्देवधू-वर पक्षाकडील मंडळींची कानउघाडणी : कायद्याची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या संकटात जिल्ह्यातील ग्रामीण भागात बालविवाह करण्याच्या घटना उघडकीस आल्या. मात्र, आता चक्क शहरातही याचे लोण पसरत चालले असून, वर्ध्यातील पावडे चौक परिसरात असलेल्या शाळेसमोरील सभागृहात पार पडणारा बालविवाह चाईल्ड लाईनच्या पुढाकाराने रोखण्यात यश आले आहे. वर्ध्यातील रहिवासी २५ वर्षीय युवकाचे नागपूर जिल्ह्यातील एका गावातील १६ वर्षीय मुलीशी विवाह सोहळा होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर मिळाली. चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक यांनी तत्काळ आपल्या चमूसह बॅचलर रोडवर असलेल्या मंगल कार्यालयात धडक दिली. दरम्यान, तेथे विवाह सोहळा सुरू असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय आणि बाल कल्याण समितीला दिली. रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांच्या मदतीने सर्व पदाधिकारी सभागृहात पोहोचले. त्यांनी वर आणि वधू पक्षाकडील दोन्ही नातलगांची समजूत काढली. बालविवाह करणे हा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार गुन्हा ठरत असल्याचे समजावून सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी मुलीकडून जबाबनामा लिहून घेत वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, असे लिहून घेण्यात आले. यावेळी चाईल्ड लाईनच्या  सामाजिक कार्यकर्त्या जयश्री निवल, माधुरी शंभरकर, सूरज वानखेडे, आशिष हिरुळकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर तसेच रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळकसह कर्मचाऱ्यांची   उपस्थिती होती. सध्या मुलीला बालकल्याण समितीपुढे हजर करून तिच्या पुनर्वसनाची कारवाई करण्यात येत आहे.

सभागृहचालकाला दिल्या मौखिक सूचना - यावेळी सभागृह चालकाला विवाह सोहळ्यासाठी सभागृह देताना वर आणि वधू या दोघांचे आधार कार्ड, वयाचा दाखला घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. असे न केल्यास सभागृहचालक, केटरिंगचालक, फोटोग्राफर आदींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्या.

जन्म दाखल्यावरून कळले मुलीचे वय 

- बॅचलर रोडवर असलेल्या सभागृहात बालविवाह पार पडत असल्याचे समजताच चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक यांनी सभागृहात धाव घेत लग्नसोहळ्याची पत्रिका प्राप्त केली. दरम्यान, मुलगी कोणत्या शाळेत शिकत होती, याची माहिती घेऊन तेथील शाळेशी संपर्क करून मुलीच्या जन्माचा दाखला प्राप्त करण्यात आला. दरम्यान, दाखल्यात मुलीचे वय अवघे १६ वर्षे असल्याचे समजले. त्यानंतरच हा बालविवाह रोखण्यात आला. 

 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस